लेखन

अनुवाद म्हणजे काय?

Submitted by खुशालराव on 9 October, 2017 - 15:01

एखाद्या कथेचा अनुवाद करने म्हणजे नक्की काय?
अनुवाद करण्यासाठी काय काय तयारी गरजेची आहे?
अडचणी कोणत्या येऊ शकतात?

मन दु:खावाचुन कुठेच नाही रमले

Submitted by सुप्रिया जाधव. on 9 October, 2017 - 10:27

स्वप्नांचे बांधत इमल्यांवरती इमले
हे सताड़ उघडे डोळेे पुरते दमले

जो हवा हवा तो तुटून गेला तारा
बाकीचे सारे नभांगणी चमचमले

देशांतर केले अन वेषांतरसुध्दा
परतवू न शकले अस्तित्वाचे हमले

आकड़ा तुझ्याशी छत्तिसचा सौभाग्या
पण दुर्भाग्याशी गणित बरोबर जमले

चंद्रावर गेले अन् स्वर्गात भटकले
मन दुःखावाचुन कुठेच नाही रमले

काळाचा बोळा प्रसंगांवरी फिरला
हृदयातिल अत्तर पुन्हा पुन्हा घमघमले

मंदोदरी कधी झाले लोपामुद्रा
ना शल्य स्वतःशी प्रतारणेचे शमले

सुप्रिया

विषय: 

पुन्हा एकदा

Submitted by वैभव जगदाळे. on 8 October, 2017 - 12:43

पुन्हा एकदा तोच एकांत,तेच दुःख,तीच रात्र झाली...
मनाला समजवायला जेव्हा तुझी आठवण आली...
तरीही अश्रूंना थांबवू शकले नाहीत हे डोळे...
अबोल होते ते बोलू लागले माझे भाव भोळे...

वार्याच्या मंद झुळुकेत आणि चंद्राच्या शीतल छायेत...
तुझ्या आठवणींत माझे डोळे अश्रू ढाळत आहेत....
ते अश्रू मोती होतील जेव्हा तुला ते कळतील..
तेव्हा माझ्यासारखे तुझेही दोन अश्रू गळतील...

भास होतात मला तु जवळ असल्याचे...
तुझे डोके मांडीवर घेऊन एकांतात बसल्याचे..
एकमेकांच्या डोळ्यात डोळे आणि हातात हात....
आणि बसलोय मी तुझ्यासाठी एखादं प्रेम गीत गात...

विषय: 

सवत माझी लाडकी..[सु]

Submitted by अविनाश जोशी on 8 October, 2017 - 02:52

सवत माझी लाडकी..
शेखर
डॉ कदमांच्या दवाखान्यात मी नर्व्हस होउन गेल्या तासभर बसलो होतो. हा कद्या कधी वेळेवर येईल तर शपथ. माझा जवळचा मित्र प्रख्यात डॉ होता. त्याने सकाळीच फोन करुन दुपारी तीनला बोलावले होते. आनंदाची बातमी आहे म्हणाला होता. तीनच्या आतच आल्यामुळे तिथली सर्व जुनी मासिके वाचुन झाली होती. बर पठ्ठ्या फोनवर काही बोलायलाच तयार नव्हता. बसल्या बसल्या मी गतकाळात गेलॊ.

विषय: 

संवाद - अफाट आणि अतर्क्य

Submitted by राफा on 7 October, 2017 - 14:36

सलीम-जावेद विषयी लेख लिहिल्यावर आलेल्या उस्फूर्त आणि अप्रतिम प्रतिसादानंतर अजून झटक्यात लिहावे वाटले..
गप्पांचे एक्स्टेंडेड सेशन दारात निरोप घेताना व्हावे तसे!

ऑलरेडी पावरबाज संवादांचे तुम्हीही फ्यान असाल तर सोन्याहून पिवळे. जर उल्लेख केलेला चित्रपटच पाहिलेला नसेल तर उर्वरित लेख वाचायचे बंद करून आधी चित्रपट पाहून आनंद लुटावा ही विशेष विनंती… लेख वाचण्याचे प्रि-रिक्विझिट म्हणून नव्हे… तर एका चित्रपटप्रेमीने दुस-या चित्रपटप्रेमीला केलेला प्रेमळ आग्रह म्हणून (जेणेकरुन एका उत्तम चित्रपटाचा तुम्ही आनंद लुटू शकाल)

कासव

Submitted by मुग्धमानसी on 7 October, 2017 - 02:29

तुम्हाला माहितेय नैराश्य म्हणजे काय असतं? म्हणजे ते हवं ते काम हवं तसं न झाल्याने येणारं तात्कालिक नैराश्य नाही बरंका.... तिन्ही त्रिकाळ वळवळत्या असंख्य गांडूळांसारखं तुमच्या अंतर्ममनात सतत हुळहुळत पसरत रांगत जाणारं नैराश्य. कण कण तुमच्या आत झिरपत तुम्हाला भुसभुशित करणारं नैराश्य. थोड्याश्या खतपाण्यानं स्वत:ची संख्या दुप्पट करणारी ही गांडूळं आपल्या आत सतत अगदी प्रत्येक क्षणी हसता रडता, उठता बसता, येता जाता, असता नसता तुमच्या अस्तित्वाचं अविभाज्य अंगं असल्यागत वळवळत राहिलेली अनुभवलीये कधी? अगदी सुखाच्या परमोच्च क्षणीदेखील ती तुम्हाला काहीच साजरं करू देत नाहीत.

शब्दखुणा: 

मेडिक्लेम

Submitted by मिलिंद महांगडे on 7 October, 2017 - 00:58

दारावरची बेल वाजली . अदितीने दार उघडले तर समोर संजय ...
" ओ , हाय संजय .... कसा आहेस आणि किती दिवसांनी येतोयस ? " अदिती खुशीत येऊन म्हणाली .
" अरे ,हो यार , थोडा बिझी होतो . तू कशी आहेस ? आणि मंदार साहेब आहेत का घरी ? " संजयनेही त्याच उत्साहात विचारपूस केली .
" हो , आहे ना ... म्हणजे तू मला भेटायला आला नाहीस तर ! " तिने लटक्या रागात विचारलं .
" तुम्हालाही भेटणारच की बाईसाहेब ! " इतक्यात मंदार बाहेर आला , " अरे , यार मंदार , वाचव बाबा तुझ्या बायकोच्या तावडीतून .... "

विषय: 

किनार्यालगतच्या कातरवेळी भाग-2

Submitted by कोमल मानकर on 5 October, 2017 - 22:13

"मी गेली आठ दिवस झाले अनु रोज जायचो किणार्यावर .तुझ्या पाऊलखुणाकडे लक्ष नाही पण आपण बसलेल्या दगडावर बसून तुझी वाट बघायचो तिथे बसल्यावर मला तुझा हसण्याचा समुद्राच्या लाटा खळखळल्या म्हणजे तु हसती आहे असा भास व्हायचा .तिथून घरी जावू नयेच असे वाटायचे गं तु येशील असचं वाटायचं .."
"आलोक आज ये मी निघते आता भेटू आपण किणार्यावर."
असं म्हणतं अनु तिथून निघून गेली खूप प्रश्न तिच्या मनात घर करून गेले .प्रेमासारखी ताकदवर गोष्ट अशी संपत नाही तर मग माझ्या मृत्यूलाहि आलोकचा विचार यायला हवा मी नाही सोडून जाऊ शकत त्याला मृत्यू मला येइल घेऊन जाणार पण ह्यात आलोकचा काय दोष ?

विषय: 

अब रोज रोज तो आदमी जीत नहीं सकता ना...

Submitted by राफा on 5 October, 2017 - 01:39

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.

‘व्हिडीओ फिल्म मॅगझिन’ ही कल्पना तेव्हा नवीन होती. अशा पहिल्या वहिल्या मॅगझिनच्या (‘लहरें’) एका ‘अंकात’ फिल्म इंडस्ट्रीतल्या एका सुप्रसिद्ध जोडगोळीतला सुप्रसिद्ध एक कुणी मुलाखत देत होता...

त्या एकाच्या नेहमी बरोबर असणारा दुसरा मात्र ह्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हता. ह्याचे कारण आता सर्वांनाच माहीत झाले होते. त्या दोघांची जोडी फुटली होती. एक प्रदीर्घ आणि अत्यंत यशस्वी अशी भागीदारी संपुष्टात आली होती.

तो ‘एक’ म्हणजे सलीम खान होता. ‘सलीम-जावेद’ मधला सलीम!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन