शेती

हा देश कृषीप्रधान कसा?

Submitted by अभय आर्वीकर on 22 March, 2010 - 12:04

हा देश कृषीप्रधान कसा?

- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.

भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

Submitted by अभय आर्वीकर on 16 March, 2010 - 22:27

भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

भुलाबाईचे गाणे हा तत्कालीन सामाजिक अविष्कारच असणार.
साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात.
परंतू थोरा – मोठ्या कवी / लेखकांच्या साहित्यात ते वास्तव
प्रामाणिकपणे उतरलेले नसावे.

भोंडला,हादगा,भुलाबाई आणी मंगळागौर

Submitted by अभय आर्वीकर on 8 March, 2010 - 04:24

भोंडला,हादगा : भुलाबाईची गाणी

बालपणीच्या अशा फ़ारच कमी आठवणी असतात ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाला कितीही रंग बदलू देत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात. एका अर्थाने ह्या आठवणी माणसाला "डोळस दृष्टी" प्राप्त करून देत असतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने झालेली अशीच एक आठवण.

ऑरगॅनिक आणि नॉन ऑरगॅनिक दुध - तुलना

Submitted by मो on 5 March, 2010 - 11:28

संयुक्ता वर ऑरगॅनिक आणि नॉन ऑरगॅनिक दुधाबद्द्ल थोडीशी चर्चा झालेली दिसली. मुद्दा होता नॉन ऑरगॅनिक दुध आणि मुलींची अर्ली प्युबर्टी. मी ही हे पुर्वी कुठेतरी वाचले होते आणि त्यावेळी इंटरनेटवर जरा शोधायचा प्रयत्न केला होता. इंटरनेटवर युजर फोरम्फोवर लोकांच्या चर्चा दिसल्या होत्या, पण विश्वसनीय साईटवरुन फार काही माहिती मिळाली नव्हती. ऑरगॅनिक आणि नॉन ऑरगॅनिक दुध, त्यांच्यातला फरक, तुलना इत्यादी मोलाची माहिती मात्र तेंव्हा कळली. संयुक्तावर रिप्लाय द्यायला घेतला पण विचार केला की ही माहिती सगळ्याच मायबोलीकरांकरता महत्वाची ठरेल, म्हणून वेगळा लेख!

थोडी माहीती रेग्युलर किंवा नॉन ऑरगॅनिक दुधाबद्दल -

विषय: 

गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन

Submitted by अभय आर्वीकर on 15 February, 2010 - 21:54

गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन
भारतीय बाजारपेठेत "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल केलेली वांगी विक्री करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल यानिमित्ताने बराच विचारविनिमय,चर्चा आणि उहापोह झाला आणि अशा परवान्यास केंद्रिय शासनाने तात्पुरती स्थगिती दिल्याने आता ही चर्चा बराच काळ चालेल.
अशा तर्‍हेचा परवाना द्यावा किंवा देवू नये याविषयी नेहमीप्रमाणेच मुख्यत्वे ३ गट पडलेत.
१) टोकाचे समर्थन करणारे
२) टोकाचा विरोध करणारे.
३) जो काही निर्णय घ्यायचा पुरेपुर विचारांतीच घ्यावा,निष्कारण घाई करू नये या मताचे.

विषय: 

गुणसूत्रांची भेसळ थांबवा!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 2 February, 2010 - 00:06

नमस्कार!

ह्या घडीला पर्यावरण मंत्री जयराम रमेश अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सना भारतातील फळभाज्यांचा राजा असलेल्या "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल विचारविनिमय करत आहेत.

येथे एका अभिनव पद्धतीने मंत्री महोदयांना भारतातील वांग्याचे रक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे : जगातील सर्वात मोठ्या पातळीवर वांग्याचे भरीत बनविण्यात येत आहे. आणि ते भरीत दिल्लीतील हजारो गरीब व भुकेल्या जनतेला वाटण्यात येणार आहे.
ध्येय आहे २०,००० (वीस हजार) वांग्यांचे! तुम्ही खालील पिटिशनवर साईन (स्वाक्षरी) करून त्यांत एका वांग्याची भर टाकाल काय?

ईमु पालन-(शेती)

Submitted by विक्रांत on 29 January, 2010 - 06:39

मी दिड वर्षापुर्वी पुण्यापासुन ६० किमी अंतरावर ईमु पालनाचं प्रोजेक्ट्/शेती सुरु केलीय. सुरुवातीला साधरनतः ७-८लाखाचं खर्च येतो पण नंतर उत्पादनावर नफा अवलंबुन असतं. माझा दिड वर्षातील ईमु पालनाचा अनुभव ईथे देणार आहे. तसं मी मायबोलीवर नविनच आहे, पण मधुकर कडुन ईथे सदस्यत्व घेण्यासाठी विचारणा झाल्यावर मी लगेच तयार झालो.
मी ईमुची पिल्ल्/पक्षी, अंडी व ईमु फार्मवरील पक्ष्यांसाठी लागणारा ईतर खादय पदार्थाची विक्रिही करतो. कुणाला ईमुपालना बद्दल अधिक माहीती हवी असल्यास मला थेट संपर्क साधु शकता.

लागणारी जमिनः

विषय: 
शब्दखुणा: 

गाय,वाघ आणि स्त्री

Submitted by अभय आर्वीकर on 28 January, 2010 - 12:44

माझ्या वाघास दात नाही...... या गझलेतील
"गायीस अभय देण्या,वाघास दात नाही" असा मतला आहे. त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्या मागची पार्श्वभुमी उलगडण्याचा मी केलेला प्रयत्न. बघा तुम्हाला पटतेय का ते?

विषय: 

गुळ उत्पादन व विक्री व्यवसाय

Submitted by चंपक on 20 January, 2010 - 21:57

ग्रामीण भागातील शेती मध्ये दुध अन ऊस हे महत्वाचे घटक आहेत! दुधाचे काम सुरु आहे. मग ऊसाबद्दल विचार सुरु केला..... साखर कारखाना काढण्याची ऐपत तर नाही! पण एक १०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे गुळ उत्पादन केंद्र (गुर्‍हाळ/ खांडसरी/कहाकी-काकवी) बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना! सॅटरडे क्लब ह्या मराठी व्यावसायीकांच्या संघटनेलाही साकडे घातले...पण हाती आले शुन्य! शेती अन पुरक उदयोगांची हीच खरी अडचण आहे....इथुन परतल्यावर पुन्हा प्रयत्न करेलच!

यासंदर्भात सध्या काही गोष्टी करतो आहे-

शब्दखुणा: 

गुर्‍हाळ!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

श्री सुनिल परचुरे ह्यांनी लिहिलेल्या कोल्हापुर कि गुळपुर च्या अनुशंगाने दोन व्हिडेओ:

सदर व्हिडीओ हे यु.पी. टाईप गुर्‍हाळाचे आहेत. कोल्हापुर टाईप मध्ये एकच कढाई/काहिली असते. ह्यात तीन ते चार असतात.

१) ह्यात उसाचा रस बनवण्याचे क्रशर आहे. अगदी कमी खर्चात @ १५ लाखात हे उपयुक्त काम केले गेले आहे. क्षमता: ५०-६० टन प्रति दिन उस गाळप. मेकॅनिकल इंजिनीअर नी यावर कॉमेंट करावी अशी अपेक्षा आहे.

http://www.youtube.com/watch?v=lwnNpceVpmA

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - शेती