सत्संगती आणि अनुभव
मी स्वतः स्वामीजींचे (स्वामी स्वरुपानंद, पांवस) दर्शन घेऊ शकलो नाही. त्यामुळे ज्यांनी कोणी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतलेले त्यांच्याकडूनच स्वामीजींसंबंधीच्या आठवणी मला ऐकायला मिळाल्या.
सर्व साधारणतः कुठल्याही संतांकडे जेव्हा कोणी जातो तेव्हा त्याला या संतांनी केलेल्या चमत्काराचे फारच अप्रूप असते. त्या चमत्कारांबाबत ऐकण्या-बोलण्यातच त्याला सार्थकता वाटते.
मात्र काही असेही लोक असतात की जे स्वतः पारमार्थिक साधना करत असतात. स्वामीजींसारख्या संतांकडून त्या साधनेच्या संबंधी काही मार्गदर्शन मिळाले तर ते घेण्यासाठी ते जात असतात.
काल दुरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवर आणि इतर प्रसार माध्यमांवर मदर्स डे चा घोष चालु होता. भारतीय संस्क्रूतीत अनेक असे डे आहेत जसे बैल पोळा, नागपंचमी या सारखा हा एक दिवस अस आपल मला वाटत होत.
पाश्चात्य संस्कृतीत मुलं १८ व्या वर्षी वेगळी होतात. त्यांचा संबंध आई वडीलांच्या घराशी रहात नाही. आई ची आठवण काढायचा एक दिवस म्हणुन त्यांनी तो साजरा केला तर समजु शकतो.
भारतीय संस्कृतीत मात्र आईला देव मानण्यात आल आहे. काल मला प्रश्न पडला होता की काय कारण असेल की नाव जरी वडीलांच लावायाच असेल तरी आई आणि वडील यामध्ये आईला अग्रपुजेचा मान का बर दिला असावा ?
अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग ३)
सूर्य जेव्हा आकाशात अक्षरशः जळत असतो तेव्हा कुठे आमच्या अंगात जगण्याइतकी धुगधुगी निर्माण होते तसे संत जेव्हा मोक्षस्पर्शी वैराग्य बाळगून असतात तेव्हा कुठे आमच्यात संसारतारक वैराग्य निर्माण होऊ शकते - असे आचार्य विनोबांचे एक वचन आहे.
तुकोबांसारखे संत हे आपणा सर्वसामान्यांचे कल्याण व्हावे या एकाच हेतूने बोलतात. आपले पांडित्य जगाला दिसावे, आपल्याला खूप मान - सन्मान मिळावा याकरता काही ते लिहित नाहीत.
मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता.
नमस्कार मंडळी.
सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अॅन्ड्रॉईड अॅप तय्यार केले आहे. हे अॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे अॅप निशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध आहे.
हनुमान जयंती
'हनुमान' म्हणजे बल,पराक्रम,नम्रता,बुद्धिमत्ता,सेवा यांचा आदर्श ! हनुमानाला रुद्राचा अवतार मानले जाते.तसेच मरुत किंवा वायूचा पुत्र म्हणून त्याला 'मारुती' ही म्हणतात. शक्ती,भक्ती,पराक्रम यांचा आदर्शवत अशा या दैवताची जयंती आज सर्वत्र मोठया धुमधडाक्यात साजरी होते.
राम जन्मला गं सखे राम जन्मला
मर्यादा पुरषोत्तम प्रभुरामचंद्राचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला असल्याने या तिथीला रामनवमी असे म्हटले जाते. या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामांना जन्म दिला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती. असे महात्म्य आहे या दिवसाचे.
||श्रीरामसमर्थ ||
||जय जय रघुवीर समर्थ ||
आज रामनवमी रामनवमीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा !
घरी नेहमी प्रमाणे रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला ...हा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाच असतो ... अगदी गल्लीतले लोकही घरी उपस्थिती लावतात ... घरातीलच ७-८ पोरं त्यांचा कल्ला त्यातुन मग गल्लीतली ... दंगाच
संपादित - नेट गंडल्याने चुकून तीनदा प्रकाशित झाले आहे हे ........ ... ....... .
..............