अंड्याने तिसर्यांदा पलटून पाहिले. अन खात्री केली की ती पुतळाबाईच आहे. फसलोच जरा, पण अंड्याची फसायची ही काही पहिलीच वेळ नव्हती. बरेचदा असे होते ना, मोठमोठ्या मॉलमध्ये फिरताना, कृत्रिम चेहर्यांच्या गर्दीमध्ये, एखादा टवटवीत चेहरा उठून दिसावा. आपला चेहरा हरखून यावा, पण निरखून पाहता तो कपड्यांचे प्रदर्शन मांडण्याकरता उभारलेला मानवी पुतळा निघावा. एखाद्या मेनकेचा असल्यास एवढा कमनीय बांधा निर्जीव असल्याची हळहळ वाटावी अन मदनाचा निघाल्यास पुतळादेखील आपल्यापेक्षा रुबाबदार दिसतो कसा याची जळजळ वाटावी.
ज्ञानेश्वरी समजावून घेताना....
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च |
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ||१५|| गीता - अध्याय १५ ||
सर्वांतरी मी करितो निवास । देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा ॥ समग्र वेदांस हि मी चि वेद्य । वेद-ज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता ॥ १५ ॥ गीताई||
"एऱ्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं| मी अमुका आहें ऐसी| जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं| ते वस्तु गा मी ||४२१||"
अशी अतिशय सुरेख सुरुवात करुन परमात्माच कसा सर्वांच्या अंतरात "मी मी" असा अहर्निश स्फुरत असतो हे माऊली विवरुन सांगताहेत.
हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
सत्संगती
श्वासोच्छ्वासी नाम | जपे सर्व काळी | वारी ती आगळी | साधे ज्याला ||
न लगे जावया | अन्य पुण्यक्षेत्री | अवघी धरित्री | तीर्थरूप ||
व्यापूनिया चित्ती | नित्य समाधान | वाटे धन मान | तृणवत ||
अंतरी संतत | ध्यातो भगवंत | होय मूर्तिमंत | संत भला ||
लाभावी अशाची | नित्यचि संगती | याविण विनंती | नाही दुजी ||
(श्री तुकोबारायांचरणी सादर समर्पण)
आज मी स्मशानात आलो जाऊन ....
पाहिले थोडा वेळ....मी त्या मुडद्यांत राहून....
शांत वाटले त्यातले काही ...
पाहिले काहींना मरूनही...इच्छांसाठी अजूनही जिवंत पाहून....
काही देह....तेथे हि हसरे होते....
जितके मिळाले त्यातच सुख त्यांचे..मागणे ना अजुनी कसले होते....
सज्जनाच्या बाजूला देह एका दुर्जणाचाही होता....
काही फरक न दिसला मजला त्यांत...दोघेही जळतच होते....
काहींच्या ओठी काळजी मुलाबाळांची होती,
काहींच्या ओठी....गाणी रडकी....भूतकाळाची होती,
काहींच्या मनी अजूनही......न सुटलेले हिशोब होते,
दहाच बोटे हाताची....तरी पुन्हा तीच तीच ते मोजत होते....
मृत्यू...
किती हि वाटलं तरी ज्याची भेट टाळता येत नाही असा.
'आहे' ला 'होतं' करणारा,वर्तमानाला भूतकाळ बनवणारा.
बोललेलं एखादं वाक्य 'शेवटचं' ठरवणारा.
वाक्यामागे स्वल्पविराम लावावा कि अल्पविराम लावावा ह्या संभ्रमात असतानाच अचानक येऊन पूर्णविराम लावणारा.
अंत म्हणजे आयुष्य आणि अनंत यांमधली एक सूक्ष्म रेषा.
एका भेटीतच या अंताच्या अलिकडचे पलीकडले होऊन जातात.
हिशोब थांबवणारा, जगणं लांबवणारा...
घराला किती हि मजबूत दारं लावली तरी त्यांना न जुमानणारा.
मृत्यू काहीतरी देऊन जातो कि काही घेऊन जातो?
वर्षानुवर्षे अडगळीत असेच पडून राहिलेल्या खटल्यांचा क्षणात निकाल लावणारा..
नमस्कार,
महाराष्ट्र ही संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते. या लेखात आपण अशाच एका अपरिचित संताची ओळख करुन घेणार आहोत.
।। वैराग्य।।
Mar 19, 2013,
आर्टिकल (महाराष्ट्र टाइम्स)
' अ ' तोंडात घास घालणार , तोच अचानक त्याच्या ' ब ' मित्राने ' अ ' च्या जोरात गालावर मारले. घासही पडला आणि गालाला जोराची चपराकही लागली. तृप्तीच्या क्षणी असा विक्षेप कोण सहन करणार ? जेवणारा ' अ ' ही त्याच्या मित्राला मारायला धावला.
श्री तुकोबारायांचे दर्शन - त्यांच्याच अभंगातून ....
एकंदरीत तुकोबांचे सगळे जीवनच आगळे-वेगळे. त्यांचे गाथेमधील अभंग जर कोणी वाचायला घेतले तर लक्षात येते की त्यांचे अवघे मनच जणू त्यांनी या अभंगातून आपल्या पुढ्यात मांडले आहे - आणि ते ही कुठलाच अभिनिवेश न बाळगता - सरळ नि थेट....
वाटते - असा कसा हा पारदर्शी महापुरुष - कोणतीही भीडभाड न बाळगता स्वतःबद्दलची, समाजाबद्दलची मते धाडकन मांडणारा .....
कधी स्वतःला अति हीन-दीन लेखणारा तर कधी स्वतःबद्दल अतिशय उंच उंच बोलणारा.....
कधी भोंदू बुवाबाजी बद्दल आसूड ओढणारा तर कधी अतिप्रेमाने समाजाला समजावून सांगणारा...
जशास तसं उत्तर द्यावं कि नाही याबद्दल मनात खूप गोंधळ आहे. म. गांधीजींच्या तत्वज्ञानाप्रमाणे अवमानकारक वागणूक देणा-यास , शत्रूत्व धरणा-यासही प्रेमाने जिंकून घ्यावे असं म्हटलं आहे. काही वेळा आपण एखाद्याशी फटकळपणे वागलेलो असतो, पण त्याने तो राग मनात न ठेवता आपल्याला हवी तेव्हां मदत केल्याने पश्चात्ताप होतो. पण सर्वांच्या बाबतीत असा अनुभव येत नाही (पश्चात्ताप झालाय किंवा होईल असे वाटत नाही). अशा लोकांच्या बाबतीत काय करायचे ?
आपले अनुभव इथं शेअर करू शकता.