फॅमिली एमर्जंन्सिमुळे तातडीने (कदाचित उद्या/परवाच) मुंबईला ट्रॅव्हल करावं लागणार आहे. घरातल्या दोन व्यक्तींची सिच्युएशन क्रिटीकल आहे.
इतक्यात (गेल्या १-२ आठवड्यात)कोणी भारतात गेलंय का?
काॅरंटाईनची गरज आहे का?
इथून काही टेस्ट्स करून जाणं गरजेचं आहे का?
ड्राॅपबाॅक्सची डेट आधीच घेऊन जाणे गरजेचे आहे का?
ड्राॅपबाॅक्सची डेट मिळायला साधारण किती वेळ लागतोय?
कोणत्या गोष्टी इथून घेऊन जाणे अधिक गरजेचे आहे?
प्लिज इतर कोणती माहिती जी मी इथे विचारायला विसरतेय, ती देखिल द्या. खूप धन्यवाद.
.
.
.
आपण का जगतो ?
भुक असणार्या पोटासाठी की उद्या नसणाऱ्या नोटासाठी!
जगण्या मरण्याची स्पर्धा असणार्या जगात कुणाला तरी हरवण्यासाठी की स्वतःच वेगळं असं अस्तित्व निर्माण करण्यासाठी!
आज असणार्या लोकांसाठी की चाके नसणाऱ्या झोक्यासाठी!
अंगा खांद्यावर खेळणार्या निशब्द देवासाठी की पोटात असतांना पदराची सावली देणाऱ्या आईसाठी!
जगणं शिकवणाऱ्या मित्रांच्या मदतीसाठी की हसणं शिकवणाऱ्या त्यांच्या सोबतीसाठी !
स्वर्ग भासणारा निसर्ग पाहण्यासाठी की नरक बनवणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी!!
आपण जगतो स्वतःसाठी की आनंद वाढवणाऱ्या आपल्यासाठी!
आपण का जगतो ?
भुक असणार्या पोटासाठी की उद्या नसणाऱ्या नोटासाठी!
जगण्या मरण्याची स्पर्धा असणार्या जगात कुणाला तरी हरवण्यासाठी की स्वतःच वेगळं असं अस्तित्व निर्माण करण्यासाठी!
आज असणार्या लोकांसाठी की चाके नसणाऱ्या झोक्यासाठी!
अंगा खांद्यावर खेळणार्या निशब्द देवासाठी की पोटात असतांना पदराची सावली देणाऱ्या आईसाठी!
जगणं शिकवणाऱ्या मित्रांच्या मदतीसाठी की हसणं शिकवणाऱ्या त्यांच्या सोबतीसाठी !
स्वर्ग भासणारा निसर्ग पाहण्यासाठी की नरक बनवणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी!!
आपण जगतो स्वतःसाठी की आनंद वाढवणाऱ्या आपल्यासाठी!
आयुष्य हे नेहमीच कुणालाही सहज जमेल तस जगता आलेलच नाहीये ते नेहमी प्रत्येक वळणावर आपल्याला अस्तित्ववा विषयी विचारत असत कधी समाजाच्या रुपात तर कधी नातेवाईकांच्या ,कधी ते आपल्याला काटयांच्या मार्गामधुन जायला सांगतात तर कधी फुले असलेला मार्ग दाखवतात , पण आपल्याला स्वत:ला ओळखता यायला हव, स्वत:चा मार्ग खुद्द स्वत निवडता यायला हवा, आपण काय करायला पाहिजे म्हणजे आपण आनंदी किंवा दुःखी होत असतो ते ओळखता यायला हवी, अशी कोणतीही गोष्ट जी आपण मनापासून करतो ती करताना आपण कोण आहोत हे विसरतो आणी पुर्ण त्या गोष्टीत हरवतो आणि ती गोष्ट आवडीने करतो ती करायलाच पाहीजे तेव्हा तुम्हाला तुमच्या मधल्या त्या ' मी कोण '
शेक्सपीयर-एक वेगळा हृद्य अनुभव
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट.मनात दडून बसलेली एक सूप्त आशा मूर्तरूपास आली.१९८७च्या नोव्हेंबर मध्ये मला सर्व प्रथम विदेशी जायची संधी मिळाली.खूप काही शिकायला मिळाले,सुखद,नाविन्यपूर्ण अन अविस्मरणिय अनुभव आले.त्यातीलच हा एक.
लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करून 10-1५ वर्ष झाली आहेत. पण अजूनही कधी रात्री पाऊस पडून जातो आणि दूरवरून ट्रेनची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. कोण बरं प्रवास करत असेल ह्या ट्रेनने असा विचार मनात चमकून जातो. आणि मग मिटल्या डोळ्यांसमोरून सुळेभावी, सुलढाल, सांबरा,क्यार्कोप,घटप्रभा ,खानापूर अन तिथला वाघाचा पुतळा अश्या कित्येक वर्षात न पाहिलेल्या स्टेशनांचे फलाट पळत जातात. दूर कुठेतरी एक किल्ला दिसायला लागतो. सामान कंपार्टमेंटच्या दाराशी नेऊन ठेवायला सगळ्यांची लगबग सुरू होते. त्यातच मी, आई आणि बहिण दिसायला लागतो. काही मिनिटांनी आणखी एक बोर्ड दिसतो - आमच्या आजोळच्या स्टेशनाचा.
अवेळी आलेल्या पावसानं चांगलाच जोर धरला होता. बऱ्याच वेळ वाट बघून मी घरापर्यंत भिजत जायची मानसिक तयारी केली. खाली जाऊन सायकलवर टांग टाकली आणि निघालो.
ऑफिसपासून घरापर्यंतचा सायकलचा निवांत प्रवास म्हणजे मनात खूप वेळ वाट बघत बसलेल्या विशिष्ट विचारांना एक हाक असते. दिवसभर ह्या विचारांना पुरेसा वेळ किंवा 'फुरसत' मिळत नाही.
निवांत आणि एकांत क्षणाची वाट बघत बसलेले हे विचार संधी मिळताच डोक्यात तरळू लागतात. त्यातून हेडफोनवर 'ट्रांस' सुरू असेल तर मग ह्या विचारांना अजूनच पोषक वातावरण. हा ट्रान्स 'आतलं' आणि 'बाहेरचं' जग यांच्यातील एक भिंत बनून जातो.
एका व्हाअॅ गृपमधील झालेल्या चर्चेचा धाग्याच्या रुपाने गोषवारा घेतला गेला आहे. आपली मते येथे मांडावीत जेणे करून पुन्हा चर्चा होवून मत मतांतरात नवे मुद्दे पुढे येतील.
आपले जे काही वाहन असते भले ते दुचाकी असो, चारचाकी असो, तर ते वाहन वॉरंटी कालावधीत आपण अधिकृत देखभाल केंद्रात त्याची देखभाल करून घेत असतो. वॉरंटी कालावधी संपला की सर्वच कंपन्यांचे वार्षिक देखभाल करार असतात. असा करार केला तर, तिन अथवा चार प्रिव्हेंटिव्ह सर्वीसेस वर लेबर चार्जेस मध्ये सुट, स्पेअर पार्टवर सुट अशी ऑफर असते. तसेच किरकोळ दुरुस्तीचे पैसे ते लावत नाहीत.
" विश्वास " हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी झाला आहे असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक अदृश्य मंगल शक्ती आहे, उर्जा आहे, जी चराचरात विद्यमान आहे. आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे ईश्वरी शक्तींचा स्तोत आहे आणि तो अखंड प्रवाहीत आहे. या शक्तीचा म्हणजेच दिव्यत्वाचा प्रत्यक्ष प्रत्यय या अशा ठिकाणी जाऊनच घेता येतो. मन हे निसर्गतः चंचल आहे. ते एकाचवेळी दश दिशा फिरत असते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ते कधीही स्थिर होत नाही.
खूप काही अनाउन्समेंट कानावर पडतायत...
त्यात फेरीवाल्यांचे आवाज वेगळेच...
ट्रेनचा डबा तसा फारसा भरला नाहीये पण नजरेला कोणी भावत नाहीये ...खिडकीतून पाऊस दिसतोय .. ofcourse मला विंडो सिट यासाठी तर आवडते ...खूप दिवसांनी गावाला जातेय ..एक्साईटमेंट होती ..पण आता कमी होत चालली आहे कारण ट्रेन अर्धा तास झाला आहे तिथेच आहे ....
स्टेशन फारसं ओळखीचं नाहीये म्हणून खिडकीतून जमेल तेवढा जमेल तसा पाऊस जमा करतेय मग तो ओंजळीतून निसटताना चा असो की डोळ्यात भरून घेतानाचा ....
घडी बघून बघून डोळे थकले होते .. त्याचे काटे पुढे सरकत होते पण माझी ट्रेन नाही...
तेवढ्यात....