अवांतर

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)

Submitted by अभय आर्वीकर on 23 August, 2013 - 01:35

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) 

विषय: 
शब्दखुणा: 

डस्ट इन द विंड

Submitted by अपूर्व on 21 August, 2013 - 23:24

काही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्तीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.

"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

विषय क्र. १ - स्वातंत्र्योत्तर काळातील घटना. "सहकार - एक चळवळ"

Submitted by बकुल on 21 August, 2013 - 02:14

"सहकार - एक चळवळ"

विषय क्र. २. टाटा - Leadership with Trust : विश्वासार्ह नेतृत्व

Submitted by आशूडी on 20 August, 2013 - 22:28

ज्या देशात आपण जगतो, त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. ‘आपण देशासाठी असू तर देश आपल्यासाठी असेल’ ही भावना जर कृतीला चालना देऊ शकली तर काय चमत्कार घडू शकतात हे जगाला दाखवून दिलं टाटा उद्योग समूहाने. शंभरहून अधिक काळ केवळ देशाच्या प्रगतीचाच वसा घेतलेल्या या विलक्षण कुटुंबाबद्दल, उद्योग समूहाबद्दल आदर, अभिमान वाटावा तेवढा कमीच आहे. सतत दूरदृष्टी ठेवून, प्रवाहाविरुद्ध पोहत राहून प्रवाहाचीच दिशा बदलणारे ध्येयवेडे टाटा!

काही मित्र चंद्रासारखे असतात ...

Submitted by मी मी on 17 August, 2013 - 12:15

काही मित्र चंद्रासारखे असतात ..

भेटतात तेव्हा लख्ख प्रकाशात चमकतात
पण मग पुढे कले कलेने कमी होत आवस होतात !!

काही येतात, दिसतात, लुकलुकतात …
तेव्हाच …. जेव्हा
तुमच्या अवती भोवती वातातावरण स्वछ असेल.

भोवती काळे ढग दाटून आलेत कि ते दिसेनासे होतात,
दडून बसतात ..

कधी परतहि येतात सगळं सावट निघून गेलं कि !!

काही दुरस्त ताऱ्यासारखे असतात,
दूरवर अगदी कोपऱ्यात उभे असतात हाथ बांधून

मंद प्रकाशात तेवणारे ….पण साथ सोडून न जाणारे

असतात …तिथेच उभे असतात
रोज दिसतात …. दूररररर असले तरीहि दूर नसतात….

शुक्रताऱ्या सारखे आयुष्यात जमून बसतात …. !!

विषय: 
शब्दखुणा: 

कदाचित हे असंच असेल सगळीकडे...

Submitted by मुग्धमानसी on 14 August, 2013 - 08:28

तुला वाटतं तसंच कदाचित हे असंच असेल सगळीकडे...
तुला वाटतं... माझी तगतग, चिडणं, उद्रेक, संताप... अगदी नैराश्यही... अगदी नॉर्मल आहे.
काळजी करण्यासारखं काहिही नाही...
या सगळ्यातून जाऊनही... सगळी नाती टिकतातच की! आपलंही टिकेल.
सवयीनं हळूहळू मीही शिकेनच सगळं स्वीकारणं... तुलाही.
खरंय तुझं.

पण टिकवण्यासाठी ओतलेल्या भरभरून अश्रुंनी खारट झालेलं हे नातं...
चाखता येईल आता कधी असं वाटत नाही.

असो.
हेही असंच असेल कदाचित सगळिकडे!

नवीन राज्य निर्मीतीचे राजकारण

Submitted by नितीनचंद्र on 11 August, 2013 - 08:37

काँग्रेसने नाईलाजाने तेलंगणाला मान्यता दिल्यानंतर विदर्भ असो, बोडोलँड असो अश्या अनेक जुन्या मागण्या रस्त्यावर आल्या. हीच परिस्थीती नेहरुजींच्या काळात होती. इंग्रजांनी निर्माण केलेली चार राज्ये - १८ राज्यात परिवर्तीत झाली. या सगळ्यामागचा आधार होता भाषेवर आधारीत प्रांतरचना जी काँग्रेसला मान्य नव्हती.

अनेक आंदोलने, सत्याग्रह आणि एका उपोषणानंतर चेन्नीला झालेल्या मृत्युनंतर भाषावर आधारीत राज्य निर्मीतीला असलेला विरोध मागे पडला.

भाषेच्या आड अप्रभावी नेत्यांनी सत्ताअभिलाषा सुध्दा या आंदोलनात प्रभावी असावी.

विषय: 

त्या पाच जवानांचे हौतात्म्य

Submitted by शरद on 9 August, 2013 - 10:55

आश्चर्य वाटले! आपले पाच जवान सीमेवर शहीद होतात आणि कुणाला त्यांचं सोयरसुतक नसावं!
चर्चा झाली. कशाची? अँथोनी काय म्हणाले, त्यांनी आपले विधान कसे बदलले, मुंडेंची जीभ कशी पुन्हा एकदा घसरली, भीमसिंगांनी काय मुक्ताफळे उधळली आणि पृथ्वीराज चव्हाण मानेंच्या अंत्यविधीसाठी का जाऊ शकले नाहीत याची!

विषय: 

अशी हि " दुनियादारी "

Submitted by जय@ on 9 August, 2013 - 07:21

" दुनियादारी " हा मराठी चित्रपट हाऊसफुल असून देखील संपूर्ण महाराष्ट्रातील थेटर मधून आज हद्दपार झाला. कारण काय? तर आज शाहरुख खान निर्मित चेन्नई एक्सप्रेस हा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतोय. मराठी चित्रपटाची महाराष्ट्रात हि अवस्था...!
या निमित्ताने काही वर्षा पूर्वीचा एक प्रसंग आपणास सांगू इच्छितो. त्या काळी महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांची निर्मिती होणं व प्रेक्षकांनी हे चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करणं , या घटना दुमिर्ळ होत्या.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर