घर ते सोसायटीचं मैदान अशा दोन टोकांत सगळं जग वसलेलं आहे, अशी भावना मूळ धरत असतानाच शाळेच्या रुपाने नियतीमॅडम कहानी में ट्विस्ट घालून देतात. नवा गणवेश, नवं दप्तर असा सगळा जामानिमा करुन जेव्हा शाळेत प्रवेश होतो, तेव्हा मात्र पुढं आईला जाताना पाहून दमसासाची आवर्तनं घातली जातात. पण पहिल्यांदा आयुष्यात बाईंचं बोट धरुन नव्या नवलाईच्या जगाला सामोरं जायला आपण तयारही होतो.
अब्बास मस्तान यांचा चर्चीत प्लेअर्स बघण्याचा दुखःद योग आज आला... मुळ इंग्रजी चित्रपटावरुन घेतलेला हा चित्रपट .. वेगवान पटकथा, अॅक्शन , अब्बास मस्तान यांचा फेमस 'ट्विस्ट" यांच्या व्यतिरिक्त काहीच नाही यात.. महाबोअर करणारा भंकस चित्रपट याच्यात समावेश होउ शकतो...
'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या आहेत काही मजेदार स्पर्धा!!!
त्यांपैकी पहिली स्पर्धा म्हणहे परस्परसंबंध ओळखा स्पर्धा.
ही एक 'कोडे सोडवा' प्रकारची स्पर्धा आहे. प्रत्येक कोड्यात विविध चित्रे, संकेतस्थळांचे दुवे, ध्वनीचित्रफितींचे दुवे इत्यादी असतील. त्या कोड्यातील प्रत्येक चित्र इत्यादींचा 'जन गण मन' या चित्रपटाशी काही संबंध आहे.
काल मी Edward Zwick दिग्दर्शीत ब्लड डायमंड नावाचा एक चित्रपट बघितला. तसा हा २००६ सालचा आहे. त्यावर्षी त्याला ऑस्करमधे ५ नामांकने मिळाली होती (पण एकही ऑस्कर मिळाले नव्हते.)
अगदी शाळेत असल्यापासून आपल्याला आफ्रिकेत हिरे मिळतात हे वाचून माहीत असते. पण ते नेमके कसे मिळतात, त्याचा व्यापार कसा चालतो याचे थेट चित्रण हा करतो.
हि कथा खरी आहे असा दावा केलेला नाही, तसेच आताही परिस्थिती तशीच असेल असे नाही ( खास डी बीयर्स कंपनीच्या आग्रहावरुन) असे विधान करण्यात आले आहे.
सिएरा लिओन मधे सुरु होणारी हि कथा. सध्याच्या झिम्बाब्वे मधे जन्मलेला एक गोरा
काही वर्षांपूर्वी भारत सरकारनं सर्व शिक्षा अभियानाला सुरुवात केली, आणि सगळीकडे ’स्कूल चलें हम’ ऐकू येऊ लागलं. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार, आणि या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून स्वातंत्र्याची पन्नाशी उलटल्यानंतर मोठ्या धडाक्यात हे अभियान हाती घेतलं गेलं. या अभियानाची बर्यापैकी भिस्त होती ती शिक्षणसेवकांवर. बी.एड.ची पदवी नसलेल्या, पण शिक्षकांचं काम करणार्या या पदवीधारक शिक्षणसेवकांमुळेच अनेक लहान गावांमध्ये मुलं गमभन गिरवू शकली.
हा चित्रपट पाहिल्यानंतर मला अक्षय कुमारच्या " गरम मसाला " चित्रपटाची आठवण झाली . थीम सुद्धा अगदी तीच आहे . बघताना हसून हसून पोट दुखायला लागते . अंकुश चौधरीला अभिनय आणि दिग्दर्शन अतिशय व्यवस्तीत जमले आहे . तर हा छावा एकाचवेळी तीन तीन गर्ल फ्रेंड्स सांभाळत असतो . त्यातली एक सई ताम्हणकर हिचा फोटोग्राफीचा व्यवसाय असतो आणि हा अंकुश तिला गर्ल फ्रेंड बनवून तिची कार फुकटात चालवत असतो . दुसरी गर्ल फ्रेंड पूजा सावंत , तीची जाहिरातीची फर्म असते परत इथे अंकुश तिचा बॉयफ्रेंड बनून कामाला असतो आणि तिसरी असते कोल्हापुरी मिरची अमृता खानविलकर , अंकुश इथे राहायची सोय होते म्हणून तिच्या बरोबर राहत असतो .
'हा भारत माझा' हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असा आहे. अण्णा हजारेंच्या लढ्याला पाठिंबा देणारे लोक स्वतः जेथे तेथे नियम तोडण्यात पुढे असतात अशी टीका कायम केली जाते. या चित्रपटाचा विषय हाच आहे. सुमित्रा भाव्यांच्या मुलाखतीत हा चित्रपट कसा बनला याची आणखी माहिती आहे.
डर्टी पिक्चरची माहिती येथे दिली होती, ती मी आता संपादीत केली आहे
रुक्मिणीदेवी अरुंदेलांच्या चेन्नईला नव्यानं सुरू झालेल्या ’कलाक्षेत्र’ गुरुकुलात तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांचं वास्तव्य होतं. रोज पहाटे गुरुदेव तिथल्या विद्यार्थ्यांसमवेत संगीत आणि नृत्याच्या अभ्यास करत. विद्यार्थ्यांशी संवाद साधत. त्यांना शिकवत आणि त्यांच्याकडून शिकतही. अशाच एका पहाटे एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, "गुरुदेव, सूर्योदय अजून व्हायचाय. आकाशातल्या तारका अजूनही स्पष्ट दिसत आहेत. गार वारा वाहतोय.