लेखन

इंदौर चा सराफा

Submitted by kokatay on 3 November, 2017 - 12:40

सराफा असं म्हटलं कि ताबडतोप सोन्या –चांदी चे दागिन्यांच दुकान असंच आपल्याला माहित आहे पण इंदूर ह्या शहरात ‘ सराफा ‘ म्हणजे दिवसा दागिने खरेदी चे स्थान आणि रात्री खाण्याचे स्थान. माझ संपूर्ण बालपण ह्याच शहरात गेलं .मी मूळ ची इंदूर ची आणि पोस्टग्रेजूएशन करायला उज्जैन ह्या शहरात होते.
रात्री जेंव्हा दागिन्यांची दुकानं बंद होतात त्या नंतर तिथे खाण्या ची दुकानं लागतात .
काही खाण्याचे पदार्थ जे इंदूर ला मिळतात आणि जी चव त्या पदार्थांना असते, जगात कुठेच मिळत नाही असं मला वाटतं . तर आपण बघू इंदूर ला काय –काय ‘स्पेशल “ मिळत .

विषय: 

महाभारत सैन्य रचना

Submitted by अविनाश जोशी on 3 November, 2017 - 02:17

महाभारत सैन्य रचना
कौरव आणि पांडव यांच्या झालेल्या महायुद्धात कौरवांची अकरा अक्षौहिणी तर पांडवांची सात अक्षौहिणी अशी एकंदर आठरा अक्षौहिणी सेना होती. अक्षोहिणीची रचना खालील प्रमाणे असायची..
सगळ्यात छोटा भाग पट्टी म्हणून ओळखला जायचा. एका पट्टीत एक हत्ती, एक रथ, तीन घोडे आणि पाच पायदळाचे सैनिक असायचे. हत्तीचा माहूत आणि योद्धा, रथाचा सारथी आणि योद्धा , तीन घोडेस्वार योद्ध्ये आणि पाच पायदळाचे योध्ये असे एका पट्टीत १२ जण असायचे.
सेनामुख = ३ पट्टी
गुल्म = ३ सेनामुख
गण = ३ गुल्म
वाहिनी = ३ गण
पृथना = ३ वाहिनी
चमू = ३ पृथना

विषय: 

उपास एक गैर समजूत

Submitted by अविनाश जोशी on 1 November, 2017 - 05:52

उपास एक गैर समजूत
कालच कार्तीकी एकादशीचा उपास झाला. आपल्यापैकी बर्याच जणांनी तो खिचडी, बटाट्याचा किस, दाण्याची आमटी अशा विविध पदार्थानी साजरा केला. आपण उपासाची परंपरा पाळली. परंपरा म्हणण्याचे कारण साधारणतः वेद, उपनिषिदे, पुराणे , कथा आणि परंपरा असा धर्माचा प्रवास झालेला आहे. प्रत्येक वेळेस त्याच्यात बदल होत गेलेले आहेत.

विषय: 

विश्वास.[सु]

Submitted by अविनाश जोशी on 1 November, 2017 - 03:18

विश्वास.[सु]
बंगल्याच्या दारातुन बाहेर पडणारी नेहा ताठ मानेने जात होती. पोरगी होती मोठी गोड लाघवी. कुणालाही चटकन खिळवुन ठेवणारी. पण मला मात्र तिने पुर्ण गोंधळात टाकले होते. अरे हो मी शैलेश साठे, डॉ. शैलेश साठे, प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ. बोरीवलीला असलेले माझे निलेश रुग्णालय पेशंटनी ओसंडुन वाहात असते. बोरीवलीतुनच नाही तर वसई विरार ठाण्यापर्यंतची रुग्णालये अवघड केसेस माझ्याकडे रेफ़र करत असतात.

विषय: 

१ शेर

Submitted by पुरुषोत्तम मानमोेडे on 31 October, 2017 - 16:02

दिवे सारे जळू दे आतल्या मज् आतड्यांचे...
उजेडी खेळ तू माझ्या मनाची हीच आशा...

विषय: 

ताटातुट

Submitted by Vishal More on 31 October, 2017 - 00:01

आयुष्य सुंदर असाव अस नेहमी वाटत नेहमी हसता याव रोज सगळ स्वप्नवत व्हाव हे शेवटी एक स्वप्नच राहिल तुझ्या सनिध्यत घालवलेला प्रत्येक क्षण मन मोहरून गेला.सगळ आगदी मनाप्रमाने जुळून आल्यानंतर ही आपली ताटातुट होइल अस कधि वाटल नव्हतं काय चुकल आणि नेमक कोनाच चुकल? या प्रश्नांची उत्तर शोधन आता निरर्थक आहे अस मला वाटत.
माझ अस कधीच नव्हतं की लग्न करेल तर फक्त तुझ्याशिच पण जिच्याकडे बघून लग्न कराव वाटल ति तुच. तु सांगत होतीस आपण कुठेतरी थांबायला हव पण मी ते कधी ऐकलच नाही मला नेहमी वाटायच सगळ ठिक होईल पण तेव्हा कळत नव्हतं ना इथे कोणतीच गोष्ट मनाने घडत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

x

Submitted by जव्हेरगंज on 30 October, 2017 - 13:48

सुंदर सुंदर सकाळ झाली. सुंदर सुंदर सुर्य उगवला. काळ्या लाल पिसांचा सुंदर कोबडा भल्या सकाळी सुंदर आरवला.

नदी सुंदर दिसत होती. झाडे सुंदर दिसत होती. आभाळही सुंदर दिसत होते. अधूनमधून ढग दिसत होते. तेही तितकेच सुंदर होते. जागोजागी धुके पसरले होते. ते ही तितकेच सुंदर होते. कुठेसा थोडासा हलकासा भुरभुरा पाऊस पडत होता. तो ही तितकाच सुंदर होता.

दरवाजा [ पूर्ण ]

Submitted by अविनाश जोशी on 30 October, 2017 - 10:21

दरवाजा [ पूर्ण ]
शेवटचा भाग २७ नंतर वाचावा
-१-
समीर. वय २x.
समीर पटेल हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते.
लहानपणीच आईवडिलांचा इस्ट आफ्रिकेत अपघाती मृत्यु झाल्यामुळे समीर मुंबईत काकांकडेच वाढला होता.
त्याचे काका म्हणजे मुंबई शेअरबाजार आणी मेटलंमार्केट मधे एक मोठे प्रस्थ होते. लग्नाशिवायच होते आणी समीरचे पालन त्यांनी मुलासारखे केले होते.
मलबारहील वर बंगला असल्याने उच्च्भ्रु आणी उच्चपदस्थ लोकात उठबस होत
पुणे, अलीबाग, सुरत अशा प्रॉपर्टीज होत्या. बऱ्याच कंपन्यात गुंतवणूक होती.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन