लेखन

सोबतीचे

Submitted by रोहिणी निला on 8 September, 2015 - 06:56

जाऊ नकोस आता इतक्यात दूर दूर
झाले असे कितीसे क्षण साथ सोबतीचे

बहुतेक काल आले लोटून माप दारी
चालून सप्तपदीने शतजन्म सोबतीचे

गोतावळा सग्यांचा होता हवाहवासा
पण वेड लागलेले त्या एक सोबतीचे

भांडून हासलो अन रडलो पुन्हा नव्याने
गजरेच जाहले मग संदेश सोबतीचे

जुळवून पावलांना एकेक पावलाशी
चालू, दिसेल आता ते गाव सोबतीचे

विषय: 

सोबतीचे

Submitted by रोहिणी निला on 8 September, 2015 - 06:56

जाऊ नकोस आता इतक्यात दूर दूर
झाले असे कितीसे क्षण साथ सोबतीचे

बहुतेक काल आले लोटून माप दारी
चालून सप्तपदीने शतजन्म सोबतीचे

गोतावळा सग्यांचा होता हवाहवासा
पण वेड लागलेले त्या एक सोबतीचे

भांडून हासलो अन रडलो पुन्हा नव्याने
गजरेच जाहले मग संदेश सोबतीचे

जुळवून पावलांना एकेक पावलाशी
चालू, दिसेल आता ते गाव सोबतीचे

हुंदके

Submitted by गजानन रताळे on 8 September, 2015 - 01:12

हुंदके

शब्द सारे भूकेच होते
बोलणारे मुकेच होते

आटले आसवे घनांचे
दाटले हुंदकेच होते

गाव माझे दिसे न तेव्हा
भोवताली धुकेच होते

मी न दारी उभा सुखाच्या
दुःख ही लाड़केच होते

दान त्यानी दिले जरी पण
हात हे फाटकेच होते

काय बोलू अजून आता
अंतरात इतकेच होते
-गजानन रताळे

विषय: 

सकाळ - त्यांच्या नजरेतुन.

Submitted by जव्हेरगंज on 7 September, 2015 - 13:00

ललित-
सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली.
नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले.
किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती.
ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती.
टक्क जागा झालो.

ग्राम्य-
रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं.
उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं.
मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.
जाउंदी तिच्यायला, बारक्या हाईच की.
कांभरून घीउन तसचं झुपलु.
तसं म्हातारं खेकसलं.
ताडदिशी ऊठलू.

वैताग-
अंग कसं ठणकत होत.
पाठीचा खुबा पण जडावला होता.
हि किरणं कशी काय आली आत.
साली सकाळ पण लवकरचं झालीय.
आता ही अंबाबाई डोकं खाणार.

मरणावर बोलू काही ...

Submitted by दिनेश. on 7 September, 2015 - 07:39

शीर्षक वाचून दचकलात ना ? सणांच्या दिवसात कसले अभद्र बोलतोस ? असेही म्हणाल. कुटुंबात कुणी नुसते विल करायचेय असे म्हणाले तरी घरातील लोक असेच बोलतात. प्रकाश घाटपांडे यांचा धागा आणि त्यावर साती आणि दीमांनी जे सुंदर प्रतिसाद दिलेत ते वाचून, माझ्या मनात बरेच दिवस येत असलेले विचार लिहून काढतोय.

माझ्या जन्मदिवशीच एक विचित्र घटना घडली. त्या पुर्वी आई सांगते ती आठवणही सांगायला हवी. आम्ही
मालाडला दत्त मंदीर रोड वर रहात होतो. त्या देवळातली दत्ताची मूर्ती फार सुंदर आहे. दर गुरुवारी आम्ही तिथे
जात असू. मी पोटात असताना अशीच आई तिथे गेली होती आणि देवाच्या समोर असतानाच अचानक आईच्या

लोकल डायरी -- २४

Submitted by मिलिंद महांगडे on 7 September, 2015 - 03:34

"येडाय का तु?"

Submitted by जव्हेरगंज on 6 September, 2015 - 05:56

कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली. हरितालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला. तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला. कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला.

कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन.
पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या.

वैरागी प्रसन्न मुद्रेनं महाद्वाराकडे निघाला.
द्वापारयुगात इंद्रप्रस्थाचे सिंहासन क्षणभर हेंदकाळले. होमहवनात साधुसंत अविरत मंतरले.

द लास्ट पोस्ट

Submitted by सोन्याबापू on 5 September, 2015 - 23:53

कारगिल सेक्टर च्या माधोमध एक जागा. एका दगडावर मी सुन्न पण शांत बसलो होतो. रिज कॅप्चर झाली होती अन शेजारी माझी राइफल पड़ली होती. तिच्यातही बेटी एकच गोळी उरली होती. तासाभरापूर्वी तुंबळ रणकंदन माजले होते इथे, आरडाओरडा विरश्रीयुक्त युद्धघोष सगळ्याचीच रेलचेल. जरासे बधीर वाटत होते, तरीही शांतता अन त्या शांततेत कानात घुमणारा कुईंsssss असा आवाज लक्षात येत होता. कदाचित मी त्या आर पी जी अन गोळ्यांच्या आवाजाने बधीर झालो होतो, असेल बुआ, ह्या धामधुमीत माझे लाडके मार्लबोरो लाइट्स चे पाकीट कुठे पडले कोणास ठाऊक! त्या परिस्थितीत सुद्धा मी ते जपून सेल्फ राशनिंग करून वाचवले होते.

विषय: 

जमतंय का?

Submitted by मुग्धमानसी on 1 September, 2015 - 07:14

सांग सांग बाई तुला जमतंय का?
आतातरी मन सालं रमतंय का?

कंटाळा कंटाळा सारा दिस चोळामोळा
रोज रात्री फिरवावा ना पाटीवरती बोळा...
अक्षरेही तीच तीच गिरवावी किती?
गिरवले किती तरी नाही होत मोती!
पुन्हा तरी नव्यानेच गिरवावे सारे
पुन्हा पुन्हा आवरावे मनाचे पसारे
उगवणे मावळणे जन्म सारा शीण
एकच कळले - ’नाही कुणासाठी कोण!’
कळले ना आता?... तरी वळतंय का?
आतातरी मन सालं रमतंय का?

’रात्र झाली फार आता मिट डोळे नीज’
बजावतो मेंदू तरी डोळे भिज भिज
दिसभर पेंगूळते मन वेड्यागत
रातभर मन नाही मनात रमत
कण कण उजळते अंधाराची वात
कुणीतरी काळोखतं खोल आत आत
अशावेळी नेमकी ती तडकावी काच

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन