गजेंद्र अहिरे या नावासोबत अनेक गोष्टी आपसूक येतात. मुख्य म्हणजे अस्सल दर्जेदार कथाबीज. एखादी कथा जेव्हा आपण सहज 'रिलेट' करु शकतो तेव्हा लेखकावर अधिक जबाबदारी येते ती वाचकाला गुंतवून ठेवण्याची. काही घटना, प्रसंग इतके सहज, रोज घडत असतात की त्यावर लिहीणं महाकठीण होऊन बसतं. म्हणूनच जगणं चिमटीत पकडून त्याचं बिनचूक निरीक्षण मांडणारे लेखक-कवी कायमच वाचकांच्या मनात स्थान मिळवतात. अहिरेंच्या कथा अशाच असतात. दीर्घकाळ मनात रेंगाळणार्या. परिस्थितीचं भान जपणार्या. त्यातून कोणता संदेश, तात्पर्य वगैरे मिळत नसतं. या कथा असतात माणसांच्या.
पारावारच्या गप्पा चालू असताना विषय निघाला की सर्वात सुंदर अभिनेत्री कोण ? नावांची बरसात झाली; नुसता कल्ला. माझी पसंत एकच.....ती ! अस्मादीकांना आउटडेटेड ठरवण्यात आले. चालायचंच..! तब्बल ४ दशकं उलटली 'तिला' जाउन पण ती भुरळ अजुन तशीच आहे.....चिरतरुण आणि चिरंतन! जमतेम टीनएजर असताना या अप्सरेचं पहिले 'छायागीत' (दूर)दर्शन झाले. त्या दिवशी "प्रथम तुज पाहता जीव वेडावला" हे गाणं पुरेपूर उमगलं
सर्वात आधी मी चित्रपटाच्या प्रिमिअरला जाण्याची संधी दिल्याबद्दल मायबोलीचे
आभार मानतो . माझ्या ओळखीच तस कुणीच या क्षेत्रात नसल्याने अस काही घडेल असा मी
कधी विचारही केला नव्हता .त्यामुळे आधीच सगळीकडे मी "हवा" करून ठेवलेली होतीच .
पण सुखद धक्का बसला तो ह्या लोकांचा साधेपणा पाहून .
विक्रम गोखले काय किंवा दिलीप प्रभावळकर काय, आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकांच्या
मानाने कितीतरी मोठी माणसं . पण त्यांच्या वागण्यात , बोलण्यात त्याचा लवलेश
ही नव्हता .
नंतर झालेला छोटेखानी स्वागत समारंभ ही छान .
प्रिमिअर बद्द्ल अजून कितीतरी लिहिता येईल पण जस हॉटेल कितीही छान असेल ,
प्रत्येक कलाकाराच्या कारकीर्दीत त्याच्या हातून अशी एखादीच कलाकृती घडून जाते की जी त्याची 'सिग्नेचर' होते. त्यानंतर त्यानं काहीही केलं नाही तरी चालेल इथपर्यंत रसिक त्यावर फिदा झालेले असतात. हा माईलस्टोन त्याच्याबद्दलच्या अपेक्षा उंचावून ठेवतात. किंबहुना त्यासाठीच तो कायम स्मरणात राहतो. अमिताभचा डॉन, सचिन दिग्दर्शित अशी ही बनवाबनवी आणि महेश कोठारेचा झपाटलेला हे सगळे याच प्रतीचे.
'अनुमती' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ शुक्रवार, १४ जून, २०१३ रोजी पुण्याच्या सिटिप्राइड कोथरूड चित्रपटगृहात संध्याकाळी साडेसात वाजता आयोजित केला आहे.
चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.
मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'अनुमती'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
या खेळाची काही तिकिटं आपल्याकडे आहेत.
लोक उगाच म्हणतात की चित्रपटातून आपण नको ते उचलतो. खरं तर चित्रपट आपल्यातून हवं ते उचलतात. 'घरी कुणी तरी जेवायला येणार' म्हटल्यावर आजकाल काही लोक बाजारात 'रेडीमेड' काय मिळतं ते आधी पाहातात. अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा मिळायचा हा जमाना आहे. त्याव्यतिरिक्त इडलीपासून बटर चिकनपर्यंत आणि पॉपकॉर्नपासून चिकन लॉलीपॉपपर्यंत स ग ळं 'फक्त पाण्यात मिसळलं/ उकळलं/ भाजलं/ तळलं की तयार' असं उपलब्ध आहे आणि जे पदार्थ असे सहज शक्य नाहीत, ते हळूहळू 'गायब' होत आहेत.
एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. १९८० सालच्या ’आक्रोश’, 'कलयुग' या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. 'रिहाई'सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो'मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला आहे.
एखाद्या चमचमीत खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलमध्ये जावे… आणि जेवणाच्या अपेक्षेने आलेल्या खवैयांना हॉटेल मालकाने केवळ उत्कृष्ट स्टार्टर देवून बोळवण करावी अशी काहीशी झपाटलेला २ ची गत आहे. खरं तर आधीच्या सिनेमाची (झपाटलेला ) पुण्याई आणि तात्या विंचू सारखा ब्रांड हाताशी असूनही महेश कोठारेंनी त्याचा पुरेपूर वापर करून घेतलेला जाणवत नाही. सिनेमाचे कथानक असे- वीस वर्षांपूर्वी इन्स्पे. महेश जाधव यांनी खात्मा केलेला तात्या विंचू हा बहुला एका संग्रहालयातून चोरी होतो.
सतत नवनवीन प्रयोग करत दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन करणार्या मराठी दिग्दर्शकांमध्ये श्री. गजेंद्र अहिरे अग्रभागी आहेत. २००३ साली प्रदर्शित झालेल्या 'विठ्ठल विठ्ठल' आणि 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' या चित्रपटांपासून कारकिर्दीला सुरुवात करणार्या गजेंद्र अहिर्यांनी 'सरीवर सरी', 'सैल', 'बयो', 'शेवरी', 'सुंबरान', 'पारध', 'समुद्र' असे उत्तम चित्रपट प्रेक्षकांपुढे सादर केले आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार लाभले आहेत.
एका कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या एका विहिरीत पडला. वनविभागाच्या कर्मचार्यांनी त्याला पकडलं, आणि एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली. त्याचं नाव ठेवलं 'आजोबा'.
माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं.
पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत आजोबा निघाला मुंबईच्या दिशेनं. त्याच्या घराकडे.
२९ दिवस. १२० किलोमीटर.
आजोबाचा भन्नाट ट्रेक.
आजोबाला त्याचं घर सापडलं का?
ऑक्टोबर, २०१३मध्ये प्रदर्शित होणार्या 'आजोबा'ची ही पहिली झलक -