कधी 'फ्लश' खेळला आहात? जुगार... तीन पत्ती..! ह्या तीन पत्तीमध्ये अफलातून पानं (ट्रायो/ कलर सिक्वेन्स इ.) क्वचितच येतात. बहुतकरून जोड्या किंवा सपाट पानं येत असतात. चांगला खेळणारा असतो ना, तो ह्या जोड्यांच्या किंवा सपाट पानांच्या जोरावर 'ब्लफ' करतो आणि जिंकतोही! पण काही जण - जे एक तर कच्चे खेळाडू असतात किंवा 'मी लै भारी खेळतो' अश्या खोट्या आविर्भावात असतात - ह्या 'ब्लफिंग'मध्ये वाहवत जातात, हरतात आणि मग जेव्हा खरोखर चांगले पत्ते असतात, तेव्हा 'बाजी' लावायला एक तर काही उरलेलंच नसतं किंवा झालेलं नुकसान चांगल्या पत्त्यांच्या जोरावर भरून निघण्याच्या बाहेर असतं!
प्रत्येकाचं जीवन जर एक संवादिनी (harmonium) समजली, तर आई हा तिचा षड्ज (सा) असावा. ह्या षड्जाविना मैफल परिपूर्ण वाटत नाही. असं एक अनन्यसाधारण स्थान असतं, आईचं. पण हे आईपण खूप कठीण असतं. एक स्त्री, जेव्हा फक्त एक स्त्री असते, तेव्हा तिचं जग बरंच व्यापक असतं. पराकोटीची वेदना सोसून जेव्हा तीच स्त्री एका मुलाला जन्म देते, तेव्हा तो तिचा स्वत:चाही पुनर्जन्मच असतो. कारण, सोसलेल्या यातना मरणयातनेहून कमी नसतात आणि तिथून पुढे सगळे आयामही बदलणार असतात, बदलतात. एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर.
आज ५ आक्टोबर २०१२. एरव्ही निरुपद्रवी वाटणारी ही तारीख, पण माझ्या दृष्टीने [तसेच जगभरातील अनेक ज्ञात-अज्ञात रसिकांच्या दृष्टीनेही] या तारखेला एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. बरोबर ५० वर्षापूर्वी... म्हणजेच ५ आक्टोबर १९६२ रोजी एका 'पात्रा'ने इंग्लंड आणि अमेरिकेत चंदेरी पडद्यावर जन्म घेतला आणि त्याच्या जन्मदात्यालाही कल्पना नसेल इतके प्रेम आदर आणि लोकप्रियता या पोराने केवळ आपल्या 'सज्जन' प्रतिमेवर मिळविली.
मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हींग इमेजतर्फे आयोजित केलेल्या १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'पुणे ५२', 'संहिता' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तीन चित्रपटांची निवड झाली आहे. हे तिन्ही चित्रपट 'इंडिया गोल्ड' या स्पर्धाविभागात दाखवले जातील.
आयना का बायना..घेतल्याशिवाय जाईना...
अक्षरा फिल्म्स डिव्हिजन एलएफएस मिडिया अॅण्ड एण्टरटेन्मेंटच्या सहकार्यानं सादर करत आहे ’आयना का बायना’, आंतरराष्ट्रीय नृत्यशैलींना वाहिलेला पहिला मराठी चित्रपट.
ठेका धरायला लावणारी गाणी आणि जॅझ, हिप-हॉप, बचाटा असे भन्नाट नृत्यप्रकार हे वैशिष्ट्य असणार्या या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत मायबोली.कॉम.
विंग्रजीतील एक म्हण म्हणते की, 'घोड्याला पाण्यापर्यंत नेता येऊ शकतं, पण त्याला पाणी पाजता येत नाही.' म्हणजे, त्याला तहान असेल तरच तो पाणी पिणार... कितीही काहीही करा..! पण माणसाचं जरा वेगळं असावं.. म्हणजे, जर एखाद्याने ठरवलं की त्याला शेणच खायचं तर तुम्ही त्याला गोठ्यापासून कितीही दूर न्या.... तो काही ना काही करून शेण खाणारच ! 'कमाल धमाल मालामाल' च्या निमित्ताने एक चांगली कहाणी प्रियदर्शनला मिळाली होती पण... आता शेणच खायचं ठरवलं असेल, तर काय करणार ना ? असो.. उगाच कुणाचं खाणं-पिणं काढू नये म्हणतात. आपण शेणेमाबद्दल बोलू... सॉरी, सिनेमाबद्दल बोलू..
विचार करण्याची क्षमता असणे, बुद्धीचा अधिक परिणामकारक उपयोग करणे, ह्या वैशिष्ट्यांमुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व श्रेष्ठ समजला जातो. जे बरोबरही आहे. पण ह्या मानावाच्याही हातात अनेक गोष्टी नाहीत. अनेक ठिकाणी हा हतबल होतो, लाचार होतो. तेव्हा 'हे देवाच्या हातात आहे', असं म्हणून तो स्वत:ची लाचारी मान्य करतो व ते मान्य करत असतानाही इतर प्रन्यांहून श्रेष्ठत्व सांभाळतोच. इतपत ठीक आहे.
मनात येते हेच मला तू दिसल्यानंतर
तुझ्याचसाठी शब्द जन्मला 'नितांतसुंदर'!
क्षितीज म्हणजे भास असावा, मला न वाटे
तुला पाहण्यासाठी झुकते खाली अंबर
प्रचंड दुखते हृदयामध्ये तुला पाहता
पण आवडतो उरामधे शिरलेला खंजर !
सारी दुनिया त्याची जिंकुन झाली होती
तुला भेटला नव्हता कारण कधी सिकंदर
तुझ्यात हरवुन 'जीतू' लिहितो कविता - गझला
वेडी दुनिया म्हणते त्याला 'मस्त कलंदर' !