महाराष्ट्राच्या मुख्य मंत्र्यांचा राजिनामा मागण्यात आला
नुकतच वाचलं -अशोक चव्हाण यांचा राजिनामा सोनिया गांधीनी मागितला.
हा निर्णय कितपत भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दिशेने योग्य आहे???
नुकतच वाचलं -अशोक चव्हाण यांचा राजिनामा सोनिया गांधीनी मागितला.
हा निर्णय कितपत भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दिशेने योग्य आहे???
आजच मला समस आलाय बी एस एन एल कडून... त्यातली माहिती उपयुक्त वाटली म्हणून इथे शेअर करत आहे :
भारतात भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण होण्यासाठी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनकडे तुम्हाला पब्लिक सेक्टर, सरकारी कार्यालये, इन्श्युरन्स सेक्टर, पब्लिक सेक्टर बँक्स, ऑटॉनॉमस बॉडीज इ. ठिकाणी आढळलेल्या भ्रष्टाचाराविरुध्द तक्रार नोंदवा.
वेबसाईट : http://cvc.nic.in/welcome_cvc.html
तक्रार नोंदवण्यासाठी लिंक : http://cvc.nic.in/lodgecomp.htm
हिंदीतील माहिती : http://cvc.nic.in/hindi/hindimain.htm
माझी अनेक गोष्टींमुळे चिडचिड होते. त्यातली एक मुख्य म्हणजे लोकं जेव्हा स्वतः मध्ये अगदी सहजसाध्य असलेली सुधारणा घडवून आणल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता असताना अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी, सरकार, व्यवस्थापन, पोलीस – ही यादी न संपणारी आहे – यांना दोष देत बसतात.
अर्थात उपरोल्लेखित घटकांचा काहीच दोष नसतो असं नाही, पण एक बोट त्यांच्याकडे असताना स्वतःकडे असलेली तीन बोटं मात्र दुर्लक्षिली जातात.
एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता.