'मिळून सार्याजणी' या मासिकाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष. 'मिळून सार्याजणी' हे जगण्याशी, प्रामुख्यानं स्त्रीच्या जगण्याशी, अनुभवांशी जोडलं गेलेलं आणि म्हणूनच अनुभवांना प्राधान्यानं स्थान देणारं मासिक आहे. स्त्रीप्रश्नांबाबत बोलताना पुरुषांनाही सामावून घेत 'जगणं' जोडून घ्यायचा प्रयत्न या मासिकानं सतत केला आहे. जगण्याचा अनुभव देणार्या, या मासिकात आजवर प्रसिद्ध झालेल्या अशाच काही निवडक कथांचा संग्रह - 'गोष्टी सार्याजणींच्या'.
स्वातंत्र्यानंतरच्या भारतातल्या प्रगतीचा, अधोगतीचा, राजकारणाचा, सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनाचा आलेख म्हणजे ’संधिकाल’ ही कादंबरी. मध्यमवर्गीय भिकोबा आरस आणि त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर वाचक त्या त्या काळात त्याच्यांबरोबर वावरायला लागतो, आपल्या मतांना पुन्हा जोखून पाहतो इतकं प्रभावी व्यक्तिरेखाटन आणि काळाचं चित्र ’संधिकाल’ मधून मधु मंगेश कर्णिक घडवितात. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील मराठी मध्यमवर्गियांचा, आपली संस्कृती व मूल्ये जपत जगण्यासाठीचा आणि नव्या विस्मयकारक बदलात टिकून राहण्याचा संघर्ष म्हणजे ’संधिकाल’.
१६ जून रोजी श्री संतोष जोशी लिखित 'कीज' ह्या पास्ट लाईफ रीग्रेशनवरचे पुस्तक अभिनेते श्री सुरेश ओबेरॉय ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाले. ह्या पुस्तकाविषयी (लेखकाचे विचार) व थोडे लेखकाविषयी
'कीज' म्हणजे काय
कुठल्याही देशाचं वर्तमनातलं स्वरूप हे त्याच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक इतिहासावर अवलंबून असतं. भारतही याला अपवाद नाही. अगदी सिंधू संस्कृतीपासून ते ब्रिटिशकाळापर्यंतच्या असंख्य घडामोडींनी या देशाला आजचं रुपडं बहाल केलं आहे. या हजारो वर्षांच्या काळातल्या व्यक्तींचं, घटनांचं म्हणूनच आजही महत्त्व आहे. कारण भूतकाळातल्या घटनांवरच वर्तमानकाळ उभा असतो आणि आपण आज जे व्यक्तिगत व सामाजिक राष्ट्रीय स्तरावर जगतो, त्यातून भविष्यकाळ आकार घेत असतो.
वाचन आणि आपण
आज,जागतिक पुस्तकदिनी मनात येतंय की खरंच किती रटाळ झालं असतं जगणं या पुस्तकांशिवाय.आपलं स्वतःचंच जगणं जगण्याची सक्ती. तेही तसं रोमहर्षक असतं म्हणा, उनसावल्यांचं,सुखदु:खांचं,स्थित्यंतरांचं,संकटांचं,संधींचं वगैरे वगैरे,पण आपल्यापुरतंच फक्त.
एखाद्याला (खरं तर प्रत्येकालाच) खूप भूक असते, एका जन्मात अनेक जगणी जगायची असतात, अनेक कथानकं भोगायची असतात त्यातल्या थरारांसकट.
म्हणून तर पुस्तकं भेटतात आपल्याला. प्रतिभेचे अनंत रंग घेऊन पुढे सरकत रहातं जगण्याचं महाकथानक, कधी महाकाव्य..
त्या वाचनप्रवासाचा हा एक धावता आढावा..
सामान्य माणूस सहसा विज्ञान, वैज्ञानिक आणि एकंदरीतच शास्त्रीय प्रक्रिया याकडे एकतर जादूची कांडी (पुराणमतवादी असतील तर यक्षीणीची वगैरे!) किंवा अतीविशेष बुद्धी असलेल्या मोजक्या लोकांचे काम अशा दोनच टोकाच्या भूमिकेतून पाहतो. यात भर म्हणून ’सायन्सला तरी सगळे कुठे कळले आहे’ आणि ’आमच्या लोकांनी हे सगळे आधीच शोधले होते’ हे दोन आत्यंतिक पवित्रे आहेतच. या सर्वांमुळे विज्ञानाकडे पाहण्याची स्वच्छ नजर तयार होण्यास अडथळे येतात. ’विज्ञान हे मानवी कार्य आहे- सायन्स इज ह्युमन एंडेव्हर’ या दृष्टीने सर्व शास्त्रीय व्यवहाराकडे पाहिले जाणे फ़ार गरजेचे आहे.
आताच महिला दिनानिमित्त 'घर दोघांचे' वर आपण अनेक प्रतिक्रिया वाचल्या. पसरवणारे नी आवरणारे असे वर्गीकरण कसे झाले, कामांचे वाटप फार पूर्वीपासून असे का आहे, हल्ली काही वर्षांत यात होत चाललेले बदल आधीपासूनच का नाही झाले असे बरेच प्रश्न पडले होते. त्याचवेळी एक पुस्तक वाचनात आले - Why men don't listen and women can't read maps. लेखक Allan and Barbara Pease यांनी लिहीलेले हे पुस्तक मजा म्हणून वाचायला चांगले वाटले.
कृपया लक्षात असूद्या की इथे मी माझी मते किंवा मला पटणारी मते देत नसून लेखकद्वयींची मते देत आहे.