काल कंपनीतून घरी आले.. नेहेमीप्रमाणे दारावरचं भलं मोठं कुलूप माझ्या स्वागतासाठी हजर होतं.... 'एकाकीपणा' हा कुलूपाचा प्राणप्रिय सखा असल्याने सध्या 'कुलूप ' हाच माझा आदर्श आहे.. ज्याचं 'अस्तित्व' हा इतरांच्या 'अस्तित्व नसण्याचा' पुरावा असतो, ते कुलूप हा माझ्या पुण्यातील वास्तव्याचा प्रेरणा स्त्रोत आहे असं मी म्हणेन...ते जसं आयुष्यभर एकटेपणाला कवटाळूनही आपलं आयुष्य सार्थकी लावतं , तसंच माझ्या सध्याच्या एकटेपणातूनही मला काहीतरी अर्थपूर्ण साध्य करायचं आहे , ही भावना माझ्या मनी बळावतेय..
कोकीळेसारखं, आपलं पोर
दूस-याच्या घरट्यात सोपवून
काडी कापूस जमवून नेटानं
आपलं स्वत:चं घर बाधण्यासाठी
दिवस रात्र राबायचं
मिळेल तसा तोकडा वेळ
पूरवून, वाढवून
पिलांसाठी, पिलांसोबत
खेळत, शिकवत आणी शिकतही
दिसामासी वाढणारं रुप
प्रेमानं पहात सुखावायचं
त्यांच्या वाढत्या कर्तुत्वाचा
आणी उंचीचाही अंदाज येईस्तोवर
आपल्या आयुष्यातील
सावल्या लांबताना पाहून
जाणवतं, गेला केवढा काळ
बोरकरांच्या कविता नेमक्या कधीपासून वाचायला लागले ते आठवत नाही. त्या वाचलेल्या कविता कधीपासून उमगायला लागल्या ते ही सांगता येत नाही. परवा अचानक बोरकरांची कविता पुन्हा भेटली. ८ जुलै हा बोरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने काही बोरकरप्रेमी मित्रांनी त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठरवला. त्यात मलाही कविता वाचायला बोलावलं आणि हेच निमित्त झालं पुन्हा कविता शोधायला.
कवितांचे २ खंड, समीक्षेची पुस्तकं, नक्षत्रांचे देणे आणि मुख्य म्हणजे पु लं आणि सुनिताबाईनी बोरकरांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले त्याचे भाग एवढं सगळं जमा झालं.
दिनांक ९/०७/२०१४ रोजी आषाढी एकादशी (देवशयनी) आहे .हे व्रत करणार्या सर्वांना ते विशेष फलप्रद व पुण्यप्रद ठरो ही विठ्ठलचरणी प्रार्थना
विठ्ठलाचे काही शेर
जेव्हा हवे घेशी बुडवशी विठ्ठला स्वतःमधे
आयुष्य माझे का तुला बिस्कीट-खारी वाटते
______________________________________
फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी
______________________________________
एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते
______________________________________
नको बोलावणे धाडूस आषाढात यंदाच्या
भरतवर्षात चलच्चित्रपट जनतेस प्रिय झाल्याने कवींनी पार्श्वभागी वाजणा-या गीतांकरिता कविता लिहीण्यास सुरुवात केली. हिंदी नामक भाषेच्या चलचित्रपटांच्या सुवर्णकाळी अमिताभ बच्चन नामक देवाने जनतेस दर्शन देऊन बोध दिला. याकामी या दिव्यवाणीस एका पवित्र आणि आनंदी आत्म्याची साथ लाभली ज्यास सामान्य गण भप्पी लाहीरी या सामान्यनामाने ओळखत. अंजान या विशेषनामाने प्रत्यक्ष भगवंताचेच शब्द या स्वरसाजातून जनतेत रुजले ते असे..
प्रथम परीच्छेद (कडवे)
अरे अरे अरे ना ना ना...
आज रपट जाएँ तो हमें ना उठैइओ
आज फिसल जाएँ तो हमें ना उठैइओ
हमें जो उठैइओ तो - 2, खुद भी रपट जैययो
हा खुद भी फिसल जैययो
आम्चं बाळ...
पाळण्यात झोपलंय इटुक्लं बाळ
चळवळ करुन दमलंय पार
इटुकल्या बाळाचं नाक नै बट्टऽण !!!
डोळे टकाटका नी डोके पार चमन ...
इटुक्लं बाळ चालवते सायकल
हाता-पायांची किती ती वळवळ
इटुक्लं बाळ काय काय सांग्ते
आईला माझ्या बरोब्बर कळ्ते
दोन वर्षापूर्वी मुलांनी पासपोर्ट काढून घ्या म्हणून आमच्यामागे लकडा लावला होता तेव्हा मला '''हा नसता खटाटोप कशाला ?' असेच वाटले होते. तरीही त्यांचा आग्रह म्हणून काढून ठेवले होते.
दोन तीन महिने लागले ते मिळायला. आम्हाला गरज नव्हती म्हणून त्या उशिराचे काही वाटले नाही. मिळाल्यानंतर सुरक्षित स्थळी ठेवून विसरून ही गेलो.
अधून मधून ' केलाच आहे इतका खटाटोप तर एकदा तरी परदेशाची
वारी घडावी' असा विचार डोकावून जात असे, पण तो तेवढ्यापुरताच!
रुचिता चपलेचा तुटलेला बंद पायाच्या अंगठ्यात आणि त्याच्या शेजारच्या बोटात घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत तशीच फरपटत चालत होती. ‘आत्ता जवळ मोबाईल असायला हवा होता...कोणालातरी घ्यायला तरी बोलावलं असतं. आता मेन रोड पर्यंत चालत जाव लागणार ! मग तिथे रिक्षा मिळेलच....’ कपाळावर आठ्या आणत ती स्वतःशीच पुटपुटत होती.
आज नवा पाऊस आलाय
आता तुझा फोन येईल
बोलू आपण बरच काही
रोजच्याच गोष्टी,
रोजचच जगणं, जिंकणं, हरणं,
कोठेही पावसाचा उल्लेख न करता
उरात भरलेला मातीचा गंध लपवत
थंड वा-यानं अंगावर फुललेला काटा
मनात उठणारी ढगांची सावळ संध्या
आणी आपल्या दुराव्याची कळ सोसत
एक शब्द ही नसेल जवळिकेचा
दडवलेला सल, न भेटण्याचा,
तरीही
ओल्या स्पर्शाची फुलं
उबदार श्वासाची भूल
आणी डोळ्यातली ओल
पोहोचवील मेघदूत तूझ्यापर्यंत
शब्दांमधल्या निश:ब्दतेमधून
तर मी चक्क उकडलेली अंडी का इथे मांडलीत ? मी अंडी खात नाही.. ( त्याच्यामागे मोठा इतिहास आहे.
मी ५ वर्षांचा असताना माझे एका कोंबडीवर प्रेम बसले होते. पण तिची योजना ज्या कारणासाठी झाली
होती, त्याच कारणासाठी घरातच तिची कत्तल झाली.. मेल्यावरही तिच्या पोटात अंडे सापडले. त्या तिच्या