दुष्काळ
आजच्या घडीला मराठवाड्यात आणि विदर्भच्या काही भागात दुष्काळ पडलेला आहे....... याच्या बातम्या रोजच टि.व्ही. वर दाखविल्या जातात.........आपल्याला त्या बातम्या पाहुनही मन खिन्न होतं.... तेव्हाच त्या वातावरणात जगत असतील त्यांची काय अवस्था असेल?.... खरं तर खेड्यातला दुष्काळ हा फारच भयान असतो.... पण दुष्काळ हा यावर्षीच पडला असही नाही..... तो चार-पाच वर्षात महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाला भेट देतो....... मग अशा दुष्काळात कसं जगायचं हे गरिब जगतेला माहिती असतं.....