अभिजीत वैतागून बसला होता. अजून चार वाजले पण नव्हते आणि दिग्दर्शक आझमी पॅकप करण्याची बात करत होता. बात करायला त्याच्या बाचं काय जातंय. चॅनलवाली काजल मॅडम आझमीला बडबडणार नव्हती. दिवसाभरामधे अवघे चार सीन शूट झालेले बघून काजलचा बीपी चारशेपर्यंत चढलाच असता.
"स्पॉट, एक चाय देना" अभिजीतने ओरडून सांगितले. अर्थात सेटवरचा गोंधळ इतका होता की कुणालाच ते ऐकू गेलं नसतं. तितक्यात सीरीयलची हिरविण मेनकामॅडम मेकप रूममधून बाहेर डोकावून गेलीच. टवळीला दुसर्या कुठल्याच सीरीयल मधे चान्स देत नाहीत पण म्हणून ही मुरकायचे नखरे काही कमी करत नाही...
अमेरीकेत सुमा फूड व्यतिरीक्त पेणच्या गणेश मूर्ती कुठे मिळतील? काही वर्षांपूर्वी आमच्या मंडळासाठी मी ऑर्डर केली होती. सध्या सुमा फूडसकडे पेणच्या गणेश मूर्ती मिळत नाहीयेत. कृपया काही माहिती असल्यास सांगा.
असे हे दुर्ग कोकणचे
`महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी आहे`, असे मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँड डफ म्हणतो. शिवाजीमहाराजांनी किल्ल्यांच्या आश्रयाने स्वराज्याची स्थापना केली आणि राज्यविस्तार साधला. रामचंद्रपंत अमात्य `आज्ञापत्रात` लिहतात, 'हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले....`
मोहमद रफी या नावाची महत्ता सांगायची खरे तर गरज नाही. पण तरीही....
सध्याचे टीवी वरचे संगीत विषयक कार्यक्रम, किंवा स्पर्धा, इंटरनेट व इतर माध्यमामदले चित्रपट संगीत विषयी लेख या सर्व मध्ये रफी साहेबांचा अनुल्लेख आढळून येतो.
इंटरनेट वरती शोध घेतला तर रफी साहेबांविषयीची माहिती , लेख अथवा कौतुक इतर गायक गायिकांच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात आढळते.
मी रोज सकाळी ५.३० ला उठते, पण कोणी मला ५.१५ ला जरी उठायला सांगीतले तर मला जमत नाही. असं वाटतं १५ मी. झोप का घालवा?
पण आज सकाळी मी ५ वाजताच जागी झाले ते एका भयंकर स्वप्नाने. जागी झाल्यावर मला असं जाणवलं की मी रडतही होते. पण आता या अनुभवाने मी पुरती गोंधळून गेले आहे. काय असेल याचा अर्थ? खरंच स्वप्न आपल्याला काही सुचवतात का? की हा निव्वळ मनाचा खेळ आहे?
कुणी जाणकार यावर प्रकाश टाकतील क? असा अनुभव कोणाला आला आहे का?