नाव-बदल: हिंदु विवाह कायदा
Hindu Marriage Act ह्या बद्दल मला काही प्रश्न विचारायचे आहेत.
लग्नानंतर स्त्रीने नाव बदल करावा की नाही हा त्या स्त्रीचा निर्णय असायला हवं, नाही का?
मात्र, ह्या कायद्यात अशा काही तरतूदी आहेत का ज्या अंतर्गत स्त्री ला नाव बदल केलं नसेल तर तिला कायदेशीर रित्या काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं का?
म्हणजे नवऱ्याच्या मालमत्ते वर, पॉलिसी वर, घरावर तिला हक्क सांगण्यासाठी नाव बदल केलेलं असण्याची गरज आहे का?
कायदेशीर बाबींमधील माहिती असणाऱ्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
आणि सोबत काही लिंक्स दिल्या तर सोन्याहून पिवळे!
धन्नो!