काही जालीय मित्रांसमवेत मुकेशने गायलेल्या कित्येक सुमधुर गाण्यांच्या संदर्भात चर्चा चालू असताना राजकपूरशिवाय अन्य कोणकोणत्या अभिनेत्यासाठी मुकेशने पार्श्वगायन केले आहे याची यादी आठवत असतानाच त्यातील एका मित्राने त्याला मुकेशचे "रजनीगंधा" चित्रपटातील 'कई बार यूं भी देखा है...' हे गाणे खूप आवडीचे वाटत असल्याचे म्हटले. जे कोणत्याच अभिनेत्याच्या तोंडी नसून नायिकेच्या सैरभैर मनस्थितीच्या वर्णनासाठी पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटात या गाण्याचा मार्मिकपणे वापर केला गेला आहे. हे गाणे माझ्याही अत्यंत आवडीचे आहे.
१९९२ साली भारतात सुरु झालेल्या जागतिकीकरणानं बाजाराचं व्याकरण बदलून टाकलं. 'गोष्टी जपून वापरा, पिढ्यान् पिढ्या टिकवा' ही शिकवण मागे पडून 'अधिक खरेदी करा, वापरा आणि फेकून द्या' या मूल्यानं भारतीयांच्या मानसिकतेत शिरकाव केला. परदेशी ब्रँडदेखील सुलभतेनं मिळू लागले तसं साहजिकच एकेका गाडीसाठी सहा महिन्यांच्या प्रतीक्षायादीचे किस्से जुनेपुराणे वाटू लागले.
डालड्याचा पिवळा डबा, चेतकची स्कूटर, बोटांनी गोलगोल फिरवत डायल करायचा टेलिफोन ते आजच्या स्टायलिश चारचाकी गाड्या, आयफोन या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. बाजारव्यवस्था बदलली, तसे नातेसंबंध बदलले, आपली परस्परांतली वागणूकही बदलली.
सध्या भारत-इंग्लंड सामने चालू आहेत. भारताचे स्टार फलंदाज मोठ्या झोकात खेळपट्टीवर येतात १०-१५ मिनिटं, पाऊण तास, फार तर तास भर चांगल्या फलंदाजीचं दर्शन देतात आणि अचानक हत्तीच्या कानात मुंगीने 'मैं तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हूं' म्हटल्यावर हत्ती कसा बावचळेल, तसे बावचळतात आणि दांड्या उडतात..... अशी चित्रं मी सिनेमाइतकाच क्रिकेटचाही चाहता असल्याने गेला महिनाभर तरी नियमित पाहात आहे. त्यामुळे असेल, पण जब्बरदस्त स्टाईलमध्ये व दमदारपणे इण्टर्व्हलपर्यंत येणाऱ्या आणि नंतर बावचळल्यागत विकेट फेकणाऱ्या 'दबंग - २' ने, अपेक्षाभंग करूनही, म्हणावं तितकं डोकं फिरवलं नाही.
कोणाकोणाला कथा कळली 'बदाम राणी गुलाम चोर' या सिनेमाची?
कळली असेल तर जरा कोणी तात्पर्य सांगू शकेल?
मला कळलाच नाही सिनेमाचा आशय.
कोणाला आवडला हा सतीश राजवाडेचा सिनेमा?
मला नाही मात्र आवडला.
मध्यंतरी 'जलपरी' हा लघुपट बघितला.. मनापासुन आवड्ला.. आजही भारतात मोठ्या प्रमाणावर स्त्रीभ्रुण हत्या होत आहेत.केवळ जन्माआधी मारूनच नाही, तर अत्यंत निर्दयीपणे म्रुत गर्भाची विल्हेवाट लावून.. जगलीच तरी स्त्रीचा मुलगी, आई, पत्नी या सर्वच रूपात अपमान करणे , म्हणजे देखील एका प्रकारे स्त्रीत्वाची हत्याच नाही का??
डॉ. देव (प्रवीण दबास), त्याची आई (सुहासिनी मुळे ) आणि मुलं श्रेया (लहर खान) व सॅम (क्रिशांश त्रीपाठी) राजस्थानातील एका मागास खेड्यात जातात. सुट्टी घालवण्याशिवाय त्या खेड्यात आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ दवाखाना बांधण्याचा देव चा मानस असतो..
'दुनियादारी' नावाचे सुहास शिरवळकरांचे पुस्तक होते. त्यावर आधारित एक नवा मराठी चित्रपट घेऊन संजय जाधव येणार असल्याचे कळले आहे.
त्यात 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मधला 'घना/घनश्याम' उर्फ स्वप्नील जोशी असून सई ताम्हणकर आणि उर्मिला कानेटकर या दोघी देखील असल्याची बातमी कळली आहे. सध्या त्या चित्रपटाच शुटींग सध्याच चालू झाल आहे. ह्या चित्रपटाची कथा कॉलेज वयीन मुलांची असून लव त्र्यान्गल ची कथा आहे.
१९ जुलै २०१३ ला हा सिनेमा येणार आहे.
आशा आहे, कि मराठीतला हा सिनेमा तरी चांगली करमणूक करेल.....!!!!
लाईफ ऑफ पाय चा ट्रेलर पाहिल्या पासुन फार उत्सुकता होती. ‘पाय’चे पाण्यातील प्रवासाचे रंजक अनुभव बघायला म्हणून पहिल्याच आठवड्यात लगेचच थ्रीडी पाहिला. नॉट वर्थ ! थ्री डी नसता तरी चालला असता.
समुद्रावरची काही दृष्य फार उत्तमरित्या चित्रीत केली आहेत. चित्रीकरण चांगले आहे. प्राण्यांबरोबरची तसेच इतरही दॄष्ये टेक्नीकली किती खरे किती खोटे सांगता येत नाही.
यान् मार्टेल च्या लाईफ ऑफ पाय या पुस्तकावर आधारीत कथानक आहे. मी पुस्तक वाचले नाहिये. पण चित्रपट ठिकठाक आहे. इरफान खान, तब्बु, सुरज शर्मा सारख्या भारतीय कलाकारांचे काम आवडले. रिचर्ड पार्कर भारिये
जगात मानवांचं वर्गीकरण दोन भागात करायचं म्हटलं तर पहिले असतात साधारण मर्त्य मानव आणि दुसरे अतिमानव. या अतिमानवांना आशीष आर मोहन हे नाव माहीत असतं, ते हिमेश रेशमियाने गायलेली गाणी सहज ऐकू शकतात आणि एण्जॉयही करू शकतात आणि लोहा लोहे को काटता है तसंच अतिमानव अतिमानवांशीच व्यवहार ठेवतात.
अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली