गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्देवी अपघात होवुन आता ते आपल्यात नाहीत. यावर अजुनपण विश्वास बसत नाहि. सकाळि उठल्यावर वाटल कि काल पडलेल वाइट स्वप्न असल. पन हे खर आहे. अपघात कि घात यात पडायच नाहि, तर इतक्या महत्वाच्या नेत्याचा अन्त एका अपघातात झाला याच दु:ख आहे. यातुन आपन काय शिकनार ?
देशात अपघातात जितके लोक मरतात तितके कुठल्याच कारणान मरत नाहित. बॊम्बस्फोट झाला कि खुप दिवस दळण दळतात. पन अपघात झाला तर कुनीच काहि बोलत नाहि. आता तरि आपन जागे हौ. अपघाताचि कारनं सर्वान्नाच माहित असतात.
धारा ३७० या माझ्या http://www.maayboli.com/node/49176 धाग्याला वेगाने प्रतिक्रिया मिळाल्या. या प्रतिक्रिया ओमर अबदुल्ला सारख्या तिखट होत्या. तांत्रीक बाबींवर आधारीत होत्या. भाजपच्या अजेंडा म्हणुन हिणवणार्या होत्या. आक्षेपार्ह वाक्याचा निषेध करणार्या होत्या. ( माझ्या मुळच्या धाग्यावरच्या काही आक्षेपार्ह भाग वेबमास्टर ने संपादीत केला आहे ) यावर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीर आहे. माझ्या मते तो मुळ्चा भाग नव्हता. धारा ३७० च्या निमीत्ताने आलेल्या विषयाला अनुषंगुन ती एक टिप्प्णी होती.
हिंदुस्थानचे पी.एम.ओ मंत्री जितेंद्रसिंग यांनी धारा ३७० वर चर्चा हवी असे म्हणताच जम्मु काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांची काश्मीर भारतात रहाणार नाही अशी तिखट प्रतिक्रिया उमटली. शेख अबदुल्ला त्यांचे जावई फ़ारुक अबदुल्ला आणि त्यांचे पुत्र व सध्याचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांना काश्मीर म्हणजे जहागिर वाटते यात नवल नाही. इतिहासच असा आहे जो आजच्या नविन पिढिने समजुन घ्यायला हवा.
तर एकदाच गंगेत घोड न्हाल अन केजरीवालांनी बॉन्ड भरला आणि ते जेल मधून बाहेर आले एकदाचे ! आणखी एक यु टर्न केजरीवालांनी मारला.
आता परत काही दिवसात आणखी एक नौटंकी सुरू होणार ह्याची खात्रीच जणू !
कुणावरही आरोप केल्यावर पुरावे द्यावे लागतात, हे त्यांना मुळी मान्यच नव्हते. मै केजरीवाल हूं, असे त्यांनी न्यायालयालाच त्या दिवशी सुनावले होते. न्यायालय म्हणाले की तुम्ही बॉन्ड भरा व निघा, तर ही पद्धतच चुकीची आहे (बॉन्ड वर परोल) आणि मी त्याविरोधात लढणार असे काहीसे म्हणून त्यांनी जेल मध्ये जाणे स्विकारले.
थांबा आणि वाट पहा !
भारताचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी शपथग्रहण करून पदभार स्वीकारण्यापुर्वीच त्यांच्या सार्क राष्ट्रप्रमुखाना बोलावण्याच्या निर्णयावरून उलटसुलट निष्कर्ष काढून रणकंदन करणार्या मंडळीना सांगावेसे वाटते ते इतकेच् की जरा थांबा आणि वाट पहा !
येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
आता पावसाळा येणार . ठाणे महानगर पालिका नेहमीच काहीतरी वांझोटी कामे काढते या दिवसात . घोडबंदर रोड म्हणजे पूर्वी जंगल होते . आता बिल्डर कृपेने ठाणे - २ / नवीन ठाणे झालेय . कितीही रस्ते , concrete करण केले तरी माती आपला गुण दाखवणारच . म्हणजे काय तर - पाउस पडला कि लगेच कितीतरी ठिकाणी जमिनि तून गवत , छोटी झाडे उगवायला लागतात ( रस्ताच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध नाही ) . छान दिसते ते. रस्त्याच्या कडेला उगवलेले गवत , काही झाडे . याची एक प्रकारे मदत पण होते आपल्या ला . हे गवत रस्त्याच्या कडेची माती ghatt धरून ठेवते. त्यामुळे माती रस्त्यवर येत नाही.
नमस्कार...
पुढील पाच वर्षात काहीतरी चांगले झालेले पहायला मिळेल अशी आशा करुया. नव्या सरकारकडुन काय अपेक्षा आहेत.. त्याना short term and long term काय करु शकता येइल याबद्दल आपले विचार लिहा..
माझी विश लिस्टः (In no particular Order)
१. ८०सी मधी गुंतवणुकीची मर्यादा वाढवावी.
२. वाजपेयी सरकारची जी देशाचे चारी कोपरे रस्त्याने जोडण्याची योजना होती ती परत आणावी.
३. Food Corporation of India चे विभाजन करुन अन्नधान्याची नासाडी थांबवावी आणि ती योग्य जागी पोहोचवावी.
४.देशातील वीज निर्मितीत जे अडथळे येत आहेत ते दूर करुन वीज निर्मितीत वाढ कशी होइल ते पहावे.
१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नमस्कार,
माझ्या गाडीचे (पुण्यात) बँकेतर्फे घेतलेले लोन फिटले आहे. आता गाडीचे टायटल माझ्या नावे करण्यासाठी काय प्रक्रिया असते?
काय कागदपत्रे लागतात? कृपया लिहाल का?
धन्यवाद.