Submitted by _आदित्य_ on 8 May, 2021 - 01:29
सखे.. इतकं सोपं वाटतं का तुला..
कविता रचणं?
अंतर्मनात खोल कुठेतरी
लपून बसलेल्या शब्दांना
भावनांचं भिंग करुन धुंडाळावं लागतं .
पाजावं लागतं अमृत त्यांना.. कोमेजून
गेल्या आठवणींचं ..
मग आंजारून गोंजारून त्यांना ओवावं
लागतं... लयदार अश्या धाग्यांमध्ये..
आणि नादाची हिरवीगार फुंकर घालून
अलगद उतरवायचं असतं त्यांना कागदावर..
सखे.. इतकंही सोपं नसतं गं कविता रचणं !
अगं.. ती वाचताना देखील त्या शब्दांनी
परिधान केलेला शृंगार ढळू द्यायचा
नसतो वेडे !
- आदित्य
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा