विमान घसरले
अनेक देश प्रगती करतात तसा नायजेरियाही प्रगती करतोय, पण मध्यंतरी एक काळ असा होता, कि तिथे
प्रगती उलट्या दिशेने होत होती. चालू असणारे उपक्रम बंद पाडण्यात त्यांचा हातखंडा आहे असे गमतीने म्हणत असत. एकेकाळी उत्तम चाललेली रेल्वे त्यांनी बंद पाडली. ( मी ऑफिसला जाताना मला रेल्वेचे रुळ पार करावे लागत. २ वर्षांत फक्त एकदाच मला इंजिनाचा आवाज आला आणि इंजिन चालताना दिसले. एरवी त्या रुळावर बाजार भरत असे. )
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!!
खरंच ही बातमी वाचून बरं वाटलं.
पूर्वी तुलाच शोधत असायचे तुझा शोध पहिला इतर सर्व नंतर
तू पूर्ण हवास अगदी हक्काचा … वेडा हट्ट … पण
तू माझ्या आयुष्यातला तुझा वावर कमी केलास, हळूहळू अबोला
आणि एक दिवस पूर्ण दुरावा …
मी तीळ तीळ तुटत राहिले … तरीही
माझ्या लेखी तुझा शोध संपला नाही. …
तू पूर्ण निघून गेल्यावर मी शोधत राहिले तुझ्यातला अंश
कुणात तरी दिसेल … कदाचित
मग तुझा प्रत्यक्ष शोध संपला आणि सुरु झाला शोध तुझ्या अंशाचा
तुझ्यासारखे वागणे कि दिसणे किंवा मग तुझ्यासारखेच बोलणे
कुणात तरी दिसशील तू कुठेतरी भेटशील तू … दिवसेंदिवस शोध वाढत राहिला
तुझे वेगवेगळे अंश मला भेटत होते माझ्या जवळ येत होते … आणि
तसा मी अगदीच नास्तिक नाहीये, पण तरीही देव, दानव, साक्षात्कार, चमत्कार अश्या गोष्टींवर चटकन विश्वास टाकणं नाही जमत मला. पण मग जेव्हा पंडीतजींचं 'भाग्यद लक्ष्मी बरम्मा' कानी पडतं, किंवा सैगलचे 'सो जा राजकुमारी' चे सुर कानावर रेंगाळायला लागतात किंवा जेव्हा शास्त्रीय संगीताचे कसलेही शिक्षण न घेतलेले किशोरदा लताबाई, मोहम्मद रफी सारख्या दिग्गजांच्या नाकावर टिच्चून ताकदीने आपले साम्राज्य उभे करतात किंवा कुणी गुलझार जेव्हा एकीकडे "आंपकी आँखोंमें" सारखं वेड लावणारं लिहीताना त्याच ताकदीने 'कजरारे कजरारे' सारखं भन्नाट काहीतरी लिहून जातो तेव्हा साहजिकच मनात एक प्रश्न उभा राहतो...
हि घटना आहे १९९६ ची. मी त्यावेळी नायजेरियामधल्या पोर्ट हारकोर्ट या भागात होतो. हा भाग खनिज तेल समृद्ध आहे. पुढे हे शहर अपहरणासाठी कुप्रसिद्ध झाले. मी होतो त्या काळातही ते सुरक्षित नव्हतेच.
मी एका फ्रेंच कंपनीत नोकरीला होतो. आमच्या कंपनीत मी सोडल्यास दुसरा कुणीही भारतीय नव्हता. ४० फ्रेंच, १ इतालियन, १ जर्मन, १ ब्रिटीश आणि एक साऊथ आफ्रिकन होता. माझ्यासोबत ब्रिटिश आणि इतालियन माणूस रहात असे. आम्ही रोज एकत्रच कामावर जात असू.
घर ते ऑफिस अंतर फार नव्हते, पण तिथल्या "गो स्लो" ( गो स्लो म्हणजे नायजेरियन ट्राफिक जाम ) मूळे
या मातीचा गंध आगळा, नित्य इथे दिव्य सोहळा
कळ्या डोलति वेली वरती, मोहोर झुलतो अंब्या वरति
अमृतकुंभ उभ्या नारळी, पीत लेवुनी सज्ज पोफळी
वारा घाली मंजुळ शीळ, पाट वाहतो दुडक्या चाली
साद तयाला किलबिल वाणी, मनात घुमते अभंग वाणी
या मातीचा गंध आगळा, गोडवा शहाळी पाण्याला
आकाशी अन् रंग निळा, इथेच घ्यावा श्वास मोक्ळा.
मी नायजेरियातल्या अगबारा या गावी नोकरी करत होतो त्या काळातली हि घटना. या गावी मोठे मोठे कारखाने आहेत. ग्लॅक्सोचाही कारखाना आहे. आमच्याच कंपनीचे अॅसिड प्लांट, ग्लास प्लांट, फर्टीलायझर डेपो, सिलिकेट प्लांट, आयर्न डेपो अशी काही युनिट्स होती. ६० च्यावर भारतीय होते आणि ३०० च्या वर नायजेरियन होते.
प्रत्येक विभागाचा कारभार बघायला स्वतंत्र मॅनेजर होतेच, पण तरी या सगळ्यांची मोट एकत्र बांधायला म्हणून एक रिटायर्ड कर्नल दाखल झाले होते. त्यांना कर्नलच म्हणायचे असा त्यांचा आग्रह होता.
रोज मी पुसते तिथे ते खोल रुजलेले ठसे...
उगवते तरिही तिथे जे... त्यास उपटावे कसे?
बिलगते स्वत:स मी होऊन माझी माऊली
पण चुका अपराध हे पदरात मी घ्यावे कसे?
शेवटी तूही मला हसण्यावरी नेलेस ना?
मी किती गंभीर आहे... सांग सांगावे कसे?
लख्ख सारे आरसे करूनी असा गेलास तू...
मी तुझ्या बिंबास आता सांग शोधावे कसे?
राखुनी असतात अंतर जवळ असणारे सुधा..
दूर असणार्या कुणाचे पाश तोडावे कसे?
My Confession
तो वार रविवार, सप्ताहाचा शेवट चा वार असल्याने त्या दिवशी सर्व दुकाने सहसा बंदच होती. रस्त्यावर वर्दळ तशी कमीच होती कारण घनदाट भरून आलेल्या आभाळाने आपल्या गरुडा सारख्या ढगांनी सुर्याला झाकून घेऊन जमिनीवर असह्य पणे सरी कोसळत होत्या. जणू तो जमिनीवर त्या दिवशी रागच काढत होता. पावसा पासून वाचण्यासाठी मी बसस्टोप चा आधार घेतलेला होता आणि तोच मला एक आधार होता, कारण पंचवटी कडे जाणारी बस ही त्या थांब्यावर थांबूनच जाणार होती आणि एखादा मुलाने भूक लागल्यावर जेवणाची वाट पहावी तशी मी त्या बस ची वाट पाहत होतो.
"आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी संमेलन आहे. जायचं का एकत्र?"
"कोण बोलतंय?" उल्हासने चढ्या आवाजात विचारलं.
"अरे, सीमा बोलतेय. मला वाटलं फोन कुणाचा ते पाहिलं असशील."
"नाही पाहिलं. बोल."
"आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी संमेलन आहे त्याला जायचं का एकत्र?"
"कधी?" तिरसटल्यागत त्याने विचारलं.
"आहेत अजून दोन महीने. आणि तुझं काही बिनसलं आहे का? किती मग्रुरी आवाजात. बोलायचं नसेल मनात तर तसं सांग ना. ही कसली नाटकं."
"ए, आता तू नको सुरु करु बाई. तो सावंत एक डोकं खाऊन गेला. तो बाहेरचा. तुम्ही घरचे."
"काय झालं? भांडलास?"
"सोड गं ते. कधी आहे तुझं ते संमेलन? तारीख सांग."