तीथवाल आता केवळ जुने व्यापारी, सांस्कृतिक किंवा धार्मिक केंद्र उरलेले नाही. १९४७-४८ आणि नंतरच्या प्रत्येक पाकिस्तानी आक्रमणात भारतीय जवानांच्या विजिगिषु वृत्तीची कसून परीक्षा घेणारे रणमैदान ही नवीन ओळख याला प्राप्त झाली आहे.
काश्मीरच्या हाडं गोठवणाऱ्या हिवाळ्यात व पावसाळ्यात उत्तुंग डोंगररांगांनी व्यापलेल्या या प्रदेशाचे जीवाची बाजी लावून, प्रसंगी पाठीवर ओझे लादून पायी चालत जात भारतीय सैनिकांनी रक्षण केले आहे. या भूमीवर किती बांगड्या फुटल्या आणि किती मोहरा हरवल्या याची गणनाही करणे कठीण.
संध्याकाळी तीथवालला पोहोचल्यावर आमचे देवीदर्शन, पूजा होईपर्यंत अंधार पडला. आम्ही बुकिंग असलेल्या फॉरेस्ट हटकडे वळलो. वीज गायब होती. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधार, विजांचा कडकडाट होऊन बारीक पाऊस सुरु
झालेला आणि फॉरेस्ट हट बंद होती. आम्ही थक्क होऊन मेन गेटच्या कुलूपाकडे बघत होतो. सरकारी काम असल्याने आमच्या
बुकिंग स्लिपवर कोणाचेही नाव, नंबर वगैरे नव्हते.
सेव्ह शारदा समिती पाकव्याप्त काश्मिरातील मूळ मंदिरात पूजेसाठी आग्रही आहे. त्यांच्याच प्रयत्नांनी २०१६ मध्ये पाकव्याप्त
काश्मिरातल्या शारदापीठात देवी शारदेचा फोटो ठेवला गेला. पाकिस्तानी न्यायालयाची परमिशन मिळवून पाकिस्तानी हिंदूंना तिथे पूजा करण्याची परमिशन दिली गेली. सध्या हॉंगकॉंग स्थित असलेल्या श्री वेंकटरमण व सौ सुजाता यांनी २०१९ साली ७०
वर्षांपासून दिवाबत्ती न झालेल्या मूळ शारदापीठात पूजा केली.
शारदा मातेच्या विधिवत प्राणप्रतिष्ठेनंत भारतीय लोकांची ही इच्छा पूर्ण करतं आहे तीर्थबल. बल म्हणजे काश्मिरीत क्षेत्र.
तीर्थबलचा अपभ्रंश तीथवाल.
चौकीबल ही पहिली चौकी.
इथेच तंगधार, तीथवाल कडे जाणाऱ्या बाहेरच्या लोकांचा E-PASS चेक केला जातो. शिवाय या चौकीवर रस्त्याचे स्टेटस
दाखवलेले असते. ब्लॅक/ रेड असेल तर रस्ता बंद. अतिशय बर्फ वृष्टीमुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे किंवा दरड कोसळल्याने रस्ता बंद होणे आणि आर्मीने जाहीर केलेली मौसम की जानकारी उर्फ़ ऍडव्हायजरी पाहून प्रवास करणे ही बऱ्याच भारतीयांसाठी नवलाई असलेली गोष्ट इथे कॉमन आहे.
कोव्हिडनंतर आयुष्य हळू हळू ताळ्यावर येत होते. एक काश्मीर ट्रीप पेंडिंग होतीच. तिचं प्लॅनिंग पुन्हा सुरु झाले. तीथवालविषयी एवढे सगळे ऐकल्यामुळे तिथे जायची इच्छा होतीच. हे सहज ‘वाड्या’वर लिहिले तर अश्विनीने त्या देवळात ओटी पाठवली होती त्याची माहिती दिली. अजून काही डीटेल्स टाकले. आता उत्सुकता अगदी चरम सीमेला पोहोचली होती. पण मुलीला घेऊन LOC पर्यंत प्रवास करावा की नाही याविषयी चलबिचल होती.
(दुरावस्थेतले शारदापीठ १८९३. wikipedia वरून साभार)
तीथवालचे हे मंदिर शारदा यात्रेचा एक बेस कॅम्प असले तरी काश्मीरच्या सांस्कृतिक इतिहासातील ही एक छोटीशी तळटीप होती.
एका वेळी साधारण ५००० विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे विद्यापीठ ही या विस्तीर्ण परिसराची खरी ओळख होती.
काशीला जाऊन पंडित पदवी प्राप्त केली की चार पावले उत्तरेच्या दिशेने चालायची प्रथा होती. आता पुढे ज्ञान प्राप्ती करायची ती काश्मिरात. विद्येची देवता सरस्वती वास करते ती काश्मिरात ही पूर्वापार मान्यता. काश्मिरातच का? कारण सतीचा उजवा हात तिथे पडला आहे. त्यामुळे शारदा पीठ हे १८ महाशक्तिपीठांपैकी एक समजले जाते. साक्षात देवीचा वरदहस्त असणाऱ्यांना पंडित म्हणवले गेले तर काय विशेष!
काश्मिरी लोकांच्या लेखी शारदा ही ज्ञानग्रहणाची, सरस्वती ही ज्ञानाची आणि वाग्देवी ही अर्थात वाचेची देवी आणि शारदेचे हे देऊळ हे या तिन्ही देवींचे एकत्र स्वरूप ही त्यांची धारणा आहे.
निवांत ट्रॅव्हल ब्लॉग्ज वाचत राहणे आणि आवडलेल्या ठिकाणांसाठी ट्रीप प्लॅन करणे हा छान पासटाईम आहे आमच्याकडे. भले ती ट्रीप घडो व ना घडो. असाच एक ब्लॉग वाचत असताना शोध लागला तो कर्णाह व्हॅलीचा आणि कृष्णगंगा नदीचा. कर्णाह व्हॅलीत नेमकं कुठं जायचं तर तीथवाल. उत्साहाने नवऱ्याला तो ब्लॉग दाखवल्यावर त्याचेही डोळे चमकले. कधी तरी इथे जायचे याची
खूणगाठ त्याच क्षणी मनाशी बांधली गेली. मुलगी तेव्हा लहान होती. त्यामुळे कधी तरी हे लांब असणार आहे याची जाणीव होतीच.
तेवढ्यात कोविड आला. सगळ्यांचीच सगळी गणितं उलटी पालटी झाली.
नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला! त्याशिवाय शुक्राची कोर, गुरूच्या उपग्रहांचा लपंडाव, चंद्रावरचे कित्येक विवर, पहाटेच्या आकाशातले तारकागुच्छ, आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, सकाळी ट्रेकिंग व ध्यान आणि समारोपाला सूर्य डागाचं निरीक्षण अशी खूप पंचपक्वान्नांची मेजवानी तिथे मिळाली. त्या अनुभवाचं हे शब्दचित्र आपल्यासोबत शेअर करत आहे.
कित्येक वर्षांपूर्वी अगदी ऐन पावसाळ्यात लोणावळा-खंडाळ्याला गेले होते. धुक्यात लपलेले ते हिरवेगार डोंगर, पावसात न्हाऊन पानोपानी प्रफुल्लीत झालेली ती झाडे, हिरव्यागार डोंगरामधून कोसळणारे ते पांढऱ्याशुभ्र पाण्याचे प्रपात. ह्या अशा स्वर्गीय म्हणावं अशा मनोरम निसर्गदृश्याकडे पाहतांना मला काही क्षण अक्षरश: असुरक्षित वाटलं. ह्या सगळ्या असीम सौंदर्याचा फक्त आस्वाद घेण्याची सुद्धा क्षमता आपल्याजवळ नाही. ह्या सौंदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपली पंचेद्रियांची झोळी फाटकी आहे आहे, असे काहीसे विचार मनात येऊन गेले. आपल्या क्षुद्र असण्याची जाणीव नव्याने अस्वथ्य करुन गेली.