माझा La carte मेन्यू
जीवनात कायम दुःखी असेल अशी व्यक्ति सहसा असुच शकत नाही कारण येणारे सुख काय किंवा दुःख काय, दोन्हीही असतात क्षणभंगुर ! कारण दोन्हीचे अस्तित्व अवलंबून असते ते फक्त क्षणागणिक बदलत राहणाऱ्या चार गोष्टींवर ― आहार, विहार, आचार, विचार. माणसाच्या चंचल मनामुळे जेव्हा कधी सुख मिळते तेव्हा त्या क्षणांचे सातत्य राखणे आणि ज्याचे परिणाम म्हणून सुख अनुभवले त्या कृतीचे अवलोकन करणे बहुतांश वेळा अवघड होऊन बसते. आणि अश्या दोलायमान स्थितीमुळे आणि नेमके विपरीत कृतीचे आचरण घडल्याने मनाला पुन्हा एकवार दुःख भोगावे लागते. मग ह्यावर उपाय काय ?