आपल्या आजूबाजूला अनेक बरेवाईट प्रसंग आपण पाहत असतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहताना आपले स्वतःचे असे वेगळे मत असते. अगदी छोटे छोटे प्रसंग घरातून ऑफिससाठी बाहेर पडताना रस्त्यावरती दिसणारे एखादे मरायला टेकलेले कुत्रे आपण पाहिले, तर त्यासाठी दोन मिनिट सुद्धा थांबण्यासाठी आपल्याकडे नसतात. आपण पुढे जातो परंतु कुठेतरी त्याचा विचार मनात येत राहतो. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्याचे बरेवाईट पडसाद आपल्या मनावर उमटत जातात. कधी आपलं मन निडर होत जातं . संवेदना बोथट होत जातात किंवा कधी अगदी हळवं होतं आणि दोन दोन दिवस आपण या गोष्टींचा विचार करत राहतो. काय चांगलं काय वाईट याच्या परिसीमा भिन्न असल्या तरीही मूळ मुद्दा प्रत्येकाच्या मनात सारखा असतो. लहानपणापासून झालेले संस्कार वरकरणी कितीही दुर्लक्ष केलं तरीही आपण ते विसरू शकत नाही म्हणूनच असे काही प्रसंग संक्षिप्त रूपाने लिहिले गेले आहेत. यातील काही लेख सकाळ या वृत्तपत्रातील ती या सदरात प्रकाशित झाले आहेत . संवाद या पुस्तकाने वाचकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.