मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
लेखन
अनुभव (भयकथा)
जिंदगी या बायकांची राळ आहे का?
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का?
बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का?
शेत आहे काळजाचा एक तुकडा पण
कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का?
वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे
तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का?
फुंकली जाते तरी गंधाळते रे ती...
जिंदगी या बायकांची,राळ आहे का?
आजही तो त्या विटेवर थांबला आहे
त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का?
—सत्यजित
कसे या मनाला कसे जोजवावे!
कसे या मनाला कसे जोजवावे?
जरा दुःखही शांत व्हावे,निजावे!
कुठे भागते आपलेही खरेतर?
सुखांनी सुखांना कितीदा गुणावे!
कधी ओल जाते कधी ऊल जाते
कळेना कसे या मनाला चिणावे!
किनारा कधी सांगतो का कुणाला?
किती सागराने दिले हेलकावे!
तिचे ओठ देतील तपशील नंतर
मुक्याने तिने जर तुला बोलवावे!
विसरणे तसे फार असतेच अवघड
उगां एकमेकां कधी गुणगुणावे!
(असे या मनाला,असे जोजवावे!)
—सत्यजित
प्रवासी
स्वराली : नंदिनी सहस्त्रबुध्दे (मुलाखत)
भरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं! दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय!
जिद्द
कथा आणि व्यथा
. . . . . . जिद्द . . . . . . . . . . . . . .
विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.
वडील
ब्राह्मण -एक मुक्त(क्ता) चिंतन ...
पुण्याच्या विद्यमान महापौर मुक्ता टिळक ह्यांनी आरक्षण आणि ब्राह्मण तरुण ह्यासाम्बंधाने मध्यंतरी जे विधान केले त्यामुळे मी मागे म्हणजे २०१२-१३ साली लिहिलेला लेख आठवला. ह्या लेखात शेवटी शेवटी वर्णन केलेला माझा नातेवाईक तरुण आता परदेशी-जर्मनीत चांगला स्थिरावलाय.