आज अमेरिकेच्या वॉशिंगटन पोस्ट ह्या वृत्तपत्र समूहाने भारताच्या पंतप्रधानांवर "भ्रष्ट मंत्रीगटाचे नेते " ( जे दुर्दैवाने ते आहेतच ) आणि मौन मोहन ( वस्तुस्थिती )अशी टीका केली आहे ....कारण आज पर्यंत भारतातील इतक्या सर्वोच्च पातळीवरील नेत्या बद्दल अशी टीका झालेली नाही .
आपला समाज दोन गटात मोडतो. एक 'आहे रे' आणि दुसरा 'नाही रे'. यातल्या 'आहे रे' गटाकडे कधी कधी काही गोष्टी गरजेपेक्षा अधिक असतात आणि त्या कुणाला तरी देऊन टाकाव्या असं त्यांना वाटतही असते. पण कुणाला ? हा प्रश्न उद्भवतो आणि गाडं अडकतं. देणार्याची प्रांजळ इच्छा असते की त्याने दिलेली वस्तू गरजू माणसापर्यंत पोहचावी.
हा बाफ उघडण्याचं कारण हेच. तुमच्याकडे असलेली कोणतीही वस्तू जर कुणा 'नाही रे' च्या संसाराला उपयोगी ठरत असेल तर... ज्या कुणाला अशा गरजू लोकांसाठी काम करणार्या प्रामाणिक संस्था, संधटना किंवा व्यक्तीची माहीती असेल तर त्यांनी ती इथे शेअर करावी.
शब्द सांभाळून आहे मी उराशी
दे मुभा, बोलायला थोडे तुझ्याशी
सागरामध्ये जरी एकाच असलो
काठ तू, मी वाट चुकलेला खलाशी
प्राक्तनाने साथ आहे सोडलेली
स्वप्न हल्ली नांदते केवळ उशाशी
विश्व सारे पालथे मी घातल्यावर
स्वर्ग सापडला मला माझ्या घराशी
अन्न जेव्हा गोड लागेना जिभेला
आसवांनी चव दिली तेव्हा जराशी
नेहमी 'मी' ऐवजी 'आपण' म्हणावे
नाळ आपोआप जुळते मग मनाशी
जिंकले साऱ्या जगाला त्याचवेळी
घेतले जेव्हा मला तू बाहुपाशी
--- वैभव फाटक ( २७/०८/२०१२) ---
कोरड्या दुष्काळाचे दिवस आहेत.. सगळीकडे नुसता रखरखाट... आकाशात एक काळा ढग नाही.. पावसाची कुठलीच लक्षणं नाहीत. माणसानं निराश न व्हावं तर करावं तरी काय! आणि अशात "मेरी मानिये तो ये बारिश खरिदिये, सस्ती सुंदर टिकाऊ बारिश - सिर्फ पाच हजार रुपयमें!!" म्हणत दारात आलेला बारिशकर!
आणि बघा हं! त्याची बारिशही सामान्य नाहिये - ती त्याच्याच तोंडून अनुभवायची चीज आहे.
हां मेरे दोस्त - वही बारिश जो आसमान से आती है, बुंदों में गाती है
पहाडोसे फिसलती है, नदियों में चलती है
लहेरोमें मचलती है, कुएं पोखर से मिलती है
खपरेलोंपे गिरती है, गलियोमें फिरती है
मोड पर संभलती है, फिर आगे निकलती है
वही बारिश!
काळे कुट्ट मेघ
आकाशी दाटले.
विजेच्या कडाक्यात केल्या
त्यांनी पावसाळी घोषणा.
तेंव्हा त्यांचा चेहरा मला
नेत्यानं सारखा भासला.
दोन-चार थेंबच
अंगावर सांडले.
पावसात भिजण्याची
हौस मनी राहिली.
दिल्लीचा पावसाळा हा
असाच असतो.
भर श्रावणात हा
मृगजळ दाखवितो.
आहे गगनी सूर्य जोवरी
वेचून घ्या आनंदी फुले.
कविता - 'मी चुप्प'
येताना खुपत
जाताना बोचत
कितीही दुखलं तरी मी चुप्प !!
स-दैव सुज्ञ
विचारात महात्म्य
घर जळलं तरी मी चुप्प !!
संस्कृती दक्ष
केल लक्ष
झालो भक्ष तरी मी चुप्प !!
रांगेत सुस्त
प्रगतीचा अस्त
सगळच फस्त तरी मी चुप्प !!
मंत्र्यानचं तंत्र
हाती जातीचा मंत्र
केल माझ यंत्र तरी मी चुप्प !!
दाखवलं संत्र
हेच हल्लीच सूत्र
मोडक्या स्वप्नांची रात्र तरी मी चुप्प !!
करून कष्ट
शून्य प्राप्त
वेळ समाप्त तरी मी चुप्प !!
पाणी लुप्त
वीज गुप्त
सारे होती असे आसक्त तरी मी चुप्प !!
गप्प, गप्प
आवाज ठप्प
मजले गर्दीत हुप्प तरी मी चुप्प !!