स्पर्श जितका बोलका हृदयांस होतो
पानगळ असली तरी मधुमास होतो
तू निघुन जातेस याची खंत नाही
वळुन जे बघतेस त्याचा त्रास होतो
मित्र म्हणणे जवळचा हे खास नाही
ते तसे होईल तेंव्हा खास होतो
तेज देण्या केवढा बघ सूर्य जळतो
फायदा नात्यातला चंद्रास होतो
केवढी माया तुझी आहे प्रसिद्धी
स्पर्शतो क्षणभर तुला, तो दास होतो
बंधने तुडवीत जातो सहज सारी
हा तुझ्याइतका मलाही भास होतो
प्रेम इतके काय कामाचे जिथे की,
आपला वापर 'अजय' सर्रास होतो
मॅनेजरसाहेबांनी रोहनच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि ते म्हणाले,"रोहन, मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो. मला हे सांगायला आनंद वाटतो कि तू आपल्या कंपनीचा स्टार सेल्समन आहेस. जर आपल्या प्रत्येक सेल्समनने तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कंपनी ची प्रचंड प्रगती होईल." मॅनेजरसाहेबांचे बोलणे ऐकून रोहनची छाती अभिमानाने भरून आली. "आणि हि आहे तुझ्या कष्टांची पावती, तुझे अप्रेजल लेटर.", असे म्हणत मॅनेजरसाहेबांनी एक एन्वलप पुढे केले. रोहन चा आनंद गगनात मावेना. त्याने थरथरत्या हातांनी एन्वलप घेऊन उराशी घट्ट कवटाळले.
आजच्या आम्हा तरुणांना प्रश्न पडतो कि फेसबुक नव्हतं तेव्हां लोक काय करत असतील ? त्यांच्या जीवनात काय अर्थ असेल ? सोशल नेटवर्किंग, चॅट, गटग हे काहीच नव्हतं का ?
या लोकांचा टाईमपास काय असेल ?
आणि त्याचं उत्तर मिळालं..
पहाच !
.
.
.
.
.
काही जाहिराती मनाच्या किती जवळच्या वाटतात. काहींची गाणी आपलीशी वाटतात. काहीतल्या थीम तर काही केरेक्टर..काही काही जाहिराती पाहतांना तर हमखास आपल्या काही जवळच्या माणसांची आठवण येते. काही जाहिरातीतले वातावरण जुने दिवस आठवण करवून देतात काही स्वप्नील भविष्यात घेऊन जातात….
SBI Life च्या त्या जुन्या गाण्यावर आधारित जाहिरात मला नेहेमीच attract करायची
'हम जब होंगे साठ साल के …या गाण्याच्या चालीवर स्पेशली जेव्हा तो म्हणतो ….
लंबी सी एक गाडी मे फिर तुमको लेकर जाऊंगा
तुम अंदर से देखना बाहर और मै आईस्क्रीम खाउंगा
वरटीप - कुणाच्याही भावना दुखवायचा उद्देश नाही.
लोखंडी खाटेवर - विडंबन कविता (गाण्याशी संबंधित सर्व थोर आणि महान मंडळींची आणि रसिकांची माफी मागून… )
चाल - मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग
-----------------------------------------------------
लोखंडी खाटेवर अंग निजून दुखतंय ग
सांगा या ढेकणास रक्त शोषून पीडतोय ग।।धृ ।।
सूळसूळतो गोधडीत हाच दुष्ट मेला ग
हुळहुळतो चाव्याने अजून देह सारा ग ।।१।।
अजून तुझे काविळीचे डोळे पिवळे पिवळे ग
अजून तुझ्या देहामध्ये त्राण नाही उरले ग ।।२।।
भारतात चांगल्या कलाकृतींना जीवन नाही अस मला सतत वाटत असतं. इथल्या लोकांची कलागुणांची पारख कमी पडतेय कि मुळात कलागुणांची आवडंच नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण असे आहे खरे …. आणि फिल्म च्या बाबतीत हे पूर्वीपासून घडत होते त्याहीपेक्षा आज ते त्याहीपलीकडे अजीजीने घडत आहे. म्हणुनच कदाचित 'The ship of theseus' सारख्या दर्जेदार फिल्म भारताच्याच निर्मात्यांना भारतात रिलीज करावा वाटत नाही. त्यासाठी कोणीतरी (किरण-आमिर खान) विशेष प्रयत्न घेऊन आपल्यासाठी म्हणून रिलीज करतात आणि इतकं होऊनही परदेशात गाजलेला सिनेमा त्याच्याच देशात भारतात चक्क आदळतो आणि वाईटटट आदळतो.
कित्येक वर्षांनी दुरदर्शनची एखादी मालिका बघितली - माझी शाळा. खरं तर ही मालिका बघण्याची इतकी उत्सुकता होती, की एकाचवेळी ५-६ भाग बघितले, आणि आवडलेही... पण....
ऋतु - संधी
अलख गाजता शिशिराचा तो
तरुकुळ अवघे तल्लीन झाले
हिरवी-पिवळी वस्त्रे त्यागून
पुरेपूर ते निसंग झाले
पुष्पभूषणे नको उपाधी
दंड-कमंडलू हाती धरले
वैराग्याचे तेज झळकता
हस्त रवीचे मृदुमय झाले
उभे उभेचि लावी समाधी
श्वास निरोधन इतुके केले
जीवनरसही नको बोलुनी
धरणीमाते सचिंत केले
किती काळ ही लावी समाधी
द्विजगण अवघे व्याकुळ झाले
निष्पर्णशा त्या शाखांवर
गान तयांचे लोपून गेले
ऋतुराजाची येता स्वारी
ताम्रध्वजा त्या डोलु लागती
प्रसन्न हांसत डोलत शाखी
वृक्षकुळे त्यागती समाधी
गर्द हरित पालवी झळकता
पक्षीकुलांच्या कंठी गाणी
रंगांची उधळण होताना
बारीकराव...
एक होते बारीकराव
सदा त्यांची काव-काव
नक्को हे पोहे अस्ले
कोथिंबीर खोबरे किस्ले ???
पोळी-भात आवडेना
भाजी कोणती चालेना
अजून होती बारीक बारीक
सग्ळे म्हण्ती आली खारीक
बारीकराव बसले रुसून
आई सांगे त्यांना हसून
पोळी-भाजी, भात ताजा
सग्ळे खावे माझ्या राजा
कोशिंबीर करकरीत
फळे मस्त रसरशीत
मजेत खावे सग्ळे मस्त
सोडून सारे वेडे हट्ट
घट्ट - मुट्ट होशील बघ
कोण कशाला चिडविल मग .....
-----------------------------------------------------