संत तुकोबारायांच्या पालखीचे देहूतून शनिवारी प्रस्थान झाले. रविवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पालखी पिंपरी-चिंचवड हद्दीत दाखल झाली. तेथून पुढे पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामाला जाण्यास निघाली. महापालिकेच्या वतीने संत तुकाराममहाराज व शिवाजीमहाराज यांच्या ‘भक्ती-शक्ती’च्या प्रतिकृतीचे प्रमुख दिंडेकºयांना वाटप करण्यात आले. त्याचा आनंद बºयाच जणांच्या चेहºयावर होता. पुणे-मुंबई महामार्गावर भक्तीचा जनसागरच लोटला होता. त्यातील काही प्रकाशचित्रे.
वारी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. मायबोलीच्या वाचकांनी स्वत: काढलेली छायाचित्रे टाकून हा धागा चालू ठेवता येईल.
मग तू अवघाचि सुखरुप होसी ....
वैशाखाचं कळाकळा तापणारं ऊन केव्हाच संपून गेलंय, इतकंच काय एखाद-दुसरा सुखद वळिव हि कोसळून बराच काळ लोटलाय .....ज्येष्ठातल्या मोठ्ठ्या पावसाचे शिंपण झाल्याने पेरण्याही जोर धरु लागल्यात ....
आता दिसताहेत ते आभाळभर तरंगणारे काळे, काळे ढग .... खाली जमिनीवर उमटलेली छानशी, नाजुक हिरवळ आणि जागोजाग जमा झालेली पाण्याची छोटी छोटी तळी....
चैत्रातली तांबूस्-पोपटी पालवी जाऊन चांगली हिरवीगाऽर होऊन झाडं झुलताहेत.... रानात फुललेला पळस्-पांगारा आता शेंगाही धरु लागलाय... गुलमोहोर मात्र अजूनही लालेलालच आहे - बहरलेला... कसं एक नवचैतन्य पसरलंय आसमंतात ....
जागू यांच्या या पाककृतीवरून सुचलेली ही पाककृती एकदा करून बघा.
==========================
लागणारा वेळ:
४३ मिनिटे
लागणारे जिन्नस:
आळस - दोन ते तीन दिवसांचा
पाऊस - घराबाहेर खच्चून
पाव कप देशीची झिंग
आकाश काळे गडद
२ तक्के उशाला
सगळ्या लोकल ट्रेन्स फेल
प्रत्येक रस्त्यावर पाणी साठून घोळ
पांघरूण गरजेनुसार
हाताची बोटे कडाकडा मोडून
मोठी जांभई जबडा चिरून
क्रमवार पाककृती:
जागू यांच्या या पाककृतीवरून सुचलेली ही पाककृती एकदा करून बघा.
==========================
लागणारा वेळ:
४३ मिनिटे
लागणारे जिन्नस:
आळस - दोन ते तीन दिवसांचा
पाऊस - घराबाहेर खच्चून
पाव कप देशीची झिंग
आकाश काळे गडद
२ तक्के उशाला
सगळ्या लोकल ट्रेन्स फेल
प्रत्येक रस्त्यावर पाणी साठून घोळ
पांघरूण गरजेनुसार
हाताची बोटे कडाकडा मोडून
मोठी जांभई जबडा चिरून
क्रमवार पाककृती:
सत्यवान-सावित्री
यम (सावित्रीला): तू याला परत माझ्या कडे घेऊन आलीस? कां?
सावित्री: तो यांचा निर्णय आहे. माझा नाही.
यम (सत्यवानाला): तू परत आलास माझ्याकडे ? कां?
सत्यवान (गप्प)
सावित्री: मी सांगते. त्यांना आता जगावसं वाटत नाही...
यम: ते कां?
सावित्री: ते आता आधीचे राहिले नाहीत. आधी ते फूल पाहिलं की हरकून जात. चांदण्यात फिरायला त्यांना खूप आवडे. लहान मुलांची त्यांना खूप आवड होती.
यम: मग?
जय शिवराय रायगड 21 जून : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आज सकाळी सहा वाजता ध्वजारोहण केल्यानंतर सुरू झाला. सप्तगंगा स्नान, पंचगंगा स्नान, शत्रपूजन अशा विधींनी शिवकालीन स्मृतींना उजाळा दिला गेला. सामूहिक शिवआरती पठणानं गडावरचं वातावरण अगदी शिवमय होऊन गेलं होतं.
शिवललकारी, पोवाडे, शाहिरी नमन, मैदानी खेळ असे इतिहास जागवणारे विविध प्रकार रायगडावर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर निघालेल्या पालखी मिरवणुकीतल्या वाद्यांच्या गजरानं रायगड दुमदुमून गेला होता. सर्वत्र आनंदी वातावरण
मधात सज्जनगड मासिकपत्रीकेच्या संपादकांनी राम, हनुमंत व समर्थ रामदास यांची एकत्रीत आरती करण्याचे आवाहन केले होते, त्यानुषंगाने मी आरती पाठविली होती ती खाली देत आहे.
नमस्ते मंडळी
काही दिवसपूर्वी Oh My God या चित्रपटाविषयी ऐकून उत्सुकता चाळंवल्याने स्पेशल आश्रमात सीडी वर चित्रपट पाहणे झाले. आश्रमातील काही मंडळींना चित्रपटात दाखवलेल्या मतांबद्दल तीव्र आक्षेप होते. पण गेल्या वर्षी डिसेंबर म्मध्ये भारत वारीत काही तीर्थक्षेत्राची दर्शने घेतली ,त्यानंतर मनात प्रश्नाचे काहूर उभे राहिले
१. देव-दर्शन हा रिक्शा,ट्रावेल्स वाले ,टुर ओपेरतोर्स आणि आणि तत्सम अनेक मंडळींचा पोटा-पाण्याचा व्यवसाय बनला आहे
किल्ले सुरगड वरील दिनांक ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्वच्छ करण्यात आलेले पाण्याचे टाके .
उन्हाळ्यात थकलेल्या दुर्गप्रेमींना थंड जल प्राशन करण्यास मिळो यासाठी हे प्रयन्त .
या मोहिमेत पायवाटेत अडथला आनणारे जमिनीत खोलवर रुतलेले अगणित दगड काढण्यात आले तसेच शिवप्रेमींना गडावर जाण्यास सोप्पी करण्यात आली आणि गावातील घेर्यात दिशादर्शक फलक लावण्यत आले
दगडांचा बांध घालून तयार करण्यात आलेले सुरगडावरील पायवाट .........
कीर्तन ही कला आद्य पुराण-काळापासून प्रचलित आहे. नारदास आद्य कीर्तनकार मानतात . नामदेव-तुकाराम-एकनाथ -रामदास आणि तत्सम साधूसंतांनी मुघल आक्रमणाच्या काळात हिंदू धर्माला आलेली ग्लानि आणि औदासिन्य/ धोका पाहता कीर्तन /भजन /भारुड /अभंग इत्यादि माध्यमातून लोकजागृती करून धर्मरक्षण केले . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य-निर्मिती च्या मागे संतांनी केलेली लोकजागरुती आणि सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी आहे.