धार्मिक-साहित्य

'श्रीसाईसच्चरित' प्रस्तावना

Submitted by आनन्दिनी on 6 April, 2017 - 04:27

श्री तुकोबांचे अभंग धन

Submitted by पुरंदरे शशांक on 29 March, 2017 - 00:08

श्री तुकोबांचे अभंग धन

परीसाचे अंगे सोने जाला विळा । वाकणे या कळाहीन नोहे ।१|
अंतरी पालट घडला कारण । मग समाधान ते चि गोड ।२|
पिकली सेंद पूर्वकर्मा नये। अव्हेरू तो काय घडे मग ।३|
तुका म्हणे अाणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाके ।४|गाथा ३३२२॥

वाकणे - वक्र, कळाहीन - निस्तेज, परिस - नुसत्या स्पर्शाने लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक पदार्थ, सेंद - एक फळ, अव्हेर - अस्विकार

मृत्यूचे ठिकाण आणि आत्म्याची मुक्ती

Submitted by एक मित्र on 6 March, 2017 - 10:27

काही वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. आमच्या मूळ गावापासून दूर शहरात असणाऱ्या मोठ्या इस्पितळात आयसीयूमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती त्यांची अखेरची रात्र होती हे त्यांना कळून चुकले होते. ते त्यांनी आम्हाला डोळ्याच्या खुणेने सांगायचा प्रयत्न केला पण आम्हाला ते कळले नाही. पोक्तपणाने सल्ला देणारे मोठे असे कोणी आमच्याजवळ नव्हते. आईच्या मनाला हि गोष्ट फार लागून राहिली आहे. इतक्या वर्षानीही तिला असे वाटते कि त्यांना त्या रात्री आपण गावाकडे हलवले असते तर बरे झाले असते. एकटेपणी आयसीयूमध्ये त्यांचा शेवट झाला.

ज्ञानेश्वरी - गुपिते

Submitted by महेश ... on 22 February, 2017 - 01:34

ज्ञानेश्वरी अध्याय १५ पुरुषोत्तम योग

"मी"

Submitted by सेन्साय on 13 February, 2017 - 09:50

अगणित शत्रू मिळून न केले
द्विगुणीत नुकसान मीच माझे
गरज पडता धावा केला देवाचा
ईप्सित साधता आठव फक्त स्वार्थाचा
असा मी माझीच झोळी फाडाया तत्पर झालो
विसर होताच तुझा, माझा "मी" मोठा झालो
मीच माझा ..... या अहंकारात गुरफटता
पुन्हा काठी बसली न आवाज करता
अकारण कारूण्य तुझे
ज्यामुळे मी भानावर आलो
तुझ्या चरणी माथा टेकता
सुखी अनन्य झालो

मकर संक्रांत

Submitted by Suyog Shilwant on 13 January, 2017 - 11:17

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.

ये आता मागे नाहि.........

Submitted by वि.शो.बि. on 11 January, 2017 - 08:26

मि आजच प्रथम एक अभंग share करत आहे
निसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.
जणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.
त्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.
आपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....
म्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......

निसर्गाचि देन अभंग "शरिर"
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
हात जाइ पुढे पुढे

शब्दखुणा: 

ज्योतिष संशोधक प्रो.के एस कृष्णमुर्ती

Submitted by केअशु on 31 October, 2016 - 21:59

ज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना,
कृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल.

कोण होते हे कृष्णमुर्ती? काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात?
या कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस. कृष्णमुर्ती यांची ही त्यांच्या आजच्या १०८ व्या जयंतीनिमित्य थोडक्यात ओळख.

प्रो.के एस कृष्णमुर्ती यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यात असणार्या "कुथुर" या गावी १ नोव्हेंबर १९०८ रोजी झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले.त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते त्रिचीच्या सेंट जोसेफ्स महाविद्यालयात दाखल झाले.

“मेरे प्रिय आत्मन् . . ."

Submitted by मार्गी on 17 October, 2016 - 04:54

ओशो. . . .

जुलै २०१२ च्या शेवटी ओशो आयुष्यात आले. . योगायोगाने पहिल्याच प्रवचनांमध्ये ध्यान सूत्र ही प्रवचन मालिका मिळाली. तिथून नंतर मग 'एस धम्मो सनंतनो', 'संभोग से समाधी तक', 'ताओ उपनिषद', 'अष्टावक्र महागीता', 'मै कहता आखं देखी' आणि इतर अनेक प्रवचन मालिका ऐकल्या. . . अजूनही रोज प्रवचन ऐकतोय. त्यातून इतकं काही मिळत गेलं आणि मिळतं आहे की, जुलै २०१२ पासून एक नवीनच जीवन सुरू झाल्यासारखं वाटतं. . . . आयुष्याची दोन भागांमध्ये विभागणी करावी- जुलै २०१२ पूर्वी आणि जुलै २०१२ नंतर असं. . .

शब्दखुणा: 

आठवणीतील नवरात्र

Submitted by विनायक on 10 October, 2016 - 08:25

हा लेख माझी आई सौ.रेवा सदाशिव वैद्य हिने नवरात्रानिमित्त लिहिला आहे. तो ६ ऑक्टोबर २०१६ च्या महाराष्ट्र टाईम्स च्या अहमदनगर आवृत्तीत प्रकाशित झालेला आहे.

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य