मागील महिन्यापासुन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील बातम्या वाचनात येत आहेत. उदा, मराठवाड्यातील काही भागात तर पावसाने अजुन तोंड दाखवलेले नाही. सप्टेंबर उगवला तरी अशी परिस्थिती असेल तर पुढे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवणार हे निश्चित.
माझ्या गावातील (अर्थात सर्व अनिवासी भारतीय) मित्रमंडळी हे दुष्काळग्रस्त भागात काम करणारे स्वयंसेवक वा स्वयंसेवी संघटनेच्या शोधात आहेत. सरकारी यंत्रणेवर बहुतेकांचा विश्वास नसल्याने इतर कुठला खात्रीशीर मार्ग आम्ही शोधतोय जेणेकरून काहीतरी मदत योग्य मार्गाने योग्य ठिकाणी अन योग्य वेळेत पोहोचेल.
प्रॉपर्टी
ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे
त्याला त्याची किंमत कळते
कित्तेक कित्तेक कामांसाठी
प्रॉपर्टीनेच तर हिंमत मिळते
स्वाभिमानाची मनामध्ये
प्रॉपर्टी ताकत भरू शकते
तर कधी आपलीच प्रॉपर्टी
आपल्याला घातक ठरू शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पाण्याचे स्थलांतर
इकडचे तिकडे गेले पाहिजे
तिकडचे इकडे आले पाहिजे
किमान दुष्काळी परिस्थितीत
पाण्याचे स्थलांतर झाले पाहिजे
मात्र माणसांच्याच मदतीसाठी
माणसांचे माणूसपण कडवे होते
अन् पाण्याच्या स्थलांतरासही
प्रांतीय आकुंचन आडवे येते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कांद्याच्या धंद्यात
कांद्याचा तुटवडा भासताच
व्यापार्यांनी भाव वाढवले
ज्यांनी कांद्याला घडवले
कांद्याने त्यांनाही रडवले
व्यापारी मित्रांनाही कांदा
शेतकर्यांनीच पुरवला आहे
मात्र या कांद्याच्या धंद्यामधून
शेतकरी जणू हरवला आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कांद्याचा भाव,...
ज्यांनी पिकवले कांदे
त्यांचेच झालेत वांदे
तरीही जोरात आहेत
इथे कांद्याचेच धंदे
कांद्याची झालेली भाववाढ
हा कटू नीतीचा डाव आहे
ज्यांनी कांदे पिकवले नाही
त्यांच्याच कांद्याला भाव आहे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सरकारी हातभार
होरपळतोय हा महाराष्ट्र
तरीही सरकार गप्प आहे
शेतकरी आत्महत्या करतोय
सरकारची भुमिका ठप्प आहे
आणीबाणी ओळखुन घेऊन
कर्तव्यदक्ष व्हायला पाहिजे
मोडत्या संसारांना शेतकर्यांच्या
सरकारने हातभार लावायला पाहिजे
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
मोदी साहेब,...!!!!
बिहारच्या निवडणूका आहेत
म्हणून तुम्ही त्यांना पॅकेज दिलं
आमचा मुळीच याला विरोध नाही पण
सांगा आम्ही तुमचं काय नुकसान केलं,.?
द्यायचं होतं आम्हालाही पॅकेज एक
खरंच झाले असते शेतकरी खुश
तोडले असते गळ्याचेही फास
अन् त्यागलं असतं पिण्याचं विष
तुमचा अच्छे दिनचा नारा साहेब
शेतकरी अजुन ना विसरले आहेत
पण आता कळेनासंच झालंय की
अच्छे दिन कुणाला आले आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
शेतकरी राजा
रोज-रोज खचतो आहे
नशिबालाच दोष देऊन
कुणी मरतो फास घेऊन
कुणी मरतो विष पिऊन
खचला आहेस तरी राजा
मरण स्वस्त करू नको
जगुन दाखव हिंमतीनंच
आत्महत्येनं मरू नको
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
दुष्काळात,...
पाऊस-पाऊस करता-करता
पावसाळा कोरडा-ठाक आहे
होरपळतोय हा निसर्ग तरीही
का पावसाची डोळेझाक आहे
या वाढत्या भीषण परिस्थितीने
उरात धसका भरू लागला
अन् दुष्काळी भागात पाऊसही
आता बोगस दौरे मारू लागला
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
दुष्काळी पर्यटन
वरचे आलेत फिरून जातील
खालचेही येऊन फिरून जातील
दुष्काळी भागाच्या दौर्यासाठीही
कुणी उदंड खर्च करुन जातील
आता नव्या-नव्या दौर्यांचीही
रोज-रोज नविन खबर येते
दुष्काळाच्या नावानं का होईना
पण पर्यटन मात्र जबर होते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३