इशकजादे..
अर्जुन कपुर (बोनी कपुर चा मुलगा) परिनिती चोप्रा (प्रियांका चोप्राची मावसबहीन)
दिग्दर्शक : हबिब फैजल ( दो दुने चार फेम)
निर्माता: अदित्य चोप्रा
संगीतः अमित त्रिवेदी
.
यशराज चित्रपटांच्या विरुध्द चित्रपट आहे हा.. हिंसा, दगा, दे मारामारी ने भरपुर, अभिनेत्री नुसते नाचगाणे करत नाही तर बंदुका सुध्दा चालवते.. एकुणच यशराज च्या संपुर्ण इतिहासाच्या विरुध्द हा चित्रपट आहे..
चित्रपट चालु होतो ते एक लहान मुलगा आणि एक लहान मुलगी एकमेकांना सभ्य भाषेत शिव्या देत असतात...( यावरुनच पुढील चित्रपटात काय धेंड आहे याची पुसटशी नाही लख्ख कल्पना येते)
वक्त- ’साठ’वण सिनेमांची
पन्नासच्या दशकातल्या दो बिघा जमीन, कागझ के फ़ूल, मदर इंडिया, देवदास इत्यादी गाजलेल्या सिनेमांनी त्या दशकाच्या चेहर्यावर ’सिरियस’ ठसा उमटवला. कदाचित हे गांभीर्य जरा अतीच झालं म्हणूनही असेल, पण त्याच्या पुढच्या दशकाने आपला पूर्ण मेकओव्हरच करुन टाकला. सिनेमांमधे रंग आले आणि त्या रंगांचा उत्फ़ुल्लपणा अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकारांच्या कामगिरीत आपसुक उतरला.
पाकिझा- साहेबजानचा प्रवास.
पाकिझा म्हणजे मीना कुमारी.
पाकिझा म्हणजे ते स्वप्न जे साकार करायला कमाल अमरोही चौदा वर्ष धडपडत होता.
पाकिझा म्हणजे अस्तंगत गेलेलं ते युग ज्यात काव्यात्मकता, तरलता, रोमॅन्टिसिझम आणि काही प्रमाणात भाबडीही वाटू शकणारी सामाजिकता हा सिनमांचा मुख्य गाभा होता.
पाकिझा म्हणजे लता मंगेशकर या गानसम्राज्ञीची अवीट गोडीची गाणी आणि गुलाम महंमद या दुर्लक्षित गुणी संगीतकाराचा अप्रतिम स्वरसाज.
पाकिझा म्हणजे तवायफ़-कलावंतिणींच्या बदनाम दुनियेचं करुण-राजस रुप.
पाकिझा म्हणजे मीना कुमारीच्या अभिनय कारकिर्दीला आणि तिच्या आयुष्यालाही मिळालेला पूर्णविराम.
'हा भारत माझा' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ गुरुवार दि. ३ मे, २०१२ रोजी पुण्याच्या सिटीप्राईड,कोथरुड,, चित्रपटगृहात संध्याकाळी साडेसहा वाजता होता. त्याला आपले काही मायबोलीकर गेले होते. त्या खेळाचा वृत्तांत आणि प्रतिक्रिया इथे लिहा.
मायबोलीकरांच्या मुलांसाठी 'चिंटू' घेऊन येतोय निबंध लिहा, चित्र काढा व रंगवा स्पर्धा!
भारतीय सिनेमा शंभर वर्षांचा झाला. आजवर या सिनेमामुळे मनाला असीम आनंद मिळाला. सिनेमांचं ऋण मनावर सुखाचं ओझं ठेवून आहे, ते अंशतःही उतरवण्याची इच्छा नाही मात्र या निमित्ताने आवडत्या सिनेमांवर लेख लिहून निदान कृतज्ञता तरी व्यक्त करणे मस्ट आहे.
मला सिनेमा बघायला आवडतो, त्यावर लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला आवडतं, जो सिनेमा पाहिलेला नाही त्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं, जे सिनेमे आवडले नाहीत, त्यांच्यावरही बोलायला आवडतं, ते का आवडले नाहीत त्याबद्दल विचार करायला आवडतं. थोडक्यात सांगायचं तर मला सिनेमा कसाही आवडतोच.
काही सिनेमे बुद्धीने बघायचे, काही नजरेने, काही मनाने. काही उगीचच.
सबबन तुलसी भयी
परबत सालिगराम ।
सब नदिये गंगा भयी
जब जाना आतमराम ॥
या कबीराच्या दोह्यानं 'हा भारत माझा' या चित्रपटाची सुरुवात होते. आपल्या अंतर्मनात डोकावयाला भाग पाडणार्या या चित्रपटाबद्दल सांगत आहेत डॉ. अनिल अवचट...