महाराष्ट्रात जर फसवणीस साहेबांना त्यांचे आवडते विरोधी पक्ष नेते पद मिळाले तर दक्षिणेतील एका प्रसिद्ध देवस्थानाला घरापासून उलटे चालत जाईन असा नवस बोललो होतो. तरी या साठी काय काय तयारी करायला हवी ? काय काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती हवी आहे. अनुभवी व जाणकारांचे अनुभव वाचायला आवडतील. हातकाही पुरूषांना उलटे चालत जाताना वेगळी काळजी घ्यावी लागते का ? (जर कुणी असेलच तर म्हणून असू द्यावी माहीती. ऐन वेळी कुठे धागा काढत बसू ?)
मायबोलीकरांकडून सहकार्याच्या प्रतिक्षेत.
माझ्याबरोबर शेजारी रहाणाऱ्या काकू व त्यांची बहिण होती.. त्यामुळे अगदी एकटे वाटणार नव्हते. जाताना त्या दोघी माझ्या घरी आल्या व आमचा माझ्या घरून एकत्र प्रवास सुरु झाला..
कार्तिकी पौर्णिमेला मी गिरनार परिक्रमा आणि दत्तशिखरावरील पादुका दर्शन पुर्ण करून आले. बऱ्याच लोकांनी तुझा अनुभव लिही असे सांगितले.. त्याप्रेरणेने एक तोकडा प्रयत्न करत आहे.
त्या जगत्गुरुंच्या दर्शनाचे मी काय वर्णन करु.. शब्द तोकडे आहेत. तरी हा प्रयास गोड मानून घ्यावा ही विनंती करते.
मायबोलीवरही लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तेंव्हा जाणकारांनी सांभाळून घ्यावे ही विनंती. तुमच्या सूचना व अभिप्राय अनमोल आहेत जेणेकरुन लेखनात सुधारणा होऊ शकेल.
नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. OCI करून घेणे गरजेचे आहे का? त्याचे काय फायदे / तोटे असतात? भारतीय नागरिकत्व नसताना तुम्हाला भारतातली प्रॉपर्टी विकायची असेल तर त्याची गरज असते का?
धन्यवाद!
या वर्षी आषाढी एकादशीला मी नागपूरला होतो...रात्र सरता सरता आलेला अनुभव आषाढी पावल्याची पावती होता...तो इथे देत आहे...
काही प्रसंग आठवणीत घर करून जातात.
12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती...उपासाचा दिवस...मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो...गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी...स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली.
तर, आमच्या एका जिवलग मित्राचे नुकतेच लग्न ठरल्याने त्याला बॅचलर पार्टी देण्याचा मानस आहे. साधारण डिसेंम्बर महिन्यात पहिल्या 2 आठवड्यातले 4 दिवस प्लॅन करत असून शक्यतो bike ने जाण्याचा विचार आहे. आम्ही फक्त तीन जण असून अजून एखादा वाढू शकतो.
बॅचलर पार्टी म्हणजे आम्हाला दारू वगैरे प्यायची हे तर आलंच.. तर त्या हिशोबाने एखादं झकास ठिकाण सुचवा.. बजेट उणापुरा 10ते 15 हजार पर्यंत आहे, दारू वेगळी.
तुमच्यापैकी कुणी असं फिरायला गेलं आहे का?
कृपया मार्गदर्शन करा!
अंकाई किल्ला मनमाड ह्या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तरीही हा किल्ला काहीसा दुर्लक्षित आणि पोरका आहे.
अंकाईचे पावसाळ्यातील मनोहर दृश्यएक वर्षापूर्वी मी या गडाचा शेतीच्या वाफ्यातून काढलेला फोटो पाहिला होता. तो फोटो पावसाळ्यातला होता. गावातून दिसणारा किल्ल्याचा फोटो पाहूनच ठरवले की आपण किल्ल्यावर चढाई करायची. त्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली या नंतर असे कळले की पावसाळ्यात या किल्ल्यावर ती चढाई करायला अडचणी येतात. या किल्ल्याबद्दल नकारात्मक गोष्टीच जास्त ऐकल्या, त्यामुळे अशा किल्ल्यावर कधी एकदा जातोय असं झालं होतं.