अचानक कोणत्यातरी धक्यामुळे नम्रताला जाग आली.जाग आली म्हणजे तिला तसा वाटले पण डोळे उघडायला तयारच नव्हते. मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले . तिला वाटले आपण आताच तर झोपलो होतो इतक्या लवकर सकाळ कशी झाली . तिने डोळे चोळत इकडे तिकडे बघितले . तिला एकदम थंड स्पर्श जाणवला . तिने बघितले तर ती एका फारशी वर झोपली होती . तिला थोडे आश्चर्य वाटले . झोपताना तर ती तिच्या रूम मध्ये पलंगावर झोपली होती . त्या खोलीचा काहीच पत्ता नव्हता . ती ज्या जमिनीवर झोपली होती ती जमीन जुन्या काळ्या दगडांची होती . ते दगड एकमेकांत बसवले होते . जमिनीतील दगड वापरून अगदी गुळगुळीत झाले होते .
उतरणीवरुन सुर्य गेल्यानंतर रात्रीने सगळ्यांच्या जगाचा ताबा घेतला पण उद्या होणारी सकाळ नक्की काय घेउन येईल ह्याचा मागमूस कोणालाही नव्हता.
- कथेचा पहिला भाग इथे आहे..
- कथेचा अंतिम भाग इथे आहे...
-------------------------------------------------------------------------------
.....भराभर पाऊलं उचलत ती निघाली... छातीशी पदर घट्ट आवळून... जणू सांडल्या असत्या भावना रस्ताभर.. हातातले पत्र अजूनच चुरगाळत!!
पापणीतले पाणी परतवत...रस्ता कापत ती देवळाच्या आवाराशी येऊन थांबली!
तिथे पोहोचताच, संथ नदीवरून आलेल्या हवेच्या झोताने जरासं हलकं वाटल्यासारखं झालं तिला..
देवळाच्या अगदी पायरीशीच बसली ती!
- कथेचा दुसरा भाग इथे आहे...
- कथेचा अंतिम भाग इथे आहे...
----------------------------------------------------------------------------------
.....आणि तिने तानपुरा खाली ठेवला... ठेवताना झालेला झंकार, खोलीच्या चारही भिंतीना धडकून परतला...
आजही तिची माळावरची खोली सुरांनी न्हाऊन निघाली....
कर्रर्र
जोसेफविलामधिल घराची बेल वाजली. "शेखर आजगावकर" अशी पाटी लावल्येल्या घराचा दरवाजा उघडला.
''काय आज उशीर?" अंजलीने शेखरच्या हातातील बॅग घेत विचारले.
''हो, अग त्या स्मिथ अॅन्ड असोसिएट्च्या अॅनालिसिसच काम आलं.ड्योक्याचा पार पिट्टा पडला.संपता संपतच नव्ह्त. त्यात या पावसाने वैताग आणलाय.लींक रोडवरुन यायच म्ह्नजे आणखि ताप.
"बरं! तू फ्रेश हो तेवढ्यात मी पानं घेतेच"
"ठिक आहे. यश कुठय?"
"उद्या ओबेरौयला जायचय ना? होमवर्क करतोय"
"एरवी कंटाळा अभ्यासाचा. पण आता ओबेरौय म्ह्ट्ल की लगेच तयार!"
"हो ना सगळ्या मित्राना सांगूनसुधा झालय"
"छान. पण आता उदयाच्या वेळेच काय?"
"का? ''
एकेमेकांशी असलेले नातं,प्रेम,ऋणानुबंध यांचा थोडक्यात अर्थ म्हणजे दोन किंवा त्याहून जास्त व्यक्तींची असणारी एकमेकांबद्दल समज,गरज, आस्था आणि अपूर्णता. इतक्या सहज ह्या वस्तुस्थितीची व्याख्या करण तसं खूप अवघड आहे.
बहिणीच्या लग्नाचे कारण सांगून तिने मंगळसूत्र बनवून घेतले होते, विकण्याचा बहाणा करून चार ठिकाणून खरे असल्याची खात्री करून घेतली होती. सोने अस्सल होते. तिने नवीन साडी चोळी घेतली होती, आणि दूर वरच्या एका तिर्थस्थाना बद्दल सगळी माहिती मिळवली होती, आणि एक चांगला ग्राहकही हेरून ठेवला होता.
तिचे घर आता दूर राहिले होते, आई, बाप, बहीणी, भावांशी संबंध तुटून फार वर्षे होऊन गेली होती. जुन्या मैत्रिणींची आता लग्नं होऊन त्या आता आपापल्या संसारात रमल्या होत्या.
मला आठवतंय तेव्हापासून माझ्या आजोबांकडे एक सुंदर काठी होती. त्यांना ती कोणीतरी मोठ्या व्यक्तीने भेट दिली होती. नक्षीदार मुठीची, सुबक बाकदार आकाराची, किंमती लाकडाची आणि एकदम ऐटदार! आजोबा आणि त्यांची काठी ह्यांचे अगदी जुळ्याचे नाते होते. जिथे जिथे आजोबा जातील तिथे तिथे ती काठी त्यांच्याबरोबर प्रवास करत असे. मला आणि इतर सर्व भावंडांना त्या काठीचे विलक्षण आकर्षण होते. पण आजोबा तिला जीवापाड जपत. आम्ही खोडसाळ पोरांनी त्यांच्या काठीला हात लावलेला त्यांना बिलकुल खपत नसे.