मायबोलीवर लिहिलेली हि माझी पहिली कथा.(कथा या निकषात बसतेय का ?) कदाचित जून्या मायबोलीवर अजून असेल. त्या काळात युनिकोड नव्हते. आम्ही शिवाजी फाँट्स वापरायचो, त्यामूळे ती कथा आता वाचायला कठीण जाते.
साधारणपणे पहिले लेखन असते तशीच ही आत्मकथा. यातल्या सर्व घटना खर्या. यातला हिंदीचा अतिरेक कदाचित खटकेल, पण मूळ संवाद जसे घडले तसेच लिहिलेत.
या घटना परदेशात घडलेल्या. त्या काळात मोबाईल, केबल टिव्ही वगैरे काहीच नव्हते. कथेतील कुटूंबाशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पुढे तूरळक संपर्क होता, पण मग तो पारच तूटला. त्या काळात हि कथा लिहिलेली.
मायबोली वरच्या कथाबीज ३ साठी लिहिलेली ही कथा. तिथे ५०० शब्दांचे बन्धन होते त्यामुळे काहि गोष्टी नीट लिहिता आल्या नव्हत्या. म्हणुन परत लिहितेय. अशा प्रकारच्या कथेचा, भाषेचा हा पहिला प्रयत्न आहे. चुका असतील तर दाखवुन द्या.
मुद्दे - लहान मुलगा, बाजाराचा दिवस, कपड्याचे दुकान, आईस्क्रीम
****************************
"बाबा किती घाईनं चालातोयास रं? जरा सावकाशीनं चाल कि." डोक्यावर गाठोडं घेऊन घाईघाईत जाणाऱ्या भैरूच्या मागे मागे धावताना एवढासा सम्या दमून गेला होता.
"आरं, आधीच उशिरा निघालोया घरातनं. लवकर नाय पोचलो तं दुकान पसरायला जागा बी गावायाची न्हाय बघ."
"अरे यार! स्पिड वाढव !", अम्रेश ओरडला ," common~~ अजून स्पिड !"
"८५ ला आहे", विराज समोर डोळे फाडून गाडी चालवत होता. एका हातात स्टिअरींग आणि एका हाताखाली गिअर रॉड सतत चेजं केल्याने त्याला कमालीचा घाम सुटला होता.
अम्रेशने रिअर ग्लासमधुन मागे बघीतले. "मागे पोलिस अजुनपण आहेत", अम्रेश म्हणाला, "चल यार! अजुन फास्ट". जंगलमधून जाणाय्रा त्या रस्त्यावर ४०० मिटरांच्या अतंरावर सायरन वाजवत रेड लाईट असलेली पोलिस कार त्यांचा पाठलाग करत होती. दुरून येणारा त्याचा आवाज हळुहळू कमी होत होता.
आज मी अचानक लक्ष्मीकडे जायचे ठरविले. खूप दिवसात तिच्या हातचे रुचकर पदार्थ खाल्ले नव्हते, तिच्याशी निवांत गप्पा मारल्या नव्हत्या की तिच्या घरातील देवघरातून येणारा मंदसा चंदन, कापूर, धूप - अगरबत्ती व सुवासिक फुलांचा दरवळ श्वासांत भरून घेतला नव्हता. लक्ष्मी म्हणजे माझी वयाने माझ्यापेक्षा बरीच मोठी असणारी, पण अतिशय बोलघेवडी, माणूसवेडी, अगत्यशील दाक्षिणात्य मैत्रीण! आमची मैत्री खूप जुनी असल्यामुळे तेवढीच अनौपचारिक!
माझ्या वाचक मित्रांनो तुमची एक मदत हवी आहे. इथे सिंगापूरमधे आम्ही मराठी साहित्य वाचनाचा कार्यक्रम करतो आहे येत्या गणेशोत्सवाच्या वेळेस. यावेळी फक्त कथा (लघुकथा ज्या १० ते १२ मिनिटात वाचून होतील इतका त्यांचा आवाका) वाचणार आहोत.
'वाट'
दोआ विमानातल्या तिच्या सीटवर सावरुन बसली. नेहमीसारखीच सावध. ती अजुनही निश्चिंत झाली नव्हती. उलट या क्षणी मनात भावभावनांचा कल्लोळ उठला होता. सुटकेचा आनंद, अविश्वास, हुरहुर, अधीरता आणि कुठेतरी थोडी भीती. हे सगळं निरर्थक तर ठरणार नाही नां? खोल श्वास घेत एअर होस्टेसनं आणुन दिलेल्या कॉफीचा सुवास तिनं आतपर्यंत भरुन घेतला.
*********************