आधी शिक्षणानिमित्त, संशोधनानिमित्त, व्यवसायानिमित्त एखादी सदिच्छा भेट, नोकरीसाठी असलेल्या तुरळक संधीतील एखादी पटकावून वगैरे परदेशी जाणार्यांच्या तुलनेत, आता ग्लोबलायजेशनमुळे प्रचंड वाढ झाली आहे. आयटीक्षेत्राने तर परदेशवारीची दारे सताड उघडलेली आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन दशकांपासून परदेशवारी दुर्मीळ राहिलेली नाही. तरीही आपल्याकडे अजूनही 'फॉरीन रीटर्न्ड' माणसाकडे भक्तीभावाने पाहिलं जातं.
"लॉर्ड्स" शब्द उच्चारले की अनेक प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. शाळेत असताना ब्रिटिशांबद्दल ऐकलेल्या गोष्टी (ते साम्राज्यावर सूर्य न मावळणे वगैरे), तेव्हाचा बलाढ्य इंग्लिश संघ, परंपरा पाळण्याची त्यांची सवय यामुळे पूर्वी या सर्वाचा एक दरारा वाटायचा. त्यामुळे जेव्हा १९८३ मधे कपिल च्या संघाने तेथे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या समारंभाकडे व तेथील लोकांकडे बघताना एखाद्या हुशार विद्यार्थाला शाबासकी देणारे शिक्षक लोक असा आविर्भावच जाणवत होता. नंतर हळुहळू ते कमी झाले. भारताने ते दडपण झुगारून दिले - राजकीयदृष्ट्या आणि क्रिकेटमधे सुद्धा.
पावसाने एकदा जम बसवला की हिरव्या निसर्गाचे सौंदर्य बघण्यासाठी मुंबईतील निसर्गरम्य ठिकाण म्हणजे नॅशनल पार्क(संजय गांधी राष्ट्रीय उद्यान).. तशी अधुनमधून फेरी असतेच इकडे.. पण पावसात जाण्याची मजा काही औरच असते... गेल्याच शनिवारी हे पार्क गाठले तेव्हा जवळपासचा परिसर बघून परतायचा विचार होता.. पण खुललेल्या निसर्गामध्ये दंग झालो.. नि चालता चालता थेट कान्हेरीच गाठले.. !
काही अनुभव हे शब्दातीत असतात. ते सांगण्यापेक्षा अनुभवण्यात जास्त गम्मत असते. असाच एक चिंब भिजलेला दिवस १० जुलैचा. मुसळधार पावसात ७०-८०च्या स्पीडने धावणारी मोटारबाईक. कोसळता पाऊस पिऊन निघालेले बाईकवीर, अर्जुनाच्या तीरासारखा अंगावर येणारा पाऊस, चिंब पावसात भिजुन खाल्लेली गरमागरम कांदाभजी, तीन टप्प्यात कोसळणारा विहिगावचा धबधबा. तिसर्या टप्प्यातील १२० फूट उंचीच्या सहस्त्रधारातुन केलेले रॅपलिंग. मध्यावर येताच वर-खाली, आजुबाजुला फक्त पाणी पाणी आणि फेसाळते पाणीच आणि मी. निसर्गावर केलेली हि एक प्रकारची मातच होती. पण त्याच निसर्गासोबत अनुभवलेला १५ मिनिटांचा "तो" कालावधी थरारक होता.
महाराष्ट्राच्या सह्याद्रीरांगेत ५००० फूटाच्या वरती मानाने उभी असणारी तीनच शिखरे ! तिसर्या क्रमांकावरती असलेले 'घनचक्कर' चे मुडा शिखर, दुसर्या क्रमांकाचे 'साल्हेर'वरती असलेले 'परशुराम मंदीरा'चे शिखर नि पहिल्या क्रमांकावरती सह्याद्री रांगेतील सर्वोच्च शिखर असलेले सुप्रसिद्ध 'कळसुबाई शिखर' ! उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ५४०० फुटच्या आसपास ! [मायबोलीकर 'हेम' ने माहिती दिल्याप्रमाणे : कळसूबाई(१६४६ मी.) , साल्हेरवरील परशुराम मंदीर (१५६७ मी.) आणि घनचक्करवरील मुडा (१५३२ मी.)]
३ मे - (होराथॅच)आजचाही ट्रेक जास्त नव्हता व चारवाजेपर्यंत पोचायचे असल्यामुळे निघायची गडबड-धावपळ नव्हती. आरामात नाश्ता करून, डबे भरून निघालो. नितांत सुंदर हिरवाई व सोप्पी चढण. काही-काही गोष्ट वर्णनातीत असतात. शब्दात सामावणं कठीण असतं. एकदा जाऊन आलो की आपण ह्या निसर्गाच्या अश्या काही प्रेमात पडतो की परत परत जावंस वाटतं. हिमालयाची शिखरं साद देत राहतात. काहीजण नुसतेच प्रेमात पडतात तर काही बनतात व्यसनी. पंचावन्न अधिक वयाच्या तडवीकाकांकडे बघून असंच वाटतं. ते लेह-लडाख माउंटन बायकिंगला गेले असताना त्यांचा पाय मोडला.
८ मे -आज असं वाटतंय एक विखुरलेलं कुटुंब खूप दिवसांनी मंगलकार्यासाठी एकत्र आली आणि ते कार्य एकमेकांच्या सहकार्याने पार पाडून एकमेकांचा निरोप घेत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याचा आनंद, समाधान ओसंडून वाहत होते. दहा दिवसांपूर्वी हीच सगळी मंडळी एकमेकांना सर्वस्वी परकी, अनोळखी होती, हे कुणाला सांगितलं तर खरंच वाटणार नाही. ही वेगवेगळ्या जाती-धर्म, प्रांत, वर्गातील लोकं एकत्र यायला कारण होतं - सौरकुंडीपास ट्रेकिंग कॅंप. 'आना आपं बंगळुरू' म्हणत यतींद्र ग्रुपने निरोप घेतला.
नमस्कार मंडळी,
मला परदेशी प्रवासा साठी काही माहिती हवी होती.
मला जगातील सर्व देश ( पर्यटन स्थळे) पहायची आहेत. या वर्षी सुरुवात करुन दर दोन तीन वर्षानी एखादी ट्रिप करयाची आहे.....
माबो करांपैकी भरपुर जण असे असतील कि ज्यानी वैयक्तिक, ग्रुप टुर केल्या असतील स्वताहा किंवा प्रवासी कंपन्यांसोबत. त्यांचे अनुभव काय काय आहेत ?
प्रवास customised tour घेउन करावा कि ग्रुप सोबत?
सगळे आयोजन स्वता: करावे कि प्रवासी कंपन्यांतर्फे गेलेले चांगले ?
प्रवासी कंपन्या ( केसरी, थॉमस कूक, कॉक्स अँड किंगस, राजा- राणी वगैरे) या बद्दलचे अनुभव काय काय आहेत ?
उन्हाळा सरत चालला नि आम्हा भटक्या मंडळींना ट्रेक्सचे वेध नाही लागले तर नवलच.. त्यात भटक्या मायबोलीकरांची बोलणी सुरु होतीच.. कुठे जायचे म्हणून.. यंदाच्या सिजनमधला पहिलाच ट्रेक साधा छोटा असावा म्हणून "सांधण दरी" ठरले.. साम्रद (तालुका:अकोले, जिल्हा: अहमदनगर)या छोट्या गावाजवळ असलेली ही सांधण दरी.. सुमारे दोनशे फूट खोल नि अंदाजे दिडकिलोमीटर पर्यंत विस्तार असलेली ही दरी म्हणजे नैसर्गिक चमत्कारच म्हणावा.. या दरीतून चालणे म्हणजे भूगर्भातून मार्ग काढतोय असे भासते.. थोडक्यात जमिनीला पडलेली भेगच म्हणायची..