मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
लेखन
सुटला प्रेमाचा वारा
दिसली ती गोरी दारा
पटक्यानी डोळा मारा
जानेवारी संप्ला नी
सुटला प्रेमाचा वारा
भेटत नाही ती आता
तीच्या बापाला मारा
सुख तीचे त्याच्यासंगे
'लव'वाला दावा हारा
पळताती गोर्या पोरी
राहूल्या मागे बारा
―₹!हुल /११.९.१७
गाथा माझ्या गझलेची
(लेख पूर्वप्रकाशित आहे.जुन्याच बाटलीतली जुनीच दारु.)
गझलांची काही संकेतस्थळे जन्माला आली आणि त्यांवर होणाऱ्या गझला वाचून मला न्यूनगंड वाटू लागला. तशा काही कविता/एकाखाली एक ठराविक संख्येने शब्द रचलेली काही गद्ये मी लिहीली होती, पण "हात मर्दा! जिंदगीत एक गझल लिहीली नाहीस? थू तुझ्या जिनगानीवर!" वगैरे धमक्या मन सारखं देऊ लागलं आणि मी ठरवलं. "बास! आता एक तरी गझल लिहील्याशिवाय मी केस बांधणार नाही!"(ती द्रौपदी नाही का, दु:शासनाच्या रक्ताने केस बांधायला मिळेपर्यंत केस मोकळेच सोडते तसे.)
मिरर्चींया - द ट्रॅप (६७२) ... सत्यघटनेवर आधारीत
धामनसोली स्टेशनवरून तो बाहेर पडला. मोकळे आकाश आणि त्याखाली स्मशानाला लाजवेल अशी शांतता. त्या शांततेची राखण करत एक मशीद समोर स्तब्धपणे उभी होती. त्याने आपले जान्हवे सरकवून आत घेतले, आणि घड्याळात वेळ चेक केली. रात्रीचे पावणेतीन वाजले होते. एव्हाना कुत्रेही भुंकून झोपले असतील. बरेच झाले एकाअर्थी. ईथून जवळपास तीन किलोमीटर चालत जायचे होते. रिक्षाही मिळणार नव्हती. भेटला असता तर एखादा कुत्राच भेटला असता. एखादा लघुशंका मिटवायला अर्ध्या झोपेतून उठलेला. हे भटके कुत्रे म्हणजे रात्रीचे वाघसिंह असतात. आपल्याला बघताच भुंकतात. पण एखादा चावरा निघाला तर काय ही भिती सतत डोक्यात राहतेच.
ये जो थोडे से हें पैसे
मुली पाहण्याचा कार्यक्रम..
मुली पाहण्याचा कार्यक्रम हा प्रत्येक विवाहइच्छुक तरूणाच्या वाटेला येतोच आणि त्यात जर तो पहिलाच कार्यक्रम असेल तर
आणखीनच गंमतीदार वाटतो..आणि आजच असा कार्यक्रम पाहण्याचा, अनुभवन्याचा योग माझ्या नशिबी आला..
मुलाने विशी गाठली , मिसरूडे फुटल की, तो विवाहस पात्र झाला अशी एकंदरीत जुनी समजूत अजूनही काही पालकांच्या मनात ठाण मांडून आहे...
मग त्या समजूतीआड चाॅईस, करीअर, "नोट रेडी नाॅऊ" असले कुल शब्द येत नाही आणि असे विचार करणार्या माझ्यासारख्या तरूणांना मग तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागतो...जन्मदात्यापुढे काय करणार बापुडे ?? असो ..
प्रेमाची गोष्टं
आज अभी येणार आहे भेटायला. काल फोनवर महत्वाचं काहीतरी बोलायचय म्हणाला. कॉलेज, इंटर्नशीप बुडवून येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार. आज मुद्दाम मी त्याच्या आधीच तिथे जाऊन पोहोचलेय. इथे उभं राहिलं की कॉलेजच्या गेट बाहेरचा रस्ता अगदी लांबपर्यंत दिसतो.
ह्या सगळ्याला सुरुवात झाली ते कॉलेज जॉईन केल्याच्याच वर्षी. त्याच्यावर क्रश होता म्हणा ना. पण तेव्हा हे फक्त माझ्या आणि संयुक्ता मधेच होतं. सुरूवातीला त्याचं नावही धड माहीत नव्हतं आम्हाला.
तेव्हाचा नाव जाणून घेण्याचा प्रकार आठवून सुद्धा आता हसायला येतं.
'पुलावरचे भूत
मुंबईचा पाऊस. नवी मुंबई झाली म्हणून काय झाले, पाऊस जुन्या मुंबईसारखाच
खरं म्हणजे इतक्या उशिरा घराबाहेर . पडायलाच नको होते. पण बायकोची कटकट आणि पावसाची रपारप ह्यात पाऊसच परवडला . निदान आडोसा तरी घेता येतो.
काम तिच्या मामेबहिणीच्या चुलतभावाच्या भाच्याचे असल्यामुळेहत्तीने तिच्या दृष्टीने अति महत्वाचे होते. आमच्या घरापासून अंतर बरेच दूर होते पण नवीन पूल झाल्यामुळे ते ४/५ किमी वर आले होते. पण रात्री तशी वर्दळ कमीच असायची. पूल बांधताना ३ कामगारांना बळी दिले होते म्हणे.
सल
कथा एका कट्ट्याची
काही वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेत नोकरीस होतो. संस्थेच्या स्थापनेपासूनच मी तिथे गेलो. यथावकाश तिथे स्थिरावलो. कामाचा व्याप हळूहळू वाढत होता. अनेक सहकारी लाभले होते. सुरवातीच्या एकदोन वर्षांत आम्ही उत्साहाने व जोमाने काम करीत होतो. तेव्हा तेथील व्यवस्थापनाची आमच्याशी वागणूक बरी होती. हळूहळू संस्था विकसित झाली तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न झाली. आता मात्र व्यवस्थापनाने त्याचे खरे रूप दाखवायला सुरवात केली. सर्वसाधारण नोकरदारांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आम्हाला जाणीवपूर्वक दिलेल्या नव्हत्या. व्यवस्थापन आमच्याशी चर्चेस उत्सुक नसायचे. क्वचित झालेल्या चर्चा निष्फळ ठरत.