Submitted by मनोजकुमार देशमुख on 2 May, 2020 - 09:35
लिहिणे कविता त्याने सोडले आहे
आत्ताच लेखणीला मोडले आहे
लिहायचा पानभर अक्षरे अक्षरे
दौतेला शाईच्या फोडले आहे
विसरला गणगोत हे छंद मात्रांचे
त्या जिवलग शब्दांना खोडले आहे
चुकीचेच होते अंदाज नात्यांचे
ग्रीष्मात पावसाने झोडले आहे
परक्यास हे कशाला दोष ते द्यावे
आपल्याच लोकांनी तोडले आहे
झटकून टाक आता मनोज उदासी
नाते थेट तयाशी जोडले आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त! आवडली!!
मस्त! आवडली!!
छान कविता
छान कविता
मात्रा (चार ओळी तपासल्या),
मात्रा (चार ओळी तपासल्या), काफ़िये व रदिफ नीट सांभाळली गेली आहे, लय मात्र हरवली आहे.
शाहीचे शाई केले तर बरे! भरीची अक्षरे टाळता आली तर उत्तम! अर्थ संप्रेषित व्हावा.
शुभेच्छा
बेफिकीर सुधारणा सांगितल्या
बेफिकीर सुधारणा सांगितल्या बद्दल धन्यवाद. नक्की प्रयत्न करतो.
जव्हेरगंज अज्ञातवासी धन्यवाद
जव्हेरगंज
अज्ञातवासी धन्यवाद