म्हणी म्हणजे कसा भाषेचा अलंकार असतो. अनेक वर्षांचे अनुभवाचे संचित, निरिक्षण, शहाणपण, मोजक्या
चटपटीत आणि बहुदा, यमक अनुप्रासाने युक्त अशा शब्दात ते मांडलेले असते. अनेकदा अनेक शब्दांचे काम,
ते मोजके शब्द करु शकतात.
शेवटी जगभरचा माणूस एकच ना, त्यामूळे अनुभवही तसेच असतात. अनेक भाषांत, ते समान रित्या, म्हणींत
गुंफलेले असतात. पण मला पोर्तुगीज भाषेतल्या काही अनोख्या म्हणी सापडल्या.
अनोख्या अश्यासाठी कि त्याला समांतर अशा, आपल्याकडच्या म्हणी आठवत नाहीत. शिवाय शब्दार्थ जरी
कळले ( ते देतोच आहे ) तरी गर्भित / लाक्षणिक अर्थ कळत नाहीत. या म्हणी मूळच्या ब्राझिलियन पोर्तुगीज
'ब्लॉग माझा-२०१२' स्पर्धेचा निकाल जाहीर
वृत्तपत्रांतून मराठी बातम्या वाचता येऊ लागल्या त्याला आता कित्येक वर्षं झाली. या काळात वृत्तांकनाच्या शैलीत चांगलाच फरक पडला. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्रांत ज्या बातम्या दिल्या जात असत ती भाषा आणि आजची भाषा यांत काय फरक आहे ते दाखवण्यासाठी जुन्या बातम्यांच्या मजकुराचे नमुने हवे आहेत. आंतरजालावर कुठे असे नमुने उपलब्ध असले तर कृपया इथे दुवे द्यावेत. टंकलेला मजकूर किंवा स्कॅन केलेली पानं यांपैकी काहीही चालेल. स्कॅन असेल तर मजकूर वाचता येईल इतपत दर्जा चांगला हवा.
"आई, माझ्याकडे सगळीच लहान मुलांची पुस्तके आहेत. आता मला मोठ्या मुलांची पुस्तके घेऊन दे."
"हे काय!? हे नको मला. खुप वेळा वाचुन झालंय माझं. आणि ते पण नको. मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, लहान मुलांचं !!"
असे संवाद तुमच्या घरी ऐकु येतात का? आमच्याकडे सुरु झालेत सध्या.
पुस्तके किती आणि कोणती विकत घ्यायची, पुन्हा ठेवायची कुठे हे प्रश्न आहेतच.
मग मला वाटले इथे आपण मुलांचा पुस्तक क्लब सुरु केला तर?
- महिन्यातुन एकदा किंवा जसे जमेल तसे एकत्र भेटुन मुलांची पुस्तके शेअर करायची.
"श्रींच्या आरतीस पाच मिनिटांत सुरूवात होत आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर मंडपात उपस्थित राहावे."
अशी 'अलाऊंसमेंट' नऊ ते साडेनऊ पर्यंत निदान चार-पाच वेळा तरी केल्याशिवाय कुणीही अजिबात मंडपात प्रकट होत नाही. आमच्या चाळीत हे असले एकेक नग आहेत.
१
पहाटे सूर्य अजून झोपला असता ..
मी एक आकार पहिला
स्मशानाबाहेर होता..
निराकार उभा राहिला ..
हात रक्ताळलेले ..
तरीही चेहरा उजळलेला ..
कोण असावे असले?
मी "देव" म्हणाला..
तू ..खून केला?
तो पर्यंत राख धुतली..
तू ..पण त्यातला ?
पापणी हि नाही हलली..
अरे नाही ..
काळ आला होता..
मी फक्त ..
वेळ पाळली..!!
असं इतकं सहज?
एवढं सोप्पं ..?
कोण म्हणालं सहज..?
मी गप्प..
निर्मिती केलीये आधी..
चुकलो काही ठिकाणी..
कोण करणार सारं नीट..?
मग आपणच व्हायचं थोडं धीट..
तुलाही राग येतो?
देव: ह्म्म्म
तू मला पकडतो?
मी: ह्म्म्म
नाही कसं..येतो राग..
कोणाचा? का?
स्वत:चा ..
"मी जर आहे बाळाची ताई
बाळाला माझ्याकडे दे की गं आई "
"हो तर ताई
रुसु नका बाई
अजून हे बाळ छोटं कि नै
मान पण नीट धरतंच नै
मोठ्ठं होईल जरासे किनाई
हाकही मारेल तुला ते "ताई"
मग काय मजा ताईची बाई
बाळ आणि तै, बाळ आणि तै
आम्ही तर मधे कुणीचच नै"
कविता - 'मी चुप्प'
येताना खुपत
जाताना बोचत
कितीही दुखलं तरी मी चुप्प !!
स-दैव सुज्ञ
विचारात महात्म्य
घर जळलं तरी मी चुप्प !!
संस्कृती दक्ष
केल लक्ष
झालो भक्ष तरी मी चुप्प !!
रांगेत सुस्त
प्रगतीचा अस्त
सगळच फस्त तरी मी चुप्प !!
मंत्र्यानचं तंत्र
हाती जातीचा मंत्र
केल माझ यंत्र तरी मी चुप्प !!
दाखवलं संत्र
हेच हल्लीच सूत्र
मोडक्या स्वप्नांची रात्र तरी मी चुप्प !!
करून कष्ट
शून्य प्राप्त
वेळ समाप्त तरी मी चुप्प !!
पाणी लुप्त
वीज गुप्त
सारे होती असे आसक्त तरी मी चुप्प !!
गप्प, गप्प
आवाज ठप्प
मजले गर्दीत हुप्प तरी मी चुप्प !!
ज्ञानेश्वरी. मराठी साहित्यातला सर्वोच्च मानदंड! अगदी आबालवृद्धांना माहित असलेली त्यातील असंख्य उद्धरणे, साहित्यात परत परत वापरले गेलेले त्यातले दृष्टांत, त्यातलं पसायदान, लहानपणी डोळ्यात पाणी आणून ऐकलेली ज्ञानेश्वरांची आणि त्यांच्या भावंडांची गोष्ट आणि शाळेत-कॉलेजमधे अभ्यासाच्या पुस्तकात उल्लेखलेली ज्ञानेश्वरीच्या रचनेने केलेली सामाजिक क्रांती. फारतर आळंदीला जाऊन समाधीचे आणि नेवाशाला जाऊन घेतलेले पैसाच्या खांबाचे दर्शन आणि त्याने मनात उठलेले अननूभूत भावतरंग. आपल्या सर्वसामान्यांना ज्ञानेश्वर-ज्ञानेश्वरीबद्दल असलेल्या माहितीचा हा ढोबळमानाने लसावि!