खडसांबळे लेणी, नाणदांड घाट, अंधारबन घाट, कोंडजाई डोह
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...
(साभार: जिप्सी -कविवर्य मंगेश पाडगावकर)

… आठवडाभर ज्याची मनापासून वाट बघितली, तो 'वीकएंड' अखेरीस उगवला असतो. मोठ्ठ्या ट्रेकचा बेत नसला तरी काय झालं, घरी आळसावून झोपण्यापेक्षा 'दुधाची तहान ताकाने भागवण्यासाठी' ट्रेकर्स जवळपासचा एखादा डोंगर-टेकडी भल्या पहाटे भटकून येतात. पुण्यातले आमचे भटके दोस्त सिंहगड, पर्वती किंवा वेताळ टेकडीवर रमतात. तसं आम्हां चिंचवडकरांना जवळ असलेली अन 'जवळची वाटणारी' ठिकाणं म्हणजे - दुर्गा टेकडी आणि घोरवडेश्वरची कातळकोरीव लेणी!!!
(प्रकाशचित्रे Credits:: दिनेश अनंतवार, अभिजीत देसले, Discoverसह्याद्री)
...सह्याद्री, सूर्य अन् मॉन्सून या तुल्यबळ शक्तींनी अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात नितांत सुंदर ‘नंदनवन’ फुलवलंय…
कळसूबाई - आजोबा - घनचक्कर – न्हापता – मुडा - घोडीशेप - कात्रा असे एकसे बढकर एक असे रौद्र पर्वत,
प्रवरा – मुळा – मंगळगंगा अश्या वळणवेड्या नद्यांची विलक्षण रम्य खोरी,
सांधण घळीसारखा अफलातून निसर्ग चमत्कार,
बरसुनी आले रंग सह्याद्रीचे.... भाग १
कोंबड आरवायच्या आधी पोटात आरवायला लागल.सकाळचा तातडीचा कॉल आला ..मग काय दोन-चार समस टाकुन आलो.रात्रभर पडत असलेल्या पावसाने थोडी विश्रांती घेतली होती.पण पहाट अजुनही धुक्क्यात भिजलेली होती.सुर्यदर्शन होणार नव्हतच.
आम्ही ज्या घरात थांबलो होतो ते घर ...
जावळी मुलुखातली भन्नाट भटकंती::: मंगळगड – चंद्रगड – ढवळेघाट – महाबळेश्वर

...................................................................................................................................
स्वराज्यातलं ‘जावळी प्रकरण’
रसाळगड – सुमारगड – महीपतगड – हातलोट घाट
बहुदा कधीतरी २-३ दिवसांपूर्वी ट्रेक सुरू केलेला असावा...
जीवाभावाच्या मोजक्या ट्रेकमित्रांसोबत दणकट चढ-उतार करत, सह्याद्रीमध्ये कुठेतरी खोलवर दुर्गम भागात पोहोचलेलो..
चेहरा रापलेला-कपडे घामेजलेले-सॅक मळलेली, कुठून आलो-कुठे चाललोय असल्या शुल्लक गोष्टींचं भान असायची गरज नाही..
मध्येच एखाद्या खट्याळ रानपाखराच्या शीळेचा आवाज मोहवून टाकतोय..
आता, जांभूळ-गेळा-हिरडा अश्या दाटीमधून आणि कारवीच्या उंचच उंच झुडुपांमधून वळणं-वळणं घेत वाट जलद धावतीये..
दाट झाडीतून वाट अवचितंच धारेपाशी येते, अन् सामोरा येतो एक स-ण-स-णी-त पॅनोरमा..
....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत!!!

(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)
मोरधन – कावनई – कपिलधारा तीर्थ – त्रिंगलवाडी (लेणी व दुर्ग):: एका दिवसात!!
सह्याद्रीत भटकंतीमध्ये आपली सोबत करतात - इतिहासाची स्मरणं अन् या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा! कधी प्राचीन सागरी बंदरं, जुन्या व्यापारी वाटा, कोकण व देश या भूभागांना जोडणा-या घाटवाटा; तर कधी संरक्षणार्थ बांधलेले दुर्ग/किल्ले, विश्रामासाठी अन् धर्मप्रसारासाठी कोरलेली लेणी हे सारं आपण समजून घेऊ लागतो. निसर्गाशी जुळवून घेताना जीवनसंस्कृती कशी विकसित होत गेली असेल, याचा अंदाज बांधू लागतो. विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा एका ‘अपरिचित, पण अफलातून’ कोरीव लेण्यांच्या रूपानं आम्हांला कश्या गवसल्या, त्याची ही कथा!
दिवाळी आधी रतनगड ट्रेक पार पडलेल्याला दिड-दोन महिन्याचा काळ लोटला होता. दिवाळी नंतर रोमाने भैरवगड तर योने सुधागड सर केला होता. मी ऐन वेळी 'कारणे दाखवा नोटिस' बजावून त्यातून काढता पाय घेतला होता. दोन महिने माझा ट्रेक उपास घडलेला असतानाच नाताळच्या लंब विकांतातील क्रॉसकंट्री ट्रेक रद्द झालेल्या यो आणि रोमाचा फोन आला. क्रॉस नाहितर नाही... निदान कंट्री ट्रेक तरी करुचा धोशा लावला होता. मंगळवार असल्याने एका दिवसाचा ट्रेक करायचा होता. जवळचा प्रबळगड करुया अशी टूम निघाली. त्याच काळात आमचा ट्रेक सवंगडी गिरिविहार फॅमिली सोबत जंगलात 'सफर' करत होता.