दिलखुलास व्यक्तींमुळे रंगलेला दिलखुलास कार्यक्रम : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा
कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा या वेळीही मोठ्या उत्साहात पार पडली. यंदाचे वर्ष स्पर्धेचे 5 वे वर्ष होते. यावर्षी प्रेम या विषयावर आधारीत कविता पाठवून महाराष्ट्रातील 104 कवी-कवयित्रींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या सर्व कवींनी पाठविलेल्या कवितांच्या काव्यलेखनाचे परीक्षण गझलकार श्री. दिपक करंदीकर, कवयित्री सौ. रश्मी तुळजापूरकर यांनी केले. त्यातील निवडक 22 कवींनी दिनांक 30 मार्च 2014 रोजी झालेल्या अंतिम फेरीत सहभाग घेतला. काव्यसादरीकरणाचे मुख्य परीक्षण कवयित्री श्रीमती जयश्री घुले आणि कवी श्री. सारंग भणगे यांनी केले.