सकाळी जरा लवकरच कोल्हापूरच्या स्टेशनवर पोहचलो होतो. रेल्वे फाटकाच्या बाजूने मुद्दामच स्थानकावर गेलो, म्हणजे कोयनेचा कार्य अश्व (इंजिन/लोको) दिसेल, असा विचार केला होता. मी पोहचायच्या दोन मिनिट आधी १७४११ महालक्ष्मी दोन नंबरवर आली होती. या गाडीने रेल्वेचा बडा अधिकारी कोल्हापुरात आला होता. त्यामुळे त्याच्यासाठीचा खास डबा महालक्ष्मीला सगळ्यात मागे जोडलेला होता. अधिकारी अजून डब्यातून उतरला नसला असावा. कारण त्या डब्याच्या दरवाज्याच्या आजूबाजूला अन्य अधिकारी आणि रेल्वे पोलिसांचा गोतावळा होता.
कठोर परिश्रम, चिकाटी आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर दीडशे पेक्षा अधिक वर्षांपूर्वी लंडनमध्ये सुरु झालेली जगातली पहिली भुयारी रेल्वे, जिला लोक भाषेत ट्युब म्हणतात, ते एक मानव निर्मीत आठवं आश्चर्यच वाटत मला. आणि म्हणूनच मी जेव्हा या टुयबने पहिल्यांदा प्रवास केला तेव्हा गाडी जरी जमीनीखालुन जात होती तरी मी मात्र अक्षरशः हवेत होते.
एनडीए सरकारचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभु ह्यांनी ह्या सरकारचे संपूर्ण वर्षाचे पहिले रेल्वे बजेट आज मांडले तर अर्थंमंत्री अरूण जेटली सर्वसाधारण बजेट परवा मांडतील.
नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी कोणत्या स्टेशनवर उतरावे? सांगलीच्या गणपतीचे आणि कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शनही घ्यायचे आहे. तेव्हा प्रवासाचा क्रम कसा ठेवावा. मुंबईहून ट्रेनने जायचा बेत आहे. कॄपया चांगली हॉटेल्सही सुचवा.