भाषा

'मराठी साहित्य महामंडळ'-प्रणीत व शासनमान्य मराठी लेखन-नियमावली

Submitted by चिनूक्स on 20 November, 2009 - 13:32

१. अनुस्वार :

नियम १ : स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ - गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा

तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.

नियम २ : य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणार्‍या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.
उदा - सिंह, संयम, मांस.

नियम ३ : नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदा. - लोकांना, मुलांनी, तुम्हांस, आम्हांला, लोकांसमोर, घरांपुढे.

विषय: 

अक्षरांचा उगम

Submitted by माणूस on 18 November, 2009 - 00:19

मराठी आली देवनागरी वरुन
देवनागरी आली नागरी वरुन
नागरी आली गुप्ता वरुन
गुप्ता आली ब्राम्ही वरुन
ब्राम्ही आली ?

असे म्हणतात ब्राम्ही अरेबीक लेखणीतुन आली आणि अरेबीक अजुन कशातुनतरी...

तुमचा काही अभ्यास ह्या विषयावर?

विषय: 

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"महाराष्ट्राच्या बाबतीतील दुटप्पीपणा स्पष्ट करणारे एक साधे उदाहरण घेऊ. उत्तरेकडून येणारा प्रत्येक राजकारणी महाराष्ट्रात आल्यावर ‘हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, म्हणून आपण हिंदी शिकायलाच पाहिजे, तिचा आदर करायलाच पाहिजे.’ इत्यादी (असत्य) पुन:पुन्हा घोकून दाखवतो. पण हेच राजकारणी इतर कुठल्याही अहिंदी राज्यात गेले की त्यांची ही सर्व तत्त्वे अचानक पालटतात. ही मंडळी तिथे जाऊन त्या राज्याच्या भाषेच्या व संस्कृतीच्या आरत्या म्हणतात; तसेच केंद्र सरकार, किंवा त्यांचा पक्ष (जो असेल तो) त्या राज्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी कशी आटोकाट मदत करतो आहे याचे रसभरीत वर्णन करतात.

विषय: 
प्रकार: 

वर्‍हाडी शब्दकोश

Submitted by हर्ट on 10 November, 2009 - 12:42

नमस्कार शब्दप्रेमी मित्रांनो.. इथे आपण वर्‍हाडी भाषेतील जमतील तेवढ शब्द अर्थासहीत लिहुयात. वर्‍हाडी भाषेचा शब्दकोश मी अजून तरी कुठे पाहिला नाही. मायबोली ही बहुतेक पहिली असेल. धन्यवाद!

१) आळोंग = उदा. आळोंग फिरणे अर्थात झोपताना या कडेवरुन त्या कडेवर होणे.
२) बात = अगदी लगेच उदा. मी बातन्या बात आलोच. अर्थात मी लगेच आलो.
३) टोंगळा = गुडघा
४) वज = काळजी उदा. वज घेणे
५) हिडगा = शिष्ट
६) गंज = पातेले
७) गुंडी = चरवी
८) कोपर = परात
९) सांभार = कोथिंबीर
१०) घोळाना = कोशिंबीर
११) पुदाना पाडणे = एखादी गोष्ट नष्ट करणे

विषय: 

राज्यात सर्व भाषा खरोखरच सारख्या आहेत काय?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एक विचारप्रवर्तक लेख. भारताचे भाषा-धोरण, त्याविषयीच्या कायदेशीर तरतूदी इत्यादींची माहिती करून घेतल्यावर आपल्याला हे स्पष्ट होते की प्रत्येक राज्यात आपापल्या राज्यभाषेचे स्थान किती महत्त्वाचे, प्राधान्यतेचे आहे आणि म्हणूनच कुठल्याही राज्यात स्थानिक भाषेपेक्षा हिंदी किंवा इंग्रजीची कायद्याने बळजबरी का केली जाऊ शकत नाही. महाराष्ट्रात मात्र मराठीची सर्वत्र हेटाळणी व उपेक्षा होते कारण आपल्या हक्कांबद्दल आपण जागृत नाही. खालील दुव्यावरील लेख अवश्य वाचा.

प्रकार: 

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

लोकसत्ता (लोकमुद्रा पुरवणी दि० ०४ ऑक्टोबर २००९) मध्ये प्रकाशित झालेला हा लेख, प्रत्येक स्वाभिमानी व स्वभाषाप्रेमी माणसाने आवर्जून वाचावा असा आहे.
—————
आज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याची ’सुरस आणि विस्मयकारी’ कथा पुढील दुव्यावर सापडेल.

http://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

प्रकार: 

सॉरी बॉस! हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

जालावर एक मननीय ब्लॉगपोस्ट वाचण्यात आली :
हिंदी ही राष्ट्रभाषा? – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम.

खेरीज 'हिंदू'मधील एक झकास माहितीपूर्ण लेखही वाचण्यात आला :
(इंग्लिश लेख) Hindi chauvinism

प्रकार: 

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

महाराष्ट्रराज्यस्थापनेचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेल्या आचार्य अत्र्यांनी 'माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे', असे उद्गार काढले होते. आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरं वेगाने घडत असताना महाराष्ट्र व मराठी या दोहोंच्या भविष्याची आखणी करणं गरजेचं झालं आहे. मात्र भविष्याचा वेध घेताना भूतकाळ तपासून बघणं आवश्यक ठरतं. आचार्य अत्र्यांनी उल्लेखलेल्या इतिहासाचा वेध हा महाराष्ट्राच्या व मराठीच्या भूतकाळाचा प्रवासच आहे.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - भाषा