आपल्यापैकी बरेचसे लोक असे असतील कि ज्यांचा एकही दिवस मायबोलीला भेट दिल्याशिवाय जात नसेल. व्यस्त कामातुन थोडावेळ का होईना मायबोलीवर येऊन, येथील विविध विभागांना भेट देऊन, प्रतिसाद देऊन जाणारेहि बरेच आहेत. खरोखर मायबोली म्हणजे एक न सुटणारे व्यसनच.
आपणही बर्याचवेळा मायबोलीवर येऊन लेख, प्रचि, कविता, ललित इ. इ. काहि ना काहि लिहत असतोच. किंवा एखाद्या आवडलेल्या लिखाणावर/प्रचिवर आपले प्रतिसाद देत असतो.
अशा विविधप्रकारे मायबोली सर्व्हर वर थोडा ताण वाढण्यास आपण कारणीभूत असतो. मध्येच कधीतरी मायबोली द्रुपालच्या स्वरूपात आपला राग प्रकट करते.
नमस्कार,
२०११ सालातील एक ब्लॉगर्स मेळावा दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे.
एकटं कधी राहू नये म्हणतात. आणि राहीलंच तर रिकामं राहू नये.. नाहीतर सैतानाचं थैमान चालू होतं. पण माझ्यासारखे लोक्स गर्दीतही एकटे असतात. समोर घडणा-या प्रसंगापासून एकदम अलिप्त राहून स्मरणरंजनात किंवा कल्पना विलासात मग्न होतात..
वेगात विचार करणं आणि त्या विचारात दंग राहणं हा वेळ चांगला घालवायचा चांगला मार्ग असला तरी आपल्या आजूबाजुंच्यांना त्याचा चांगलाच त्रास होतो. कित्येकदा काय विचार करत होतास या प्रश्नाला उत्तर देता येत नाही..
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
नमस्कार,
उत्तर पुर्व (नॉर्थ इस्ट) भारतात कोणी मायबोलीकर आहात का?
नोकरी निमित्त आम्ही फेब्रुवारी २०११ पासुन बारापाणी (मेघालय) येथे राहायला आलो आहोत.
हल्ली मोबाईलवरही राँगनंबर भरपुर येतात. कधी आपण मोबाईलमधला साठवुन ठेवलेला नंबर लावला तरी तो चुकून भलतीकडेच जातो, तर कोणी आपल्याला फोन करतो आणि आपण हॅलो म्हटले की, 'अमित को फोन दिजीये' अशी ऑर्डर सोडतो
हा धागा तुम्ही अनुभवलेल्या राँग नंबरच्या गंमतीजंमती मायबोलीकरांना सांगुन पुन:प्रत्ययाचा आनंद घ्यावा यासाठी खास....
सुरवात माझ्यापासुन...