मित्रहो जातीयवाद होण्याची बरीचशी कारणे आहेत, कोणीही त्यांच्या धर्माने, जातीने किंवा पंथाने जसे सांगितले आहे तसे वागले तर जातीयवाद निर्माण होत नाही. माझ्या माहिती प्रमाणे कोणत्याही धर्माने, जातीने किंवा पंथाने असे सांगितले नाही कि ते सोडून दुसरे वाईट आहे. सांगायचे झाले तर बरेच भारतीय सणवार हे सर्व धर्म मिळून साजरे करतात. यामध्ये कुठेही जातीयवाद येत नाही. आताच्या घडीला जातीयवाद हा वेगळ्या कारणामुळे होतो. माझ्या परीने मी त्याचे विश्लेषण केले आहे. माझे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
नमस्कार सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि कर्जमुक्ती वरून बरीच चर्चा चालू आहे. प्रत्येक जण आपण शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत हे दाखवत आहेत. शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत हे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला माहित नाहीत किंवा माहित करून घ्यायचे नाहीत किंवा माहित असून ते माहित नाही असे भासवायचे आहे. शेतकऱ्याचे बरेच प्रश्न आहेत त्यात मुख्य म्हणजे पाणी, वीज, शेतमालाला भाव हे आहेत. त्याच बरोबर वाढत्या महागाईमुळे त्याला घर कसे चालवायचे हेच कळत नाही आहे.
दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या रेल्वे सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या एका प्रवासातील आठवणींचा हा लेखाजोखा...
-----
साचला का एवढा अंधार आहे?
काजव्यांचा तेवढा आधार आहे!
जागल्या होत्या मशाली काल येथे
आज इथला सूर्यही बेजार आहे!
एकही ठिणगी कशी येथे पडेना?
कोण इथला आंधळा सरदार आहे?
फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही
श्वास माझाही जरा उबदार आहे!
सारखा हिंदोळतो हा प्राण माझा
त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे!
—सत्यजित
(हा लेख मी मराठी पिझ्झावर आधी प्रसिद्ध केलेला आहे )
मी मराठी भाषाभिमानी आहे कि नाही हे हल्ली हल्ली मला ठाम पणे सांगता येईनासे झाले आहे.. मराठी भाषेचा अभिमान म्हणजे सध्या जो काही अर्थ प्रचलित होऊ पाहतोय तोच जर खरा अर्थ असे गृहीत धरले तर, भाऊ! आपण मराठी भाषाभिमानी नाही.( तसेच आजकाल अनेक ठिकाणी म्हणजे शाळा, कॉलेज, मराठी वाहिन्या ते अगदी नवनव्या रेडियो चानेलवरती जे काही मराठी म्हणून ऐकू येते ते जर मराठी असेल तर आपण मराठी भाषकही नाही.-भाषक आणि भाषिक ह्या दोन पूर्णपणे भिन्न शब्दांचा अर्थ तर आजकाल मराठी वृत्त वाहिन्याना तरी माहिती आहे कि नाही अशी दाट शंका येऊ लागली आहे.)
१. आवाहन…
दिशाचे आईवडील पार्टीला गेले अन तिने लगेचच पुजाला घरी बोलावलं. पुजा सगळी तयारी करून आली होती. आल्याआल्या तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. नंतर टेबलावर बॅग ठेवून त्यातलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काचेचा चकचकीत गोळा बाहेर आला. खोलीतल्या अंधारातही तो मंदगूढ उजेड फेकत होता.
“काय आहे हे?”
“याच्या मदतीने आपण भूतांना बोलावू शकतो.”
“काहीपण काय फेकतेस गं.”