आरोग्य

तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?

ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.

कॅन्सर रुग्णाच्या मुलांसाठी केअर पॅकेज

Submitted by स्वाती२ on 24 September, 2011 - 11:26

माझ्या नवर्‍याच्या प्लॅन्टमधे काम करणारा एक कामगार शेवटच्या स्टेजचा थायरॉईड कॅन्सर रुग्ण आहे. त्याच्या १४-१६ वयोगटातील मुलांसाठी आणि पत्नीसाठी केअर पॅकेज पाठवायचे आहे. तेव्हा काय गोष्टी द्याव्यात? तसेच रुग्णासाठी काय द्यावे?

विषय: 

लांब केस कापवतानाचे अनुभव

Submitted by क्षिती on 8 September, 2011 - 12:29

नमस्कार,

माझे केस खुप लांब (कंबरे पर्यंत) व दाट आहेत. पण आता लग्नानंतर व नोकरी मुळे अजिबात लक्ष द्य़ायला वेळ होत नाही. लक्ष देता येत नाही म्हणुन कधी कधी थोडी चिडचिड पण होते.

मी कधीच केस छोटे ठेवले नाहित. अगदी शाळे पासुन लांब सड़क केस आहेत. आता केस कापुन छोटे करण्याच्या विचारात आहे. नवरा पण मागे लागला आहे लुक चेंज कर म्हणुन. मी माझे केस कापवुन एकदम बॊय कट किंवा बॉब कट करण्याचा विचार करते आहे (तेच सध्या मॆनेज करु शकेन अस वाटत आहे).

विषय: 

"मैत्र जिवांचे" सामाजिक संस्था : गणेशोत्सवानिमीत्त उपक्रम

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 August, 2011 - 02:38
तारीख/वेळ: 
18 August, 2011 - 14:30 to 31 August, 2011 - 02:30
ठिकाण/पत्ता: 
महाराष्ट्र

प्रिय मायबोलीकर,

"मैत्र जिवांचे"या आपल्या सामाजिक संस्थेचे उद्घाटन झाल्याला बराचसा अवधी उलटला आहे. संस्थेच्या पुढील उपक्रमाबद्दल विचारणा करण्यासाठी आम्हाला अनेक उत्साही मायबोलीकरांचे दुरध्वनी येत असतात. अनेक जण आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने संस्थेच्या कार्याला हातभार लावायचा प्रयत्न करताहेत.

प्रांत/गाव: 

आपले सण, एक तंत्र आणि मंत्र.

Submitted by सत्यजित on 17 June, 2011 - 02:47

गेले काही दिवस बर्‍याच ठिकाणी, आपल्या संस्कृतीला लोक नाव ठेवताना दिसली. धर्मावरुन वाद विवाद वाचले. वट सावित्री कसा बुरसटलेला सण आहे हे वाचले. कीव आली आजच्या सो कॉल्ड "आधुनिक विचार सरणीची".

ते सात जन्म आणि यम या पलिकडे आपण जात नाही, ग्लोबल वॉर्मींग बद्दल चर्चा हिरीरीने करतो. मग मॅरेथॉन काय, अर्थ डे, ग्रीन डे काय? हे डे साजरे करणे म्हणजे पुढारलेपण का? वट सावित्री राहो पुराणात पण "Big Banyan day" असं तरी काही साजर करा. एक झाड (सण) मोडलत तरी एक नविन झाड लावालाना, सगळ उजाड करणारी आधुनिकता कसली?

उपवास विचार

Submitted by अर्चना दातार on 12 June, 2011 - 03:50

आपल्या नित्याच्या जीवनात निरनिराळ्या व्रतोत्सवांच्या निमित्याने निरनिराळे उपवास केले जातात. उपवास हे अनेकवेळा व्यक्तिगत पातळीवर आणि काहीवेळा सामजिक पातळीवरही केले जातात. उपवास हे एक साधे आणि सर्वसामान्याना करता येण्यासारखे व्रत आहे. उपवासचा सर्व् सामान्य अर्थ म्हणजे काही काळ अन्न , पाणी वर्ज्य करून राहणे होय. आरोग्याच्या दृष्टीने उपवास म्हणजे लंघन होय. उपवास हि धार्मिक आचरणातील एक शिस्त आहे. तन- मनाची शुद्धी आणि धार्मिक आचरण या दृष्टीकोनातून उपवास केला जातो. उपवास विचार फार प्राचीन काळापासून केला गेला आहे.

विषय: 

औषधि -आवळा

Submitted by अर्चना दातार on 11 June, 2011 - 01:20

औषधी आवळा
निसर्गाची किमया अगाध आहे हवामानातील बदलाचा मानवी जीवांवर खूपच प्रभाव असतो. त्या बदलाला सामोरे जाण्यासाठी निसर्गच आपल्याला मदत करतो. कार्तिक महिन्यात थंडीला चांगली सुरवात होते. त्यामुळे सर्दी, पडसे, खोकला असे विकार उद्भवतात. क जीवनसत्वाच्या अभावी हे विकार जास्त जोर धरतात. परंतु या दिवसात येणाऱ्या आवळा या फळामुळे ती कमतरता भरून निघते.

विषय: 

औषधी- तुळ्स

Submitted by अर्चना दातार on 10 June, 2011 - 04:01

औषधी - तुळ
तुळस सहज प्राप्त होणारी परंतु उच्चकोटीचे औषधी गुणधर्म असणारी वनस्पती आहे. तिचे पान, खोड बी, सर्वच औषधी आहे. तुळस पूजनीय वनस्पती असून तुळशीमुळे सभोवतालचे वातावरण स्वस्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते.
तुळशीच्या उत्त्पत्तीविषयी पुराणात काही कथा सांगितल्या आहेत. समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून तुळस निर्माण झली . पुढे ती ब्रम्हदेवाने विष्णूस अर्पण केली तिच्यात सर्व देवतांचे वास्तव आहे.
जालंधर राक्षसाची पत्नी वृंदा हि महान पतीव्रता होती. हिच्या केसापासून तुळस निर्माण झाली असेही म्हणतात.

विषय: 

औषधी वड- पिंपळ

Submitted by अर्चना दातार on 9 June, 2011 - 08:33

औषधी वड - पिंपळ
भारतीय स्त्रीच्या जीवनात वटवृक्षाला विशेष महत्व आहे चिरंतन सौभाग्य साठी भारतीय स्त्रिया वडाची पूजा करतात.

विषय: 

आ॓बा- औषधी वनस्पती

Submitted by अर्चना दातार on 8 June, 2011 - 05:19

आंबा
प्रत्येक ऋतुमध्ये त्या त्या हवामानानुसार आरोग्यसंवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक असणारी फळे आणि वनस्पती निर्माण करून निसर्गाने माणसावर अनंत उपकार केले आहेत.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य