मी Paint केलेले कुर्ते ... १
मी हाताने पेंट केलेले कुर्ते ...
१
२
३
४
५
६
मी हाताने पेंट केलेले कुर्ते ...
१
२
३
४
५
६
सकाळी सकाळी दार वाजलं म्हणून उघडलं तर दारात प्रसिद्ध हास्यकवी अशोक चक्रधर उभे ! मी उडालोच. त्यांचा पंखा मी आहेच पण त्यांना कसं काय कळालं ?
" इस यंत्र से " कवी बोलले.
खरंच कि ! त्यांच्याकडच्या यंत्राचा विसर कसा काय पडला बुवा ? त्यांना काही प्रश्न विचारणे ही खरंच फॉर्मॅलिटी ठरली असती. कारण प्रश्न मनात येताक्षणी त्यांना कळत असणारच म्हणूनच "इकडे कैसे ?" हा प्रश्न मनात ठेवला. त्याने भाषेची बूजही राखली गेली.
"कुछ दिनों से यह यंत्र काम नही कर रहा ! आप मशीन्स रिपेअर करते हो नं ? इसे भी जरा ठीक कराईये "
" क्या हो गया है ?" शब्द जुळवत विचारलं.
मागे एकदा नेट वर डेटिंग बद्दल मार्गदर्शन करणारी साईट पहात होतो .
त्यात मुलींना उपदेश केला होता कि ,
जो मुलगा हॉटेलात गेल्यावर वेटर ला "शुक-शुक"करून बोलावेल ,त्या मुलाला टाळा..........कारण त्याला इतरांच्या मान-सन्मानाची काळजी नसते...............इ.इ.इ.
तुम्हाला काय वाटते? शुक-शुक करून,आवाज काढून वेटर ला बोलावणे हे bad manners आहे का?
कृपया आपली मते मांडा
कॉलेजची पोरं,विद्यार्थी नव्हे....गुरुच!!!
कॉलेजातून बाहेर पडलेल्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, म्हणजे अगदी नुकत्याच passout होवून नोकरीला लागलेल्या माणसापासून ते अगदी senior citizen पर्यंत, की बुवा, कॉलेजातील मुला-मुलींकडे पाहून काय वाटतं हो तुम्हाला?म्हणजे अनेकांना तश्या अनेक गोष्टी वाटत असतील....पण अगदी प्रत्येकाच्या अगदी चट्कन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे.....ही मुलं कशी सतत हसत खिदळत असतात ना, आपल्यापेक्षा कितितरी पटीने आनंदी असतात कायम!
राचय्या साधा भोळा गरीब आहे, पण कधीकधी वात आणणारा आहे. आपण साखरबिखरझोपेत असताना हा महाशय उठतो. काहीतरी कानडी श्लोक गाणी मंत्र पुटपुटतो. मग टेरेसच्या मोकळ्या जागेत जाऊन अगदी आवाज करकरून व्यायाम करतो. मग टेरेसच्याच एका कोपर्यात असणार्या बाथरूममध्ये दे दाणादण पाणी उपसून आवाज करून बेदम आंघोळ करतो. हाश्सहुश्श करत पुन्हा रुममध्ये आला, की पुन्हा आहेच श्लोक-आरत्या-गाणी. मग मी नाईलाजाने गोधडीतून तोंड बाहेर काढलं की समोर राचय्याचा सावळा बाळबोध चेहरा. गोडबिड हसत अगदी. मग आपल्या नाईलाजाची नि रागाची आपल्यालाच लाज वाटते.
सुभाषित आस्वाद [२] : (अ)न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि, न मनोरथै: |
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: ||
कोठलेही काम [ त्यासाठी आवश्यक असलेल्या परिश्रम म्हणजेच ] उद्योग केल्यानेच होत असते.
(केवळ मनात त्याबद्दल कल्पना रचून म्हणजेच ) स्वप्ने रंगवून नव्हे.
(वनराज एवढा जंगलाचा राजा पण म्हणुन कांही) स्वस्थ बसून राहिलेल्या सिंहाच्या तोंडात हरणे
आपणहुन शिरत नाहीत.
याचे एम कर्णिक यांनी अतिशय समर्पक मराठी-सुभाषित केले आहे.
उद्योगानेच यश मिळते, स्वप्नरंजन ठरे फुका |
आज अमेरिकेच्या वॉशिंगटन पोस्ट ह्या वृत्तपत्र समूहाने भारताच्या पंतप्रधानांवर "भ्रष्ट मंत्रीगटाचे नेते " ( जे दुर्दैवाने ते आहेतच ) आणि मौन मोहन ( वस्तुस्थिती )अशी टीका केली आहे ....कारण आज पर्यंत भारतातील इतक्या सर्वोच्च पातळीवरील नेत्या बद्दल अशी टीका झालेली नाही .
कुलकर्ण्यांच्या भयंकर थंडगार केबिनीतून बाहेर आलो तेव्हा उत्तर ध्रुवावरून एकदम विषुववृत्तावर आल्यागत वाटलं. इतका वेळ आपण आत जिवंतच होतो की काय अशी एक शंकाही मनाला चाटून गेली.
देशपांडे बाई मतिमंद आहे. म्हणजे तशी कधीकधी हुशारही आहे, पण अशी हुशार असताना देखील मतिमंदच दिसणारी आहे. इन्क्रीमेंट घेताना, नाकारताना देखील मतिमंदच दिसणारी आहे. रवी म्हणतो ही ड्युप्लिकेट मतिमंदता आहे.
रवी पेट्रोलपंप आहे. शिवाय लावालाव्या करणारा आहे. शिवाय साळसूद आहे. शिवाय सतत काहीतरी मदत करू का- असं झाडून सार्यांना विचारणारा आहे. त्याचा आणि एकंदरच सार्यांचा साहेब, म्हणाजे कुलकर्णी मास्तर अत्यंत चक्रम पद्धतीचा हुशार आहे, आणि रवीला त्याचं - तू प्लीज फक्त मला मदत कर. इकडे तिकडे उगाच मदत करत तडफडू नकोस - हे रोजचं पालुपद सार्यांचं पाठ झालं आहे.
आपला समाज दोन गटात मोडतो. एक 'आहे रे' आणि दुसरा 'नाही रे'. यातल्या 'आहे रे' गटाकडे कधी कधी काही गोष्टी गरजेपेक्षा अधिक असतात आणि त्या कुणाला तरी देऊन टाकाव्या असं त्यांना वाटतही असते. पण कुणाला ? हा प्रश्न उद्भवतो आणि गाडं अडकतं. देणार्याची प्रांजळ इच्छा असते की त्याने दिलेली वस्तू गरजू माणसापर्यंत पोहचावी.
हा बाफ उघडण्याचं कारण हेच. तुमच्याकडे असलेली कोणतीही वस्तू जर कुणा 'नाही रे' च्या संसाराला उपयोगी ठरत असेल तर... ज्या कुणाला अशा गरजू लोकांसाठी काम करणार्या प्रामाणिक संस्था, संधटना किंवा व्यक्तीची माहीती असेल तर त्यांनी ती इथे शेअर करावी.