इतिहास

छत्रपति शिवराय - जीवन रहस्य ...

Submitted by सेनापती... on 17 January, 2011 - 22:06

छत्रपति शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करताना अनेक इतिहासकारांनी त्यांचे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडले आहे. 'कै. नरहर कुरुंदकर' हे असेच एक प्रभावी लेखक. त्यांनी लिहिलेल्या 'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य' या पुस्तकात त्यांनी असेच काही वेचक आणि वेधक विचार मांडले आहेत.

इतिहासाच्या वाचकांना 'नरहर कुरुंदकर' माहीत असले तरी सामान्य वाचकांना मात्र ते 'श्रीमान योगी'च्या प्रस्तावनेतून माहीत आहेतचं. रणजीत देसाई यांना लिहिलेल्या विस्तृत पत्रातून त्यांनी शिवरायांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा यशस्वीपर्यंत केलेला आहे.

विषय: 

तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे...

Submitted by सेनापती... on 6 January, 2011 - 22:16

स्वराज्यावरील संकटे काही थांबायचे नाव घेत नव्हती. १६५९ च्या अफझलखान स्वारीपासून सुरू झालेली ही सत्वपरीक्षा राजे प्रत्येक वेळी निभावून नेत होते. कधी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तर कधी स्वतःच्या अतिशय प्रिय आणि जवळच्या माणसांचा त्याग भोगून. १६६४ साली राजांनी कोकणात यश प्राप्त केलेले असले तरी १६६५ च्या सुरवातीला 'ती' बातमी मराठा हेरांनी राजांपर्यंत पोचवली. मुघलांचा सेनापती मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत होता. पुढे ३ महिन्यात मराठा - मुघल तह घडला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते.

विषय: 

ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?

Submitted by सेनापती... on 30 December, 2010 - 21:08

सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते असा आरडाओरडा केला जातोय. जर ते ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले असते का? स्वतः:ची वाक्ये चुकीच्या पद्धतीने राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त राजकारणात नाही तर युद्धात देखील खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्याविरुद्ध हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू केला आहे. हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच आहे. ह्याचा निषेध करावा तितका कमीच.

विषय: 

सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...

Submitted by सेनापती... on 30 December, 2010 - 02:46

होय दोस्तांनो... हे खुद्द आपल्या महाराजांनी म्हटले आहे... छत्रपति शिवरायांनी २८ जानेवारी १६७७ रोजी सामान्य रयतेस उद्देशून लिहिलेले पत्र समाजातील प्रत्येक व्यक्तीला आजही लागू पडते. आपापल्या आचारधर्माचे पालन करावे, सर्वांनी एकदिल होउन शत्रुचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे. सध्या सर्वत्र जे सुरू आहे ते बघता आपण त्यांची आज्ञा आजही पाळणार आहोत का?

विषय: 

अन्नं वै प्राणा: (६)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

शूरवीर पाय घट्ट रोवून उभे,
झाडंही त्यांच्याकडून उभं राहायला शिकली - अकबरनामा

untitled.JPG
प्रकार: 

अफझलखान वध : शिवप्रताप दिवस ... १० नोव्हेंबर १६५९

Submitted by सेनापती... on 3 November, 2010 - 05:27

भटकंतीची १० वर्षे ...

Submitted by सेनापती... on 31 October, 2010 - 17:36

बघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी? कशी? काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे' पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला.

दुसरे दुर्ग साहित्य संमेलन... !

Submitted by सेनापती... on 25 October, 2010 - 09:13
तारीख/वेळ: 
21 January, 2011 - 14:00 to 23 January, 2011 - 13:59
ठिकाण/पत्ता: 
उधेवाडी, राजमाची.
माहितीचा स्रोत: 
श्री. मुकुंद गोंधळेकर - dusasammelan2011@gmail.com
प्रांत/गाव: 

व्यक्ति तितक्या देव

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

LAMAL, विषय: देव, १६ Oct. २०१०

काही लोकांकरता देव सखा असतो, काहींकरता मित्र, अनेकांकरता आधार तर इतरांकरता नसतोच. अजुनही प्रकार आहेत पण आपण त्या सर्वात शिरु शकणार नाही. पण देव हा प्रकार या पेक्षा कितितरी क्लिष्ट आहे. लोकांना, आजच्या आणि आधिच्या, या संकल्पनेबद्दल काय वाटायचे, काय वाटते याचा आढावा घ्यायचा प्रयत्न करु या, आणि त्या अनुशंगानी आपल्याला बदलायला हवे का ते पाहुया.

प्रकार: 

दुसरी सुरत लुट आणि मराठा - मुघल लढाई ...

Submitted by सेनापती... on 11 October, 2010 - 15:48

१६ वर्षात जे कमावले ते जवळ-जवळ सर्व पुरंदरच्या तहात राजांनी गमावले होते. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. नोव्हेंबर १६६६ मध्ये आग्र्याहून स्वतःची सुटका करून परत आल्यावर शिवरायांनी औरंगजेबाच्या दख्खन सुभेदाराला म्हणजे शहजादा मुअझ्झम याला 'आपण झालेला तह मोडणार नाही' असे पत्र लिहून स्पष्ट कळवले होते. ह्या मागचे राजकारण साधे सरळ होते. लढण्याची ताकद पुन्हा एकदा निर्माण करायला काही अवधी जावा लागणारच होता.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास