गोत्र माझे भागवत
आज सोनियाचा दिन
दिंडी येतसे वेशीला
संतमेळ्यासवे विठू
स्वये जाई पंढरीला
दिंड्या पताकांचे भार
आले वैकुंठ घरास
विठु नामाचा गजर
काय वानावी मिरास
भाळी अबीर चंदन
मुखे हरिचा गजर
नुरे संसाराचा पाश
विठु व्यापी अवकाश
तुका-माऊली गजर
धन्य गर्जते अंबर
डोळे वाहती भरुन
भक्ति अंतरापासून
विठु सखा भगवंत
गोत्र माझे भागवत
वारकरी गणगोत
नमनाची रीतभात
वारी जाते पंढरीला
चित्त वाहिले विठ्ठला
दुजे नाठवे जीवाला
नामरुप श्वास झाला .....
कथाकोलाज ( सादरकर्ते : चिन्मय मांडलेकर, मृणाल दुसानीस, सीमा देशमुख आणि जितेंद्र जोशी )
कार्यक्रमाची सुरवात झाली सीमा देशमुख यांच्या गणेशस्तवन गायनानी, किती मल्टीटॅलेंटेड असतात लोक.. सीमा देशमुख उत्तम कथ्थक डान्सर, अभिनेत्री आहे माहित होतं , इतकी सुरेख गाते हे माहित नवह्तं !
कथाकथन किंवा नाट्यवाचन प्रोग्रॅम्स बघून खरच जमाना झाला, अनेक वर्षांनंतर असा आगळा वेगळा प्रोग्रॅम ऐकला !
नमन वर्कशॉप -
अजय गल्लेवाले, लतिका भानुशाली, अतुल कोठावळे, नंदन होडावडेकर
जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर
"भाऊsssss लौकर चालसान होssss थे कपिला कसच्याकशी करू राहली"
असा कल्ला शंकर दादांन केला तवा म्या भाकर खायाले बशेल होतो. वरनाचा घट पेंड संग फोडेल कांदा, तेल अन बुडी च्या हातची गरम भाकर. बाबा सकाउनच कामापाई अकोल्याले गेलते ते झाकट पडल्यावरीच आले, त्याहीले ज्योन बनून देल्ते माय न अन त्येच् ज्योन झाल्यावर म्या चुली म्हावरे बशेल होतो. थंडी च्या राती चुली म्हावरे बश्याले लै ख़ास वाटते. बाबा वसरीवरी बंगई वर बशेल होते थ्याइचा पान लाव्याचा कार्यक्रम ठरेल होता रातीचा, अन नेमका तवाच शंकर दादा चिल्लावत येऊ रायल्ता आमच्या बेबटीच्या अंद्रे.
निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551
संत परंपरेत लोक जागर केलेले संत खूप आहेत, पण ते स्वतः, स्वतःला संत मानत नव्हते. आपल्या पेक्षा अधिक ज्ञान असणारे व्यक्तिमत्व, यांना संत वृतीने पहिले जात असे. अशा अनेक संतांच्या नजरेत विठ्ठल ,पंढरी कशी होती ते आज आपण पाहू .
संत सेना महाराज यांनी त्याच्या रचनेत पंढरीस जाणे ,विठ्ठल दर्शन घेणे ,भक्तीत तल्लीन वारकऱ्यांना पाहणे हि सुद्धा एक जीवाला मनःशांती देणारी घटना आहे, हेच सर्वांच्या मनावर अतिशय सोप्या भाषेत बिंबवले आहे. त्यामुळे या पंढरीच्या सोहळ्याचे वर्णन करताना ते म्हणतात -
जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
काहीतरी कारणाने वीकेंड ला जोडुन एका दिवसाची सुट्टी मिळाली होती. तसा थोडाफार ऑफ सीज़न असल्यामुळे विमानांची तिकिटे अगदी डर्ट चीप म्हणतात तशा दरात उपलब्ध होती. मग मॅड्रिडला जायचं का बार्सेलोनाला अशी तूफानी चर्चा घरात सुरू झाली. खरंतर आम्हाला काय दोन्ही बघितले नसल्यामुळे तसा काहीच फरक पडत नव्हता. शेवटी आम्ही हेड्स का टेल्स असा अत्यंत डोकेबाज उपाय वापरून निर्णय घेऊन टाकला. तिकिटे, होटेल बुकिंग वग़ैरे करुन शुक्रवारी रात्री उशिरा मॅड्रिड मधे येउन पोहचलो सुद्धा.
संस्कृत ही जवळजवळ सर्वच भारतीय भाषांची (लिप्या म्हणत नाही) जननी आहे. तस्मात, पुढील चर्चेच्या अनुषंगाने संस्कृत ही भाषा प्रमाण मानून चालण्यास कोणाचीच हरकत नसावी. (उर्दू ही भारतीय भाषा मानत नाही आणि लिपी तर खचितच नाही - ठाम मत!)
हिंदीभाषिकांसोबतच्या दीर्घ सहवासात जाणवलेली आणि आढळलेली काही निरीक्षणे, त्यांना समजावण्याच्या अथक आणि निष्फळ प्रयत्नांअंती येथे मांडत आहे. (हिंदीभाषिकांची मराठीप्रति माया पाहता मायबोलीवर कुणी हिंदीभाषिक प्रतिनिधी असेल असे वाटत नाही. त्यामुळे पक्षपाती उहापोह घडेल अशी भीती वाटते.)
हरवलेला किनारा…….. (भाग १) http://www.maayboli.com/node/54496
मग २-३ दिवसांनी कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे पूजा होती . त्याच दिवशी समीरने आकांक्षाला विचारायचं ठरवलं . म्हणून तो त्या दिवशी संधी शोधत होता . समीर कॉलेजच्या तिसर्या मजल्यावरती एक मित्राशी बोलत उभा होता तेवढ्यात ,
"समीर-अजय चला खाली देवाच्या पाया पडायला इथे काय बोलत उभे राहिलात" एका सिनिअर madam त्यांना सांगून निघून गेल्या, पण समीरला खाली जायचा कंटाळा आला होता,
"चल कोण जातंय खाली मला खूप कंटाळा आलाय आता!! नंतर जाऊया", असं म्हणून तो पुन्हा मित्राशी बोलत तिथेच रेंगाळला .
मागच्याच आठवड्यामध्ये जागतिक वडील दिन साजरा झाला (२३ जून फादर्स डे झाला ) त्या निमित्ताने वडिलांबद्दल काही ४ गोष्ठी मांडत आहे अर्थात या सगळ्या गोष्टी मी झी मराठीवरील एक कार्यक्रमात एक मुलीने सांगितलेल्या आहेत पण मला हि खूप आवडल्या आणि पटल्या हि आणि त्या अनुषंगानेच इथे मांडत आहे .