प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.
स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती.
आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत.
पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.
तसा मी अगदीच नास्तिक नाहीये, पण तरीही देव, दानव, साक्षात्कार, चमत्कार अश्या गोष्टींवर चटकन विश्वास टाकणं नाही जमत मला. पण मग जेव्हा पंडीतजींचं 'भाग्यद लक्ष्मी बरम्मा' कानी पडतं, किंवा सैगलचे 'सो जा राजकुमारी' चे सुर कानावर रेंगाळायला लागतात किंवा जेव्हा शास्त्रीय संगीताचे कसलेही शिक्षण न घेतलेले किशोरदा लताबाई, मोहम्मद रफी सारख्या दिग्गजांच्या नाकावर टिच्चून ताकदीने आपले साम्राज्य उभे करतात किंवा कुणी गुलझार जेव्हा एकीकडे "आंपकी आँखोंमें" सारखं वेड लावणारं लिहीताना त्याच ताकदीने 'कजरारे कजरारे' सारखं भन्नाट काहीतरी लिहून जातो तेव्हा साहजिकच मनात एक प्रश्न उभा राहतो...
मानसशास्त्रात भावनिक आत्मजाणीव (emotional self awareness) हा एक मोठ्या प्रमाणावर विचार होणारा विषय आहे. या विषयात एखाद्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या विशिष्ट भावना आणि त्यांच्यामुळे होणारे परिणाम याचा अभ्यास होतो. विशिष्ट भावनांमुळे आपल्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होतो का, आपल्या एकंदर वागण्यावर काही परिणाम होतो का हेदेखील यात अभ्यासले जाते. ह्या विषयाच्या अभ्यासात असे आढळले आहे की, समोर आलेल्या परिस्थितीला एखादी व्यक्ती दोन पध्दतींनी सामोरी जाते. एक म्हणजे ती व्यक्ती अति शीघ्र पद्धतीने प्रतिक्रिया देते ज्याला शब्द आहे react करते.
झरीनताई दारूवालांची सरोदवर फिरणारी बोटं अखेर कायमची थांबली!
काळाने काळजाचा आणखी एक तुकडा ओढून नेला.
ज्यांनी झरीनताईंना प्रत्यक्ष ऐकलं आहे त्यांना ती सरोदवर वाकलेली बुटकी मूर्ती आठवेल आणि भडभडून येईल.
उशीराच लिहितोय 'हैदर'वर ... पण चांगल्या चित्रपटाबद्दल सगळ्यांना सांगायला काळवेळ काही असू नये , नाही का ?
(वि. सू. : Spoiler वाटू शकेल असा मजकूर यात आहे हे लक्षात ठेवून वाचावे. मागाहून तक्रार चालणार नाही )
ह्घ्ग ह्ह्घ ह्घ ह्ग्घ्ह्घ ह्घ ह्घ ह्ह घ झ्झ्ह्ह ह्ह ह्घ ह्ह
" रमा माधव"
नाही भावला हा चित्रपट.कदाचित मी फार फार जास्त अपेक्षेने गेले बघायला पण नाही भावला .
स्वामी ची कित्येक पारायणं केली तरीही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाट्ते पण हा चित्रपट नाही भावला.
मुळात हमामा, आरती, मुजरा, रमा माधवाचे प्रेमगीत, मंगळागौरीचे गाणे या सगळ्याची एकत्र मोट बांधण्याचा किंवा हे सग़ळ एकत्र कोंबण्याचा प्रयत्न अनाठायी वाट्ला. त्यातही मुजर्याची खरंच आवश्यक्ता होतीच का असा प्रश्न पडला ज्याचं माझ्या मनातलं उत्तर 'नाही' असं आलं