भाषा

पाऊस हा ।।

Submitted by राजीव मासरूळकर on 17 December, 2013 - 00:27

**पाऊस हा**

आभाळ दाटून
येतसे मनात
ओथंबे तनात
पाऊस हा

मनाच्या कुशीत
दाटे हिरवळ
गुढ दरवळ
पाऊस हा

ओलावून जाते
आठवबियाणे
आर्त प्रेमगाणे
पाऊस हा

वाऱ्‍याच्या मिठीत
शिरतो सारखा
वेडा वीजसखा
पाऊस हा

ओल्या मातीवर
पावलाचा ठसा
भावी भरवसा
पाऊस हा

- राजीव मासरूळकर
पानवडोद,ता.सिल्लोड
जि.औरंगाबाद
दि १६.०६.१२

जगणं...एक देहहोम.....!

Submitted by राजीव मासरूळकर on 15 December, 2013 - 21:34

जगणं . . . . . . . . . . . !

जगणं
वटवाघळासारखं
उलटं लटकून ,
सोडून गेलेल्या
पिलांसाठी
चित्कारत भटकून,
दशदिशांचा वेध घेत
आंधळ्यासारखं
उडणं . . . . . . .

जगणं . . . . . . . !

जगणं
गटारातल्या अळ्यांसारखं
वळवळत,
अंधारवाटा चिवडत,
सगळा दुर्गँध पोटात घेऊन
वेश्येसारखं
कळवळत
सडणं . . . . . . .

जगणं . . . . . . . !

जगणं
बैल होऊन
ओटीपोटी
चिकटलेले गोचिड
कुरवाळत,
चिमूटभर अनुभव,
मुठभर पत्रावळ्यांच्या
बुजगावण्यांसमोर
लाळ गाळत
रांगणं . . . . . . .

जगणं . . . . . . !

जगणं
आपल्याच माणसांची
पोटं तुडवून,
छात्या बडवून,

अमृतधारा - स्वामी स्वरूपानंद (पांवस)

Submitted by पुरंदरे शशांक on 14 December, 2013 - 13:23

अमृतधारा - स्वामी स्वरूपानंद (पांवस)

आजारपण हे काही आपल्यापैकी कोणालाही नवीन नाही. कुणाकुणाची आजारपणे लिहून काढायची म्हटली तर प्रत्येकाचा एकेक ग्रंथ होईल इतकी विविधता अणि व्यापकता त्यात आहे.
पण याच आजारपणाचा उपयोग आपल्या अध्यात्मिक प्रगतीसाठी कोणी करुन घेतल्याचे ना ऐकिवात आहे ना पहाण्यात आहे.

पांवसचे पूजनीय श्री स्वामी स्वरुपानंद यांनी हा अनुभव स्वतः घेतला व तो "अमृतधारा" या अगदी छोटेखानी पुस्तकात लिहून ठेवला. अतिशय सुरेख व प्रासादिक साकीवृत्तात हे सर्व त्यांनी लिहिले आहे. हे सगळे अनुभव म्हणजे एका साधकाचा सिद्धावस्थेपर्यंतचा प्रवास म्हणायलाही हरकत नाही.

कादंबरी लेखन- तंत्र, मंत्र.

Submitted by शर्मिला फडके on 10 December, 2013 - 05:53

'कादंबरी' हा साहित्य प्रकार ज्यांना वाचायला आवडतो आणि लिहायलाही आवडतो त्यांच्याकरता हा धागा.

घरटं नि पिल्लू ...

Submitted by पुरंदरे शशांक on 9 December, 2013 - 04:25

घरटं नि पिल्लू ...

ये लौकर इकडे बघ
एक भारी गम्माडी
घरटं कसं तयार होतंय
जोडून काडीला काडी

बोलू नकोस काही आता
पहात रहा जरा नीट
आण्तो काड्या चोचीत कशा
बुलबुलराव मोठा धीट

काड्या गुंतवत एकात एक
घरटं होईल गोल छान
घाल्तील मग बुलबुलबाई
अंडी त्यात ल्हान ल्हान

काळजी घेतील दोघे मिळून
काही दिवस पहा वाट
पिल्लू येता अंड्यातून
सुरु होईल कलकलाट

पिल्ले भारी अधाशी
सार्खी म्हणे आणा खाऊ
आईबाबा आण्तात किती
किडेबिडे धाऊ धाऊ

इवलाले फुट्तील पंख
पिल्लांना नाजुकसे
बोलावतील आईबाबा
घरट्याबाहेर जरासे

घाबरत घाबरत उड्या मारत
पिल्लू येईल बाहेर जरा
पंख हलवत छोटुकले ते

वर्म भक्तिचे ...

Submitted by पुरंदरे शशांक on 6 December, 2013 - 00:46

वर्म भक्तिचे ...

भक्तिचे ते वर्म | संतांसीच ठावे | येर ते करावे | कवायती ||

कवायती जेथे | नाही काही भाव | सर्व काही वाव | वृथा शीण ||

वृथा शीण सारा | टाकून आघवा | घेई त्वरे ठावा | संतांपायी ||

संतापायी कळे | भावचि निर्मळ | भेटवी केवळ | भगवंत ||

भगवंत नित्य | राही ह्रदयात | कौतुके पहात | भक्ताकडे ||

भक्तासि कदापि | नसे विभक्तता | लाभते मुक्तता | अनायासे ||

अनायासे ऐसे | घडेल का सारे | पुन्हा पुन्हा जारे | संतांपायी ||

--------------------------------------------------------------------------

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ५

Submitted by पुरंदरे शशांक on 5 December, 2013 - 00:18

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ५

म्हणौनि सद्भाव जीवगत | बाहेरी दिसती फाकत | स्फटिकगृहींचे डोलत | दीपु जैसे ||४७६ अ. १३||

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् |
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ||अ. १३-७ ||

नम्रता दंभ-शून्यत्व अहिंसा ऋजुता क्षमा । पावित्र्य गुरू-शुश्रूषा स्थिरता आत्म-संयम ॥ गीताई ॥

आई जेव्हा रागावते ....

Submitted by पुरंदरे शशांक on 3 December, 2013 - 22:03

आई जेव्हा रागावते .... Uhoh

घरात पाऊल टाकले तरी
आईच्या नावाने ओरडा नाही ???

का बाई शांत दिस्तयं घर ???
किती ते बावरं माझं मन ....

झालंय काय या सोनूला
मार्गच नाही कळायला

खोलीत पसरलेत वाटतं म्हाराज
सुस्त कस्काय सारं कामकाज ??

काय रे असा गप्प गप्पसा
पडलास का कुठे? बोल पटापटा

डोळे हे सांगतात वेगळेच बरं
तुझं हे लक्षण नव्हे रे खरं Angry

दिस्ताएत मला तुकडे अजून
कुठली बरणी ठेवलीस फोडून ?? Angry

कारट्या, कितीदा सांगितलंय तुला
किती रे छळशील अजून मला Angry

कामाने जातीये मी आधीच वैतागून
अन तू ठेव अजून पसारा मांडून

बास कर आता ते झटक नि फटक

सुख-दु:ख संत महात्म्यांचे .......

Submitted by पुरंदरे शशांक on 2 December, 2013 - 01:29

सुख-दु:ख संत महात्म्यांचे .......

श्रीनिवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताई या चार भावंडांनी त्यांच्या माता-पितरांच्या पश्चात कसे दिवस काढले असतील याची आपण याकाळात कल्पनाही करु शकत नाही !

त्यांच्या पिताश्रींनी (विठ्ठलपंत) संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात टाकलेले पाऊल - हा त्याकाळातील त्या समाजाने ठरवलेला एक अक्षम्य अपराध - ज्याला प्रथम बळी पडले ते विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई. जेव्हा समाजाने त्यांना वाळित टाकले (ग्रामण्य) ते त्या दोघांनी सहन करुन आळंदी गावाबाहेर रहाणे पसंत केले. त्यावेळेसचा समाजरोष पूर्णपणे स्वतःवर झेलून त्यांनी या चार मुलांचे जे संगोपन केले ते मोठे आश्चर्यच.

इंद्रायणी तीरी.....

Submitted by पुरंदरे शशांक on 1 December, 2013 - 06:04

इंद्रायणी तीरी.....

इंद्रायणीच्या लाटांवरती
अवचित उठली अनाम खळखळ
सुवर्ण पिंपळ स्तब्ध शांतसा
अजानवृक्षी अपूर्व सळसळ

म्लान पाहता श्रीहरिचे मुख
ध्यान सोडिती गिरीजाशंकर
शिष्य निघाला स्वस्थानासी
श्रीसद्गुरुंना फुटला गहिवर

इंद्रायणीच्या तीरावरती
भागवतांचे मेळे निश्चळ
ज्ञानोबाचा गजर अंतरी
नयनी उरले अश्रु व्याकुळ

टाकून बिरुदे देवपणाची
भक्तासोबत श्रीहरि पाऊल
चिरा लोटता समाधीवरी
मागे उरला तुळसी दरवळ......

(कार्तिक वद्य त्रयोदशी - संजीवनसमाधी सोहळा - श्रीक्षेत्र आळंदी)

Pages

Subscribe to RSS - भाषा